शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

डीपीसीचा निधी २५ कोटींनी वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 22:37 IST

जिल्हा नियोजन समितीचा निधी विकास कामासाठी कमी असून तो २५ कोटी रूपयांनी वाढविण्यासाठी अर्थमंत्र्यांकडे आग्रह करणार आहे.

ठळक मुद्देपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे: आता प्रत्येक कामाचे जिओ टॅगिंग होणार

आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्हा नियोजन समितीचा निधी विकास कामासाठी कमी असून तो २५ कोटी रूपयांनी वाढविण्यासाठी अर्थमंत्र्यांकडे आग्रह करणार आहे. जिल्हा नियोजनच्या प्रत्येक कामाचे जिओ टॅगिंग आवश्यक असून कामे प्रस्तावित करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, आ.डॉ.परिणय फुके, आ.चरण वाघमारे, आ.रामचंद्र अवसरे, आ.बाळा काशिवार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ नागपूरचे तज्ज्ञ सदस्य डॉ.कपिल चंद्रायन, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड उपस्थित होते.या बैठकीत झुडपी जंगल निवार्णीकरण, ग्रामपंचायत भवन, बांधकाम, स्मशानभूमी शेड, शाळांच्या वर्गखोल्या बांधकाम, मुख्यमंत्री सडक योजनेत १५० कि.मी.चे अतिरिक्त बांधकाम, पालकमंत्री पांदण योजनेसाठी रस्ते बांधकाम नियोजन यासह विकासाचे विविध प्रस्ताव प्राधान्याने तयार करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्या.सन २०१७-१८ चा निधी ३१ मार्च अखेर खर्च न करणाºया अधिकाºयांच्या गोपनीय अहवालात नोंद घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ च्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. २०१८-१९ चा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री म्हणाले, जिल्हा परिषदेतील कोणत्याही कामाचे प्रस्ताव जिल्हा परिषद अध्यक्ष व आमदार यांची स्वाक्षरीनिशी सादर करणे बंधनकारक असल्याचे सांगितले. आता एससी, एसटी, ओबीसी व एनटी यांच्या जमिनीची पट्टे विनामुल्य देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.