शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
2
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
5
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
6
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
7
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
8
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
9
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
10
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
11
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
12
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
13
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
14
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
15
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
16
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
17
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
18
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
19
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
20
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 

पालकमंत्र्यांना जिल्हाभरात येण्यास मनाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 22:31 IST

यावर्षीही शेतकरी अस्मानी संकटाचा सामना करतोय, शासन मात्र शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर घालत आहे. वीज जोडणीसाठी अजूनही अनेक शेतकरी प्रतिक्षा करीत आहेत. कोरडे अन् खोटे आश्वासन देणाऱ्या पालकमंत्र्यांनी गावात व शहरात फिरायला मनाई करावी, असे आवाहन माजी खासदार नाना पटोले यांनी केले आहे.

ठळक मुद्देकोरडे आश्वासन : माजी खासदार नाना पटोले यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : यावर्षीही शेतकरी अस्मानी संकटाचा सामना करतोय, शासन मात्र शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर घालत आहे. वीज जोडणीसाठी अजूनही अनेक शेतकरी प्रतिक्षा करीत आहेत. कोरडे अन् खोटे आश्वासन देणाऱ्या पालकमंत्र्यांनी गावात व शहरात फिरायला मनाई करावी, असे आवाहन माजी खासदार नाना पटोले यांनी केले आहे.मागील तीन आठवड्यापासून भंडारा जिल्ह्यात पावसाचा पता नाही. रोवणी केलेली भात पिके कामेजली आहेत. शेतजमिनीला भेगा पडणे सुरु झाले आहे. अजूनही अर्ध्यापेक्षा भात शेतीची रोवणी केली नाही. त्यामुळे जिलह्यात दुष्काळ सदृष्य निर्माण झाली.शासकीय योजनेतून अनेक शेतकºयांनी विहिर तयार केल्या आहेत. मात्र विहिरीत पाणी असूनही विद्युत जोडणी अभावी भात पिकाला सिंचन करता येत नाही. या संपूर्ण बाबीला जबाबदार उर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असल्याचा आरोप माजी खासदार व काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.शेतकºयांना आशेवर ठेवून त्यांना कर्जाच्या ओझ्यात दाबण्याचे काम उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे करीत आहेत. शेतकऱ्यांना जीवंतपणी मरणयातना देण्याºया पापाचा घडा भाजपचा भरला आहे. जुमले बाजी करुन शेतकऱ्यांना, सामान्य जनतेला मुर्ख बनविणाºया भारतीय जनता पक्षाचे मुखमंत्री व त्यांचे मंत्री करीत असल्याचा घाणाघाती आरोप नाना पटोले यांनी केला आहे.पालकमंत्री व उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय कधी घेतील, कृषी वीज जोडणी मागणी करणाºया शेतकऱ्यांना वीज कधी मिळेल हा प्रश्न आता प्रत्येक शेतकऱ्यांनी विचारला पाहिजे. शेतकऱ्यांना कृत्रिम पध्दतीने कर्जाच्याखाईत ठकलणाऱ्यां पालकमंत्र्यांना गावात शिरु देवू नका असे आवाहन माजी खासदार नाना पटोले यांनी केला.दुप्पट शेतपिकांना भाव देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या शासनाने खताचे भाव वाढविले, किटकनाशके व बियाण्यांचे भाव वाढवून शेतकऱ्यांची गळचेपी केली. एकीकडे भाजप सरकार शेतकºयांसाठी खूप काही करतोय असा भास निर्माण करीत आहे. तर दुसरीकडे शेत पिकांना लागणारी खते, औषधी व इतर भावात वाढ करुन शेतकºयांच्या दुप्पट भाव देण्याच गाजर देण्याच काम भाजप शासन करीत असल्याचाही आरोप माजी खासदार नाना पटोले यांनी केला आहे.शेतकरी आता शहाणा होत असून फडणविसांचे सरकार कसे फसवणूकीचे झाले आहे हे सगळ्यांना समजले आहे. तरी शेतकरी हितापेक्षा स्वहित, धनदांडग्याचे हित जपणाºयांना धडा शिकविण्याचे वेळ आली असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.