शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

कुणी धान घेता का धान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:27 IST

मुखरू बागडे पालांदूर झाडीपट्टी लोककला अख्ख्या भारत भूमीत सुपरिचित आहे. लोकांच्या पसंतीला उतरलेले नाटक आता सोशल मीडियावरही धूम ठोकत ...

मुखरू बागडे

पालांदूर

झाडीपट्टी लोककला अख्ख्या भारत भूमीत सुपरिचित आहे. लोकांच्या पसंतीला उतरलेले नाटक आता सोशल मीडियावरही धूम ठोकत आहे. आधारभूत उन्हाळी धान खरेदी हंगाम शेतकऱ्यांकरिता कसा फोल ठरत आहे, याचे एकपात्री नाटकातून वास्तव चित्र व्यथित शेतकरी अशोक मस्के महागाव शिरोली, ता. अर्जुनी मोरगाव, जिल्हा गोंदिया यांनी अभिनयातून चित्रीकरण केले आहे. ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड धूम करीत आहे. शेतकऱ्याची व्यथा सरकार व त्याचे प्रशासन ओळखून आहे. ‘हाडाचे मणी व रक्ताचे पाणी’ करीत कोरोनाचे संकट उरी बाळगत उन्हाळी हंगाम कसला. घामाच्या धारा वाहत धान पीक घेतले. महागाईच्या संकटाने गरजेपेक्षा अधिक पदरचे पैसे खर्च करीत स्वतःच्या आयुष्यात परीस ठरलेला धान आज कुणी घ्यायला तयार नसल्याने शेतकरी हतबल आहे.

आधारभूत केंद्र केवळ कागदावर दिसत असून, प्रत्यक्षात मात्र केंद्रावर खरिपाचेच धान पडून आहे. लोकप्रतिनिधी पोकळ प्रतिष्ठेसाठी धान खरेदी केंद्र सुरू केले असल्याचे भासवतात. अधिकाऱ्यांवरही अवास्तव दबाव टाकून खरेदी केंद्राचे फीत कापण्याचे काम सुरू आहे. फीत कापल्यानंतर आशावादी शेतकरी दररोज केंद्रावर भेट देत आहे. तलाठ्याकडून सातबारा घेत ऑनलाइनसाठी खरेदी केंद्रावर हजेरी लावतो. आज होईल, उद्या होईल या आशेने पूर्ण मे महिना लोटला. मात्र, आधारभूत केंद्र अजूनही आशावादी दिसत नाही.

खासगी व्यापारी मात्र स्वतःचे उखळ पांढरे करीत शेतकऱ्याच्या अगतिकतेचे सोने करीत आहे. शेतकरी धानाला आयुष्याचा परीस समजतो आहे. सिंचित क्षेत्रातील शेतकरी दोन्ही हंगामांत धान पिकवितो आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात बऱ्यापैकी सिंचित क्षेत्र तयार आहे. दरवर्षी सिंचित क्षेत्राचे प्रमाण वाढत आहे. आधारभूत केंद्र शेतकऱ्यांना वरदान ठरलेले आहे; परंतु उदासीन लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणाने शेतकऱ्यांच्या आयुष्यातील परीस ठरलेले धान आधारभूत केंद्रावर विकता येईना झाले आहे. १८६८ रुपये दराचे धान १२५० रुपयापर्यंत विक्री करावे लागत आहे. हे चित्र लोकप्रतिनिधींसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीसुद्धा बघत असूनही भावनाशून्य कृती करीत वेळ मारून नेत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याला कारण शासनाचे चुकीचे धोरण ठरत असल्याची बोलकी कलाकृती एकपात्री नाटकाच्या माध्यमातून व्यथित शेतकरी अशोक मस्के यांनी मांडली आहे.