शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

शहर रेल्वेस्थानक निर्मिती ठरतेय दिवास्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 21:46 IST

भंडारा शहराच्या विकासाचे गमक ठरू पाहणाऱ्या शहर रेल्वे (शटल) विकासाचे स्वप्न चार दशकांपासून अधांतरी आहे. रेल्वे यात्री समितीच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष व विकासाच्या बाबीकडे कानाडोळा केल्याने खऱ्या अर्थाने शहराचा विकास खुंटलेला आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : भंडारातील रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा शहराच्या विकासाचे गमक ठरू पाहणाऱ्या शहर रेल्वे (शटल) विकासाचे स्वप्न चार दशकांपासून अधांतरी आहे. रेल्वे यात्री समितीच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष व विकासाच्या बाबीकडे कानाडोळा केल्याने खऱ्या अर्थाने शहराचा विकास खुंटलेला आहे.चार दशकांपासून भंडारा शहर ते वरठी रोड रेल्वे स्थानकापर्यंत शटल रेल्वे सेवा सुरु करावी अशी भंडारावासीयांची मुख्य मागणी आहे. सन २०१४ मध्ये रेल्वे बोर्डाचे दिल्ली येथील अधिकारी, लोकप्रतिनिधी व रेल यात्री समितीच्या पदाधिकाऱ्यांसह यावर सखोल चर्चा करण्यात आली होती.यात भंडारा, जवाहरनगर रेल्वे लाईन विद्युतीकरण झाले असल्याची बाब स्पष्ट करण्यात आली होती. मात्र फक्त ९ कि.मी. रेल्वे लाईन असलेल्या राजीव गांधी चौक ते भंडारा रोड (वरठी) अशी शटल ट्रेन सुरु करण्याची एकमेव मागणी रेल्वे यात्री समितीने केली होती.या मागणीवर रेल्वे बोर्डाने गांभीर्याने विचार केला नाही. विशेष म्हणजे त्यावेळी एक वेळा नव्हे तब्बल तीन वेळा या लाईनची दुरुस्ती नवीनीकरणाचे कार्यही करण्यात आले होते. त्याउपरही रेल्वे रुळावर ट्रॉली चालवून डागडुजी करण्यात आली होती. मात्र काळाच्या ओघात हा मुख्य प्रश्न रेंगाळत राहिला.दोन दशकांपूर्वी सुरू होता रूळाचा वापरभंडारातील रेल्वे स्थानक उभारणीची जागा संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु २० वर्षांपूर्वी जवाहरनगर आयुध निर्माणीने या रेल्वेचा वापर संपुष्टात आणल्याचे दिसून येते. रेल्वे मंतालय व संरक्षण मंत्रालयाच्या निर्णयानंतर हा प्रश्न निकाली िनघू शकतो. परंतु राजकीय इच्छाशक्ती यासाठी कमी पडत असल्याचे जाणवते. भंडारा शहर रेल्वे स्थानक स्थापन करण्याची योजना पूर्ण तयार होती. मात्र त्यावेळी रेल्वे बोर्डाने आर्थिक कारण पुढे करून जवाहरनगर ते वरठी रेल्वे स्टेशन पर्यंतचा प्रस्तावच मागे ठेवला. राज्य शासनाच्या वतीनेही यावर पाठपुरावा करण्यात आलेला नाही. लोकप्रतिनिधींसह नागरिकांच्या सहकार्याशिवाय भंडारात रेल्वे स्थानकाचा प्रश्न निकाली निघू शकणार नाही हीच तेवढी सत्य बाब आहे.३० कोटींचा खर्च अपेक्षितकाळानुरुप भंडारा शटल रेल्वे निर्मितीचा प्रस्ताव अधांतरी गेल्याने काळानुरुप त्यावर खर्चही वाढत गेला. आधी १० कोटी रुपये खर्चून सदर स्थानक निर्मितीसह रेल्वे लाईनची दुरुस्तीही होऊ शकत होती. मात्र विद्यमान स्थितीत हाच खर्च ३० कोटींच्या घरात पोहचला आहे. राजीव गांधी चौकात रेल्वे स्टेशन निर्माण झाल्यास हाकेच्या अंतरावर राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहतूक, परिवहन, रॅक पॉर्इंट, गोडाऊन, लहान मोठे व्यवसाय व परिणामी रोजगाराच्या संधी हमखास उपलब्ध होऊ शकतात. विशेष म्हणजे रेल्वे स्थानक निर्मितीची जागा अनेक वर्षांपासून बेवारस स्थितीत आहे. या जागेवर काही लोकांनी अतिक्रमणही केले आहे. यावर रेल्वे यात्री समितीने वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा केला आहे. परंतु महत्वपूर्ण रेल्वेच्या एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्यासह स्थानक निर्मितीचा प्रस्ताव धूळ खात आहे.