शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

पालकमंत्र्यांना जिल्हाभरात येण्यास मनाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 22:31 IST

यावर्षीही शेतकरी अस्मानी संकटाचा सामना करतोय, शासन मात्र शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर घालत आहे. वीज जोडणीसाठी अजूनही अनेक शेतकरी प्रतिक्षा करीत आहेत. कोरडे अन् खोटे आश्वासन देणाऱ्या पालकमंत्र्यांनी गावात व शहरात फिरायला मनाई करावी, असे आवाहन माजी खासदार नाना पटोले यांनी केले आहे.

ठळक मुद्देकोरडे आश्वासन : माजी खासदार नाना पटोले यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : यावर्षीही शेतकरी अस्मानी संकटाचा सामना करतोय, शासन मात्र शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर घालत आहे. वीज जोडणीसाठी अजूनही अनेक शेतकरी प्रतिक्षा करीत आहेत. कोरडे अन् खोटे आश्वासन देणाऱ्या पालकमंत्र्यांनी गावात व शहरात फिरायला मनाई करावी, असे आवाहन माजी खासदार नाना पटोले यांनी केले आहे.मागील तीन आठवड्यापासून भंडारा जिल्ह्यात पावसाचा पता नाही. रोवणी केलेली भात पिके कामेजली आहेत. शेतजमिनीला भेगा पडणे सुरु झाले आहे. अजूनही अर्ध्यापेक्षा भात शेतीची रोवणी केली नाही. त्यामुळे जिलह्यात दुष्काळ सदृष्य निर्माण झाली.शासकीय योजनेतून अनेक शेतकºयांनी विहिर तयार केल्या आहेत. मात्र विहिरीत पाणी असूनही विद्युत जोडणी अभावी भात पिकाला सिंचन करता येत नाही. या संपूर्ण बाबीला जबाबदार उर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असल्याचा आरोप माजी खासदार व काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.शेतकºयांना आशेवर ठेवून त्यांना कर्जाच्या ओझ्यात दाबण्याचे काम उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे करीत आहेत. शेतकऱ्यांना जीवंतपणी मरणयातना देण्याºया पापाचा घडा भाजपचा भरला आहे. जुमले बाजी करुन शेतकऱ्यांना, सामान्य जनतेला मुर्ख बनविणाºया भारतीय जनता पक्षाचे मुखमंत्री व त्यांचे मंत्री करीत असल्याचा घाणाघाती आरोप नाना पटोले यांनी केला आहे.पालकमंत्री व उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय कधी घेतील, कृषी वीज जोडणी मागणी करणाºया शेतकऱ्यांना वीज कधी मिळेल हा प्रश्न आता प्रत्येक शेतकऱ्यांनी विचारला पाहिजे. शेतकऱ्यांना कृत्रिम पध्दतीने कर्जाच्याखाईत ठकलणाऱ्यां पालकमंत्र्यांना गावात शिरु देवू नका असे आवाहन माजी खासदार नाना पटोले यांनी केला.दुप्पट शेतपिकांना भाव देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या शासनाने खताचे भाव वाढविले, किटकनाशके व बियाण्यांचे भाव वाढवून शेतकऱ्यांची गळचेपी केली. एकीकडे भाजप सरकार शेतकºयांसाठी खूप काही करतोय असा भास निर्माण करीत आहे. तर दुसरीकडे शेत पिकांना लागणारी खते, औषधी व इतर भावात वाढ करुन शेतकºयांच्या दुप्पट भाव देण्याच गाजर देण्याच काम भाजप शासन करीत असल्याचाही आरोप माजी खासदार नाना पटोले यांनी केला आहे.शेतकरी आता शहाणा होत असून फडणविसांचे सरकार कसे फसवणूकीचे झाले आहे हे सगळ्यांना समजले आहे. तरी शेतकरी हितापेक्षा स्वहित, धनदांडग्याचे हित जपणाºयांना धडा शिकविण्याचे वेळ आली असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.