शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

थोर महात्म्यांचा आदर्श ठेवून समाजकार्य करा

By admin | Updated: February 15, 2017 00:30 IST

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ हे ध्येय ठेवून प्रत्येक भारतीयांनी जात, धर्म न पाहता परकीय सत्तेशी एकदिलाने लढा दिला आणि स्वराज्य मिळविणे...

पालोरा येथे जनजागृती कार्यक्रम : तोमेश्वर पंचभाई यांचे प्रतिपादनचिचाळ : ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ हे ध्येय ठेवून प्रत्येक भारतीयांनी जात, धर्म न पाहता परकीय सत्तेशी एकदिलाने लढा दिला आणि स्वराज्य मिळविणे या स्वराज्याचे सुराज्य करण्याचा संकल्प प्रत्येक युवकांनी सोडला पाहिजे. आपल्या स्वातंत्र्यात लढा देणाऱ्या अनेक जाती, धर्म, पंथीयांनी एकत्र येवून दिलेल्या थोर महात्म्यांची प्रत्येक समाज बांधवांनी जाण ठेवण्याचे आवाहन पंचायत समिती सदस्य तोमेश्वर पंचभाई यांनी केले. पालोरा चौ. येथील विदर्भ ग्रामीण पत्रकार संघातर्फे आयोजित जनजागृती मेळाव्यात ते बोलत होते.पवनी तालुक्यातील पालोरा चौ. येथे विदर्भ ग्रामीण पत्रकार संघ पवनी तालुक्याच्या वतीने सर्वधर्मियांचा जनजागृती मेळावा आयोजित केला होता. अध्यक्षस्भानी पं.स. सदस्य तोमेश्वर पंचभाई, प्रमुख अतिथी प्रबुद्ध विद्यालय कन्हाळगाव संचालक अरविंद धारगावे, भाजपा युवक मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मुनिर शेख, माजी सरपंच पालोरा दिलीप धारगावे, माजी नगराध्यक्ष भाष्कर रणदिवे जि.प. सदस्या मनोरमा जांभुळे, जि.प. माजी अध्यक्षा किसनबाई भानारकर, डॉ. राजेश गोंडाणे, उपसरपंच बाम्हणी द्रोपत धारगावे, संदीप मांढरे, माजी सभापती शिवशंकर मुंगाटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.सर्व प्रथम कार्यक्रमाची सुरूवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतीबा फुले, महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे प्रतिमेला माल्यार्पण व दिप प्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. तोमेश्वर पंचभाई पुढे म्हणाले उत्कृष्ट देशप्रेम, नि:स्वार्थी वृत्ती सुहदयता ही भारती यांची वैशिष्ट्ये आज लोप पावली आहेत. त्यामुळे सर्व क्षेत्रात सर्व पातळ्यावर भ्रष्टाचार फोफावल आहे. भ्रष्टाचार हा मानवी समाजाला झालेला महारोग आहे. भारतीयांचे नैतिक अध पतन सहन न होणाऱ्या युवकांनी आता संघटितपणे प्रयत्न करून समाजातील अपप्रवृत्तीचा बिमोड केला पाहिजे. मानव धर्माचा स्विकार करून जाती, पंथ, धर्म व त्यातून उद्भवणारे संघर्ष गाडून टाकले पाहिजे, असे म्हणाले. अरविंद धारगावे यांनी डॉ. बाबासाहेब यांच्या जीवनावर प्रकाश टाकूण बाबा साहेबांनी सांगितलेल्या शिका संघटीत व्हा व संघर्ष करा या उक्तीचा संदेश सांगून घटनेत दिलेला अधिकार कुणी देण्यास इन्कार करित असेल तर तो अधिकार घेण्यास मागे येवू नका वेळ प्रसंगाने संघर्ष करा तरच तुमचा हक्क तुम्हाला मिळेल, असे ते आपल्या भाषणात म्हणाले तर भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मुनिर शेख यांनी महानत्यागी बाबा जुमदेव यांनी १९४९ ला मानव धर्माची स्थापना करून चार तत्व, तीन शब्द व पाच नियमाची शिकवण देवून अंधश्रद्धेत ग्रासलेल्या मद्य प्राशन करणाऱ्या अनेक कुटूंबांना मानव धर्माच्या शिकवणीने कुटूंब उध्वस्त होण्यापासून सुखी केले त्या मानव धर्माचा जनतेनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी पाहुण्यांचे हस्ते राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचे शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. यामध्ये जगदीश लक्ष्मण उपतळे, गणेश पुरूषोत्तम ब्राम्हणकर, प्रकाश किसन हातेल, संध्या वासनिक, रविंद्र भोयर, अरविंद धारगावे, चंद्रशेखर कठाणे, शिशुपाल रामटेके, द्रोपद धारगावे, निशाद लांजेवार, विक्की पचारे, मोहन हरडे आदींना गौरविण्यात आले. संचालन मनोहर मेश्राम प्रास्ताविक निश्चित मेश्राम व आभार विक्की पचारे यांनी केले. (वार्ताहर)