शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

शहर रेल्वेस्थानक निर्मिती ठरतेय दिवास्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 21:46 IST

भंडारा शहराच्या विकासाचे गमक ठरू पाहणाऱ्या शहर रेल्वे (शटल) विकासाचे स्वप्न चार दशकांपासून अधांतरी आहे. रेल्वे यात्री समितीच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष व विकासाच्या बाबीकडे कानाडोळा केल्याने खऱ्या अर्थाने शहराचा विकास खुंटलेला आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : भंडारातील रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा शहराच्या विकासाचे गमक ठरू पाहणाऱ्या शहर रेल्वे (शटल) विकासाचे स्वप्न चार दशकांपासून अधांतरी आहे. रेल्वे यात्री समितीच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष व विकासाच्या बाबीकडे कानाडोळा केल्याने खऱ्या अर्थाने शहराचा विकास खुंटलेला आहे.चार दशकांपासून भंडारा शहर ते वरठी रोड रेल्वे स्थानकापर्यंत शटल रेल्वे सेवा सुरु करावी अशी भंडारावासीयांची मुख्य मागणी आहे. सन २०१४ मध्ये रेल्वे बोर्डाचे दिल्ली येथील अधिकारी, लोकप्रतिनिधी व रेल यात्री समितीच्या पदाधिकाऱ्यांसह यावर सखोल चर्चा करण्यात आली होती.यात भंडारा, जवाहरनगर रेल्वे लाईन विद्युतीकरण झाले असल्याची बाब स्पष्ट करण्यात आली होती. मात्र फक्त ९ कि.मी. रेल्वे लाईन असलेल्या राजीव गांधी चौक ते भंडारा रोड (वरठी) अशी शटल ट्रेन सुरु करण्याची एकमेव मागणी रेल्वे यात्री समितीने केली होती.या मागणीवर रेल्वे बोर्डाने गांभीर्याने विचार केला नाही. विशेष म्हणजे त्यावेळी एक वेळा नव्हे तब्बल तीन वेळा या लाईनची दुरुस्ती नवीनीकरणाचे कार्यही करण्यात आले होते. त्याउपरही रेल्वे रुळावर ट्रॉली चालवून डागडुजी करण्यात आली होती. मात्र काळाच्या ओघात हा मुख्य प्रश्न रेंगाळत राहिला.दोन दशकांपूर्वी सुरू होता रूळाचा वापरभंडारातील रेल्वे स्थानक उभारणीची जागा संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु २० वर्षांपूर्वी जवाहरनगर आयुध निर्माणीने या रेल्वेचा वापर संपुष्टात आणल्याचे दिसून येते. रेल्वे मंतालय व संरक्षण मंत्रालयाच्या निर्णयानंतर हा प्रश्न निकाली िनघू शकतो. परंतु राजकीय इच्छाशक्ती यासाठी कमी पडत असल्याचे जाणवते. भंडारा शहर रेल्वे स्थानक स्थापन करण्याची योजना पूर्ण तयार होती. मात्र त्यावेळी रेल्वे बोर्डाने आर्थिक कारण पुढे करून जवाहरनगर ते वरठी रेल्वे स्टेशन पर्यंतचा प्रस्तावच मागे ठेवला. राज्य शासनाच्या वतीनेही यावर पाठपुरावा करण्यात आलेला नाही. लोकप्रतिनिधींसह नागरिकांच्या सहकार्याशिवाय भंडारात रेल्वे स्थानकाचा प्रश्न निकाली निघू शकणार नाही हीच तेवढी सत्य बाब आहे.३० कोटींचा खर्च अपेक्षितकाळानुरुप भंडारा शटल रेल्वे निर्मितीचा प्रस्ताव अधांतरी गेल्याने काळानुरुप त्यावर खर्चही वाढत गेला. आधी १० कोटी रुपये खर्चून सदर स्थानक निर्मितीसह रेल्वे लाईनची दुरुस्तीही होऊ शकत होती. मात्र विद्यमान स्थितीत हाच खर्च ३० कोटींच्या घरात पोहचला आहे. राजीव गांधी चौकात रेल्वे स्टेशन निर्माण झाल्यास हाकेच्या अंतरावर राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहतूक, परिवहन, रॅक पॉर्इंट, गोडाऊन, लहान मोठे व्यवसाय व परिणामी रोजगाराच्या संधी हमखास उपलब्ध होऊ शकतात. विशेष म्हणजे रेल्वे स्थानक निर्मितीची जागा अनेक वर्षांपासून बेवारस स्थितीत आहे. या जागेवर काही लोकांनी अतिक्रमणही केले आहे. यावर रेल्वे यात्री समितीने वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा केला आहे. परंतु महत्वपूर्ण रेल्वेच्या एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्यासह स्थानक निर्मितीचा प्रस्ताव धूळ खात आहे.