शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शहर रेल्वेस्थानक निर्मिती ठरतेय दिवास्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 21:46 IST

भंडारा शहराच्या विकासाचे गमक ठरू पाहणाऱ्या शहर रेल्वे (शटल) विकासाचे स्वप्न चार दशकांपासून अधांतरी आहे. रेल्वे यात्री समितीच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष व विकासाच्या बाबीकडे कानाडोळा केल्याने खऱ्या अर्थाने शहराचा विकास खुंटलेला आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : भंडारातील रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा शहराच्या विकासाचे गमक ठरू पाहणाऱ्या शहर रेल्वे (शटल) विकासाचे स्वप्न चार दशकांपासून अधांतरी आहे. रेल्वे यात्री समितीच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष व विकासाच्या बाबीकडे कानाडोळा केल्याने खऱ्या अर्थाने शहराचा विकास खुंटलेला आहे.चार दशकांपासून भंडारा शहर ते वरठी रोड रेल्वे स्थानकापर्यंत शटल रेल्वे सेवा सुरु करावी अशी भंडारावासीयांची मुख्य मागणी आहे. सन २०१४ मध्ये रेल्वे बोर्डाचे दिल्ली येथील अधिकारी, लोकप्रतिनिधी व रेल यात्री समितीच्या पदाधिकाऱ्यांसह यावर सखोल चर्चा करण्यात आली होती.यात भंडारा, जवाहरनगर रेल्वे लाईन विद्युतीकरण झाले असल्याची बाब स्पष्ट करण्यात आली होती. मात्र फक्त ९ कि.मी. रेल्वे लाईन असलेल्या राजीव गांधी चौक ते भंडारा रोड (वरठी) अशी शटल ट्रेन सुरु करण्याची एकमेव मागणी रेल्वे यात्री समितीने केली होती.या मागणीवर रेल्वे बोर्डाने गांभीर्याने विचार केला नाही. विशेष म्हणजे त्यावेळी एक वेळा नव्हे तब्बल तीन वेळा या लाईनची दुरुस्ती नवीनीकरणाचे कार्यही करण्यात आले होते. त्याउपरही रेल्वे रुळावर ट्रॉली चालवून डागडुजी करण्यात आली होती. मात्र काळाच्या ओघात हा मुख्य प्रश्न रेंगाळत राहिला.दोन दशकांपूर्वी सुरू होता रूळाचा वापरभंडारातील रेल्वे स्थानक उभारणीची जागा संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु २० वर्षांपूर्वी जवाहरनगर आयुध निर्माणीने या रेल्वेचा वापर संपुष्टात आणल्याचे दिसून येते. रेल्वे मंतालय व संरक्षण मंत्रालयाच्या निर्णयानंतर हा प्रश्न निकाली िनघू शकतो. परंतु राजकीय इच्छाशक्ती यासाठी कमी पडत असल्याचे जाणवते. भंडारा शहर रेल्वे स्थानक स्थापन करण्याची योजना पूर्ण तयार होती. मात्र त्यावेळी रेल्वे बोर्डाने आर्थिक कारण पुढे करून जवाहरनगर ते वरठी रेल्वे स्टेशन पर्यंतचा प्रस्तावच मागे ठेवला. राज्य शासनाच्या वतीनेही यावर पाठपुरावा करण्यात आलेला नाही. लोकप्रतिनिधींसह नागरिकांच्या सहकार्याशिवाय भंडारात रेल्वे स्थानकाचा प्रश्न निकाली निघू शकणार नाही हीच तेवढी सत्य बाब आहे.३० कोटींचा खर्च अपेक्षितकाळानुरुप भंडारा शटल रेल्वे निर्मितीचा प्रस्ताव अधांतरी गेल्याने काळानुरुप त्यावर खर्चही वाढत गेला. आधी १० कोटी रुपये खर्चून सदर स्थानक निर्मितीसह रेल्वे लाईनची दुरुस्तीही होऊ शकत होती. मात्र विद्यमान स्थितीत हाच खर्च ३० कोटींच्या घरात पोहचला आहे. राजीव गांधी चौकात रेल्वे स्टेशन निर्माण झाल्यास हाकेच्या अंतरावर राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहतूक, परिवहन, रॅक पॉर्इंट, गोडाऊन, लहान मोठे व्यवसाय व परिणामी रोजगाराच्या संधी हमखास उपलब्ध होऊ शकतात. विशेष म्हणजे रेल्वे स्थानक निर्मितीची जागा अनेक वर्षांपासून बेवारस स्थितीत आहे. या जागेवर काही लोकांनी अतिक्रमणही केले आहे. यावर रेल्वे यात्री समितीने वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा केला आहे. परंतु महत्वपूर्ण रेल्वेच्या एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्यासह स्थानक निर्मितीचा प्रस्ताव धूळ खात आहे.