शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

पेंचच्या पाण्याऐवजी उपसा सिंचन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 22:48 IST

सिंचनाच्या मुख्य उद्देशाने बांधण्यात आलेल्या पेंच प्रकल्पाचे पाणी नागपूर शहरासाठी राखीव ठेवले. परिणामी लाभक्षेत्रातील ७० गावातील नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. आता आम्हाला पेंच प्रकल्पाचे पाणी नको, उपसा सिंचन योजना द्या अशी मागणी या भागातील शेतकºयांनी केली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : ७० गावांवर दुष्काळाचे कायम सावट

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सिंचनाच्या मुख्य उद्देशाने बांधण्यात आलेल्या पेंच प्रकल्पाचे पाणी नागपूर शहरासाठी राखीव ठेवले. परिणामी लाभक्षेत्रातील ७० गावातील नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. आता आम्हाला पेंच प्रकल्पाचे पाणी नको, उपसा सिंचन योजना द्या अशी मागणी या भागातील शेतकºयांनी केली आहे.पेंच प्रकल्पाच्या वरच्या भागात मध्य प्रदेशात चौराई धरण बांधण्यात आले. त्यामुळे तीन वर्षांपासून भंडारा, मोहाडी आणि नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील गावांना अत्यल्प पाणी मिळत आहे. तसेच गत काही वर्षात अपुरा पाऊस पडत असल्याने पेंच प्रकल्पात जलसाठाही पुरेसा होत नाही. त्यातच या प्रकल्पाचे पाणी नागपूर शहरासाठी राखून ठेवले जाते. दिवसेंदिवस पेंच प्रकल्पाचा पाणीसाठा कमी होत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकºयांना वेळेवर पाणीच मिळत नाही. गत दोन वर्षांपासून या भागातील नागरिकांना सतत दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. वेळेवर सिंचनासाठी पाणी मिळत नाही. कधी पाणी सोडले तर कालवा फुटून पाणी रस्त्यावर वाहून जाते. परिणामी शेतकºयांचे पीक करपून जाते.भंडारा तालुक्यातील ३४, मोहाडी तालुक्यातील १२ आणि मौदा तालुक्यातील २२ गावे या धरणाच्या लाभक्षेत्रात येतात. धान आणि गव्हाची शेती केली जाते. परंतु पाणीच मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आता या प्रकल्पाचे पाणी देण्याऐवजी भंडारा तालुक्यातील लोहारा किंवा पिंपरी चिंचोली येथे उपसा सिंचन योजना तयार करण्याची मागणी होत आहे. या गावांजवळ गोसे धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात असते. तेथून उपसा सिंचन योजना राबवून खंडाळा-पिंपरी भंडाराकडे वाहणाºया जुन्या पेंच प्रकल्पाच्या मुख्य कालव्यात पाईपने पाणी सोडल्यास दुष्काळबाधीत गावांना दिलासा मिळू शकतो. याच गावाजवळून मौदा तालुक्यातील धरणगाव जवळ एका कंपनीला लागणारे पाणी उपसा करून पुरविले जाते. त्यामुळे शेतकºयांसाठी उपसा सिंचन योजना राबवावी अशी मागणी होत आहे. यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य गुंडेराव पाटेकर यांनी पुढाकार घेतला असून संबंधितांना निवेदन दिले आहे.