शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
4
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
5
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
6
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
7
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
8
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
9
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
10
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
11
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
12
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
13
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
14
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
15
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
16
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
17
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
18
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
19
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
20
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी

दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:37 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क भंडारा : लस घेण्याचा एक टाइमफ्रेम आहे. पहिला डोस घेतलेल्या व्यक्तीने दुसरा डोस घ्यायलाच हवा. दुसऱ्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : लस घेण्याचा एक टाइमफ्रेम आहे. पहिला डोस घेतलेल्या व्यक्तीने दुसरा डोस घ्यायलाच हवा. दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरू नका, अशी बाब वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत दोन लक्ष १७ हजार ११८ व्यक्तींना प्रथम व द्वितीय डोस देण्यात आला आहे.

डोस देण्यात आलेल्यांमध्ये आरोग्य सेवक १४,५९४, फ्रंटलाइन वर्कर १३,७३५, तसेच १८ ते ४४ व ४५ वयोगटावरील व्यक्ती व वरिष्ठ नागरिकांचा समावेश आहे. मात्र, अनेक केंद्रांवर लसीचा तुटवडा जाणवत असल्याची चर्चा व तशी स्थितीही दिसून येत असल्याने अनेकांना दुसरा डोस मिळणे कठीण जाणार काय, असे वाटत आहे. दुसऱ्या डोससाठी उशीर झाला तर घाबरण्याचे कुठलेही कारण नाही, असेच तज्ज्ञ व्यक्ती सांगत आहेत. कोरोना महामारी थांबविण्यासाठी व्हॅक्सिन एक मोठे शस्त्र म्हणून समोर आले आहे. त्यामुळे प्रत्येकच व्यक्तीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यास मृत्यूचे प्रमाण कमी होऊन येणाऱ्या लाटेसाठीही आपण सज्ज होऊ शकतो किंबहुना पहिल्याच लसीकरणांतर्गत अजूनही बहुतांश नागरिकांनी पहिला डोस घेतलेला नाही.

उल्लेखनीय म्हणजे भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ६१६१ वरिष्ठ नागरिकांनी लसीचा पहिला व दुसरा डोस घेतला आहे. मात्र, अजूनही ४५ वयोगटावरील व अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतलेला नाही.

बॉक्स

दुसऱ्या डोससाठी एक आठवडा थांबा

लसीचा दुसरा डोस मिळाला नाही, तर कुठलीही चिंता करण्याची गरज नाही. टप्प्याटप्प्याने व उपलब्ध साठ्यानुसार सर्वांनाच लसीकरणाचा दुसरा डोस मिळणार आहे. एका डोसनंतर बराच उशीर झाला, अशी वायफळ चिंताही करू नये, असेही वैद्यकीय तज्ज्ञांनी आवाहन केले आहे.

कोट बॉक्स

‘हर्ड इम्युनिटी’ सार्वजनिक होईल

दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. एखाद्या व्यक्तीने पहिला डोस घेतला असेल व त्यानंतर ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली असेल तर घाबरण्याचे कारण नाही. कोरोनामुक्त बरा झाल्यावर किमान सहा आठवड्यांनंतर लसीकरणाचा दुसरा डोस घेता येतो. याशिवाय नॉर्मल व्यक्तीला दुसरा डोस घेण्यासाठी उशीर झाला असेल तरी घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. एक किंवा दोन आठवडे उशीर झाला तर शरीरात कुठलाही बदल होत नाही. पहिल्या लसीकरणानंतर निर्माण झालेल्या अँटिबॉडीज आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवितात किंबहुना येणाऱ्या दिवसांत ‘हर्ड इम्युनिटी’ प्रकार सार्वजनिक झालेला असेल.

- डॉ. नितीन तुरस्कर, अध्यक्ष, आयएमए, भंडारा.