शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

उड्डाणपुलातून पाण्यासह राखेची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 01:06 IST

देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपुलातून राख व पाण्याची गळती सुरु आहे. पुलाच्या भरावात राखेचा वापर करण्यात आले आहे. दगडी पुलातून पाण्याची प्रचंड गळती सुरु असल्याने पुल बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सदोष बांधकाम की तांत्रिक त्रृट्यामुळे ही गळती सुरु आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देतांत्रिक दोषाची शक्यता : बांधकामावर प्रश्नचिन्ह, धोक्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपुलातून राख व पाण्याची गळती सुरु आहे. पुलाच्या भरावात राखेचा वापर करण्यात आले आहे. दगडी पुलातून पाण्याची प्रचंड गळती सुरु असल्याने पुल बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सदोष बांधकाम की तांत्रिक त्रृट्यामुळे ही गळती सुरु आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे.देव्हाडी येथे तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावर रेल्वे फाटक क्रमांक ५३२ वर वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होत असते. त्यासाठी येथे उड्डाणपुल प्रस्तावित आहे. सुमारे १८ ते २० कोटींचा पुल राज्य शासन तयार करीत आहे. जागतिक बँकेचे अर्थसहाय्य या पुलाला मिळाले आहे. नागपूर येथील मुख्यालयातून पुलावरून देखरेख व नियंत्रण ठेवले जात आहे. आता पावसात उड्डाणपुलातून पाणी गळती सुरु आहे. भरावात राखेचा वापर करण्यात आला आहे. पाण्यासह राख वाहून रस्त्यावर पसरली आहे. राख निसरडी आहे. वाळल्यावर हवेत प्रचंड धुळ पसरते. त्याचा मोठा त्रास येथे सहन करावा लागत आहे.पुलाचे बांधकाम सिमेंट दगडांचे आहे. दगडात गॅप निर्माण झाली आहे. पुलाच्या भरावातून पाण्याची धार बाहेर निघत आहे. पाण्यामुळे पुल खचण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पुलावरील पाणी खाली येण्याकरिता विशेष तंत्राचा वापर करण्यात येतो. भरावातून पाणी रस्त्यावर येत असल्याने पुल बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पुल भरावातून राख बाहेर येत असल्याने पुलात पोकळी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही तांत्रिक बाब सर्वसामान्यांना कळत आहे. परंतु या विभागाचे अधिकारी मात्र याबाबत मौन पाळून असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पुलाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.