शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:37 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क भंडारा : लस घेण्याचा एक टाइमफ्रेम आहे. पहिला डोस घेतलेल्या व्यक्तीने दुसरा डोस घ्यायलाच हवा. दुसऱ्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : लस घेण्याचा एक टाइमफ्रेम आहे. पहिला डोस घेतलेल्या व्यक्तीने दुसरा डोस घ्यायलाच हवा. दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरू नका, अशी बाब वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत दोन लक्ष १७ हजार ११८ व्यक्तींना प्रथम व द्वितीय डोस देण्यात आला आहे.

डोस देण्यात आलेल्यांमध्ये आरोग्य सेवक १४,५९४, फ्रंटलाइन वर्कर १३,७३५, तसेच १८ ते ४४ व ४५ वयोगटावरील व्यक्ती व वरिष्ठ नागरिकांचा समावेश आहे. मात्र, अनेक केंद्रांवर लसीचा तुटवडा जाणवत असल्याची चर्चा व तशी स्थितीही दिसून येत असल्याने अनेकांना दुसरा डोस मिळणे कठीण जाणार काय, असे वाटत आहे. दुसऱ्या डोससाठी उशीर झाला तर घाबरण्याचे कुठलेही कारण नाही, असेच तज्ज्ञ व्यक्ती सांगत आहेत. कोरोना महामारी थांबविण्यासाठी व्हॅक्सिन एक मोठे शस्त्र म्हणून समोर आले आहे. त्यामुळे प्रत्येकच व्यक्तीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यास मृत्यूचे प्रमाण कमी होऊन येणाऱ्या लाटेसाठीही आपण सज्ज होऊ शकतो किंबहुना पहिल्याच लसीकरणांतर्गत अजूनही बहुतांश नागरिकांनी पहिला डोस घेतलेला नाही.

उल्लेखनीय म्हणजे भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ६१६१ वरिष्ठ नागरिकांनी लसीचा पहिला व दुसरा डोस घेतला आहे. मात्र, अजूनही ४५ वयोगटावरील व अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतलेला नाही.

बॉक्स

दुसऱ्या डोससाठी एक आठवडा थांबा

लसीचा दुसरा डोस मिळाला नाही, तर कुठलीही चिंता करण्याची गरज नाही. टप्प्याटप्प्याने व उपलब्ध साठ्यानुसार सर्वांनाच लसीकरणाचा दुसरा डोस मिळणार आहे. एका डोसनंतर बराच उशीर झाला, अशी वायफळ चिंताही करू नये, असेही वैद्यकीय तज्ज्ञांनी आवाहन केले आहे.

कोट बॉक्स

‘हर्ड इम्युनिटी’ सार्वजनिक होईल

दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. एखाद्या व्यक्तीने पहिला डोस घेतला असेल व त्यानंतर ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली असेल तर घाबरण्याचे कारण नाही. कोरोनामुक्त बरा झाल्यावर किमान सहा आठवड्यांनंतर लसीकरणाचा दुसरा डोस घेता येतो. याशिवाय नॉर्मल व्यक्तीला दुसरा डोस घेण्यासाठी उशीर झाला असेल तरी घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. एक किंवा दोन आठवडे उशीर झाला तर शरीरात कुठलाही बदल होत नाही. पहिल्या लसीकरणानंतर निर्माण झालेल्या अँटिबॉडीज आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवितात किंबहुना येणाऱ्या दिवसांत ‘हर्ड इम्युनिटी’ प्रकार सार्वजनिक झालेला असेल.

- डॉ. नितीन तुरस्कर, अध्यक्ष, आयएमए, भंडारा.