शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

पेंचच्या पाण्याऐवजी उपसा सिंचन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 22:48 IST

सिंचनाच्या मुख्य उद्देशाने बांधण्यात आलेल्या पेंच प्रकल्पाचे पाणी नागपूर शहरासाठी राखीव ठेवले. परिणामी लाभक्षेत्रातील ७० गावातील नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. आता आम्हाला पेंच प्रकल्पाचे पाणी नको, उपसा सिंचन योजना द्या अशी मागणी या भागातील शेतकºयांनी केली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : ७० गावांवर दुष्काळाचे कायम सावट

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सिंचनाच्या मुख्य उद्देशाने बांधण्यात आलेल्या पेंच प्रकल्पाचे पाणी नागपूर शहरासाठी राखीव ठेवले. परिणामी लाभक्षेत्रातील ७० गावातील नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. आता आम्हाला पेंच प्रकल्पाचे पाणी नको, उपसा सिंचन योजना द्या अशी मागणी या भागातील शेतकºयांनी केली आहे.पेंच प्रकल्पाच्या वरच्या भागात मध्य प्रदेशात चौराई धरण बांधण्यात आले. त्यामुळे तीन वर्षांपासून भंडारा, मोहाडी आणि नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील गावांना अत्यल्प पाणी मिळत आहे. तसेच गत काही वर्षात अपुरा पाऊस पडत असल्याने पेंच प्रकल्पात जलसाठाही पुरेसा होत नाही. त्यातच या प्रकल्पाचे पाणी नागपूर शहरासाठी राखून ठेवले जाते. दिवसेंदिवस पेंच प्रकल्पाचा पाणीसाठा कमी होत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकºयांना वेळेवर पाणीच मिळत नाही. गत दोन वर्षांपासून या भागातील नागरिकांना सतत दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. वेळेवर सिंचनासाठी पाणी मिळत नाही. कधी पाणी सोडले तर कालवा फुटून पाणी रस्त्यावर वाहून जाते. परिणामी शेतकºयांचे पीक करपून जाते.भंडारा तालुक्यातील ३४, मोहाडी तालुक्यातील १२ आणि मौदा तालुक्यातील २२ गावे या धरणाच्या लाभक्षेत्रात येतात. धान आणि गव्हाची शेती केली जाते. परंतु पाणीच मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आता या प्रकल्पाचे पाणी देण्याऐवजी भंडारा तालुक्यातील लोहारा किंवा पिंपरी चिंचोली येथे उपसा सिंचन योजना तयार करण्याची मागणी होत आहे. या गावांजवळ गोसे धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात असते. तेथून उपसा सिंचन योजना राबवून खंडाळा-पिंपरी भंडाराकडे वाहणाºया जुन्या पेंच प्रकल्पाच्या मुख्य कालव्यात पाईपने पाणी सोडल्यास दुष्काळबाधीत गावांना दिलासा मिळू शकतो. याच गावाजवळून मौदा तालुक्यातील धरणगाव जवळ एका कंपनीला लागणारे पाणी उपसा करून पुरविले जाते. त्यामुळे शेतकºयांसाठी उपसा सिंचन योजना राबवावी अशी मागणी होत आहे. यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य गुंडेराव पाटेकर यांनी पुढाकार घेतला असून संबंधितांना निवेदन दिले आहे.