शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लस घेण्यापूर्वी करा रक्तदान; नंतर दोन महिने थांबावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:31 IST

जिल्ह्यात फक्त दोन रक्तपेढी आहे. यात भंडारा शहरातील समर्पण ब्लड बँक व जिल्हा रुग्णालयात असलेली रक्तपेढीचा समावेश आहे. कुणालाही ...

जिल्ह्यात फक्त दोन रक्तपेढी आहे. यात भंडारा शहरातील समर्पण ब्लड बँक व जिल्हा रुग्णालयात असलेली रक्तपेढीचा समावेश आहे. कुणालाही रक्ताची आवश्यकता भासल्यास या दोन ठिकाणांहून रक्त उपलब्ध केले जाते. दुर्मीळ रक्तगट असलेली व्यक्ती किंवा डोनर वेळेवर उपलब्ध झाली नाही, तर मोठा पेचप्रसंग निर्माण होतो. अशा वेळी नागपूरलाही धाव घ्यावी लागते. कोरोना काळात अशी परिस्थीती निर्माण होऊ नये, म्हणून लस घेण्यापूर्वी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदानासाठी समोर यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

‘त्या’ रक्तपिशवींचा अभाव

रक्तामध्ये एबी निगेटिव्ह हा रक्तगट सगळ्यात दुर्मीळ रक्तगट म्हणून ओळखला जातो. वेळप्रसंगी या गटातील रक्त उपलब्ध न झाल्यास रुग्णाचा मृत्यूही झाल्याची घटना घडल्या आहेत. ओ, एबी पाॅझिटिव्ह यांसह काही रक्तगटातील रक्त सहजपणे उपलब्ध होते. मात्र, दुर्मीळ रक्तगटातील रक्त व डोनर मिळत नाही. कोरोना काळात लसीकरण झाल्यानंतर रक्ताची टंचाई जाणवू शकते. त्यामुळे कुठल्याही रक्तगट असलेल्या सुदृढ व्यक्तीने रक्तदानासाठी स्वेच्छेने समोर यावे, अशी जनजागृती करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. उल्लेखनीय म्हणजे रक्ताचा तुटवडा होऊ नये, हा यामागील उदात्त हेतू आहे. रक्तपेढीतून रोज सरासरी १५ रक्तपिशव्या रक्त दिले जाते. मात्र, डोनरची संख्या ३ ते ४ असते.

ब्लड बँक प्रमुख म्हणतात...

रक्तदान करणे हे शरीरस्वास्थासाठीही उत्तम बाब आहे. कोरोनाच्या काळात रक्ताचा पुरवठा कमी होऊ नये किंवा टंचाई निर्माण होऊ नये, याची प्रत्येकांनीच काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी रक्तदानासाठी समोर यावे.

-ओंकार नखाते, समर्पण ब्लड बँक, भंडारा

जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा आहे, पण तो लसीकरणामुळे नाही. कुठलीही नाॅर्मल व्यक्ती रक्तदान करू शकते. कोरोना काळात व आजघडीला रक्ताची टंचाई निर्माण होऊ नये, म्हणून रक्तदान होणे महत्त्वाचे आहे.

-डाॅ.मीरा सोनवाने, रक्तसंक्रमण अधिकारी जि.रुग्णालय

पहिला डोज घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा, परंतु ६० दिवसांनंतरच त्या व्यक्तीला रक्तदान करता येऊ शकते. तत्पूर्वी त्याने रक्तदान केल्यास अतिउत्तम आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ३३ हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांसह नागरिकांना कोविड लसीकरण करण्यात आले आहे. दररोज सरासरी एक हजार लस देण्यात येत असतात.