शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

तालुक्यांऐवजी जिल्ह्याचे सर्वेक्षण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 22:02 IST

भाजपचे केंद्र व राज्यातील सरकार सर्वच आघाडांवर सपेशल फेल ठरली आहे. महागाई, बेरोजगारी, वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यातच जिल्ह्यात दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे नागरिकांचे सामान्य जीवन विस्कळीत होत आहे. जिल्हा प्रशासनाने सात पैकी तीन तालुक्यात सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देप्रफुल पटेल : पत्रपरिषद धानाला एक हजार रूपये बोनस द्या

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भाजपचे केंद्र व राज्यातील सरकार सर्वच आघाडांवर सपेशल फेल ठरली आहे. महागाई, बेरोजगारी, वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यातच जिल्ह्यात दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे नागरिकांचे सामान्य जीवन विस्कळीत होत आहे. जिल्हा प्रशासनाने सात पैकी तीन तालुक्यात सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा खासदार प्रफूल पटेल यांनी केले.गुरूवारी विजयादशमीनिमित्त भंडारा येथे आगमन झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजता विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत खा. पटेल बोलत होते. ते पुढे म्हणाले, यावर्षीच्या हंगामात पाण्याची गरज असतानाही प्रकल्पाचे पाणी वेळेवर सोडण्यात आले नाही. विशेष म्हणजे याबाबत सदोष नियोजन करण्यात आले. परिणामी शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. त्यातही धान पिकावर रोगांचा प्रादूर्भाव वाढत असल्याने नुकसानीत वाढ होणार आहे. दुसरीकडे ग्रामीण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भारनियमन वाढले आहे. ही सर्व बाब नैसर्गीक आपत्ती नसून मानव निर्मित आहे. पीक विम्याबाबत तर लाभ कुणाला व केव्हा मिळाला याचीही संभ्रमता कायम आहे. शासनाने यासर्व बाबींवर गांभीर्याने लक्ष देवून शेतकºयांना तुर्त दिलासा म्हणून प्रती क्विंटलमागे एक हजार रूपये बोनस द्यावा, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही, असा खणखणीत इशाराही सरकारला दिला.जिल्ह्यातील आरोग्य सेवेबाबत बोलताना खा. पटेल म्हणाले, महिला रुग्णालयाचा प्रश्न अजुनपर्यंत मार्गी लागला नाही. मोठ्या प्र्रमाणात डॉक्टर, परिचारिका यासह अन्य पदे रिक्त आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या बाबतीत प्रशासनाने खेळ मांडला आहे. पुनर्वसन पूर्ण न होता त्यापुर्वीच धरणाची पातळी वाढविल्याने अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतकºयांच्या डोळ्यादेखत धानपिके पाण्याखाली आली आहे. शबरीमाला प्रकरणाबाबत ते म्हणाले की, न्याय व्यवस्थेने संस्कृती व परंपरेला व तसेच नागरिकांच्या भावनांना लक्षात घेवून संतुलीत निर्णय घेतला पाहिजे, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे.पत्रकार परिषदेला माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, प्रदेश सचिव धनंजय दलाल, जयंत वैरागडे, रामलाल चौधरी, यशवंत सोनकुसरे यासह राकाँचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.