शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

तालुक्यांऐवजी जिल्ह्याचे सर्वेक्षण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 22:02 IST

भाजपचे केंद्र व राज्यातील सरकार सर्वच आघाडांवर सपेशल फेल ठरली आहे. महागाई, बेरोजगारी, वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यातच जिल्ह्यात दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे नागरिकांचे सामान्य जीवन विस्कळीत होत आहे. जिल्हा प्रशासनाने सात पैकी तीन तालुक्यात सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देप्रफुल पटेल : पत्रपरिषद धानाला एक हजार रूपये बोनस द्या

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भाजपचे केंद्र व राज्यातील सरकार सर्वच आघाडांवर सपेशल फेल ठरली आहे. महागाई, बेरोजगारी, वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यातच जिल्ह्यात दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे नागरिकांचे सामान्य जीवन विस्कळीत होत आहे. जिल्हा प्रशासनाने सात पैकी तीन तालुक्यात सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा खासदार प्रफूल पटेल यांनी केले.गुरूवारी विजयादशमीनिमित्त भंडारा येथे आगमन झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजता विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत खा. पटेल बोलत होते. ते पुढे म्हणाले, यावर्षीच्या हंगामात पाण्याची गरज असतानाही प्रकल्पाचे पाणी वेळेवर सोडण्यात आले नाही. विशेष म्हणजे याबाबत सदोष नियोजन करण्यात आले. परिणामी शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. त्यातही धान पिकावर रोगांचा प्रादूर्भाव वाढत असल्याने नुकसानीत वाढ होणार आहे. दुसरीकडे ग्रामीण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भारनियमन वाढले आहे. ही सर्व बाब नैसर्गीक आपत्ती नसून मानव निर्मित आहे. पीक विम्याबाबत तर लाभ कुणाला व केव्हा मिळाला याचीही संभ्रमता कायम आहे. शासनाने यासर्व बाबींवर गांभीर्याने लक्ष देवून शेतकºयांना तुर्त दिलासा म्हणून प्रती क्विंटलमागे एक हजार रूपये बोनस द्यावा, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही, असा खणखणीत इशाराही सरकारला दिला.जिल्ह्यातील आरोग्य सेवेबाबत बोलताना खा. पटेल म्हणाले, महिला रुग्णालयाचा प्रश्न अजुनपर्यंत मार्गी लागला नाही. मोठ्या प्र्रमाणात डॉक्टर, परिचारिका यासह अन्य पदे रिक्त आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या बाबतीत प्रशासनाने खेळ मांडला आहे. पुनर्वसन पूर्ण न होता त्यापुर्वीच धरणाची पातळी वाढविल्याने अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतकºयांच्या डोळ्यादेखत धानपिके पाण्याखाली आली आहे. शबरीमाला प्रकरणाबाबत ते म्हणाले की, न्याय व्यवस्थेने संस्कृती व परंपरेला व तसेच नागरिकांच्या भावनांना लक्षात घेवून संतुलीत निर्णय घेतला पाहिजे, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे.पत्रकार परिषदेला माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, प्रदेश सचिव धनंजय दलाल, जयंत वैरागडे, रामलाल चौधरी, यशवंत सोनकुसरे यासह राकाँचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.