शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

पेंचच्या पाण्याऐवजी उपसा सिंचन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 22:48 IST

सिंचनाच्या मुख्य उद्देशाने बांधण्यात आलेल्या पेंच प्रकल्पाचे पाणी नागपूर शहरासाठी राखीव ठेवले. परिणामी लाभक्षेत्रातील ७० गावातील नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. आता आम्हाला पेंच प्रकल्पाचे पाणी नको, उपसा सिंचन योजना द्या अशी मागणी या भागातील शेतकºयांनी केली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : ७० गावांवर दुष्काळाचे कायम सावट

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सिंचनाच्या मुख्य उद्देशाने बांधण्यात आलेल्या पेंच प्रकल्पाचे पाणी नागपूर शहरासाठी राखीव ठेवले. परिणामी लाभक्षेत्रातील ७० गावातील नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. आता आम्हाला पेंच प्रकल्पाचे पाणी नको, उपसा सिंचन योजना द्या अशी मागणी या भागातील शेतकºयांनी केली आहे.पेंच प्रकल्पाच्या वरच्या भागात मध्य प्रदेशात चौराई धरण बांधण्यात आले. त्यामुळे तीन वर्षांपासून भंडारा, मोहाडी आणि नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील गावांना अत्यल्प पाणी मिळत आहे. तसेच गत काही वर्षात अपुरा पाऊस पडत असल्याने पेंच प्रकल्पात जलसाठाही पुरेसा होत नाही. त्यातच या प्रकल्पाचे पाणी नागपूर शहरासाठी राखून ठेवले जाते. दिवसेंदिवस पेंच प्रकल्पाचा पाणीसाठा कमी होत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकºयांना वेळेवर पाणीच मिळत नाही. गत दोन वर्षांपासून या भागातील नागरिकांना सतत दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. वेळेवर सिंचनासाठी पाणी मिळत नाही. कधी पाणी सोडले तर कालवा फुटून पाणी रस्त्यावर वाहून जाते. परिणामी शेतकºयांचे पीक करपून जाते.भंडारा तालुक्यातील ३४, मोहाडी तालुक्यातील १२ आणि मौदा तालुक्यातील २२ गावे या धरणाच्या लाभक्षेत्रात येतात. धान आणि गव्हाची शेती केली जाते. परंतु पाणीच मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आता या प्रकल्पाचे पाणी देण्याऐवजी भंडारा तालुक्यातील लोहारा किंवा पिंपरी चिंचोली येथे उपसा सिंचन योजना तयार करण्याची मागणी होत आहे. या गावांजवळ गोसे धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात असते. तेथून उपसा सिंचन योजना राबवून खंडाळा-पिंपरी भंडाराकडे वाहणाºया जुन्या पेंच प्रकल्पाच्या मुख्य कालव्यात पाईपने पाणी सोडल्यास दुष्काळबाधीत गावांना दिलासा मिळू शकतो. याच गावाजवळून मौदा तालुक्यातील धरणगाव जवळ एका कंपनीला लागणारे पाणी उपसा करून पुरविले जाते. त्यामुळे शेतकºयांसाठी उपसा सिंचन योजना राबवावी अशी मागणी होत आहे. यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य गुंडेराव पाटेकर यांनी पुढाकार घेतला असून संबंधितांना निवेदन दिले आहे.