शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

शहरात पाणीपुरी खाताय की टायफाईडला निमंत्रण देताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:39 IST

भंडारा : पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात टायफाईड हा आजार होतो. या आजाराचा प्रसार दूषित अन्न किंवा पाण्यामुळे होतो. अस्वच्छ ...

भंडारा : पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात टायफाईड हा आजार होतो. या आजाराचा प्रसार दूषित अन्न किंवा पाण्यामुळे होतो. अस्वच्छ वातावरणात एस. टायफी हा जीवाणू विकसित होतो आणि उघड्या अन्नाला किंवा पाण्याला तो दूषित करतो. दूषित अन्न पदार्थ खाल्यामुळे किंवा पाणी प्यायल्यामुळे जीवाणुचा प्रादुर्भाव होवून टायफाईडचे लागण होते. त्यामुळे पावसाच्या दिवसामध्ये उघड्यावरील अन्न पदार्थ खाणे टाळावे. विशेषत: पाणीपुरी खाताना त्यात वापरणारे पाणी, स्वच्छता यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. टायफाईड हा आजार साल्मोनेला टायफिड या विषाणुपासून होतो. सदर जीवाणू (बॅक्टेरिया) टायफाईड झालेल्या रुग्णांच्या रक्तात आणि आतड्यांमध्ये असतो. डायफाईड तापाला विषमज्वर म्हणतात. स्वच्छता बाळगणे गरजेचे आहे. जिल्हा आरोग्य विभागातर्फे स्वच्छता ठेवण्याचे तसेच पावसाळी आजारापासून बचावासाठी उपाय योजना सुचविल्या आहेत.

बॉक्स

जिल्हा फणफणतोय

गत काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्यामुळे त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना ताप, सर्दी, टोकेदुखीसारखे आजार होत आहे.

बॉक्स

आजाराची लक्षणे

ताप येतो तो कमी अधिक होतो. काहींना उलट्या किंवा जुलाबही होतात. पोट दुखणे, खोकला, अतिसार, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा येतो. अशक्तपणा वाढतो, भूक मंदावते आदी लक्षणे टायफाईड या आजारावर दिसत आहे. अशी लक्षणे दिसताच वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.

बॉक्स

टायफाईड होण्याची कारणे

पावसाळ्यात दूषित पाण्याच्या संपर्कातून टायफाईड आजाराची लागण होण्याची शक्यता अधिक असते. मलमुत्राद्वारे दूषित पाण्यातून, माशा बसलेल्या अन्नातून, अस्वच्छ हातांद्वारे हे जीवाणू निरोगी व्यक्तीच्या तोंडातून शरीरात प्रवेश करतात. आतड्यात जावून त्या विषाणुंची संख्या वाढते. त्यानंतर जीवाणू आपला विषारी प्रभाव दाखवू शकतात.