शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

जिल्हा तापाने फणफणला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:40 IST

भंडारा जिल्हा हा तलावाचा जिल्हा आहे. प्रत्येक गावात तलाव आहे. पावसाळ्यात या तलावांमध्ये माेठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली आहे. ...

भंडारा जिल्हा हा तलावाचा जिल्हा आहे. प्रत्येक गावात तलाव आहे. पावसाळ्यात या तलावांमध्ये माेठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली आहे. यासाेबतच रस्त्यावरील खड्डे, तुंबलेली गटारे, पाण्याची डबकी यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच वातावरणात सातत्याने बदल हाेत असल्याने विविध आजारांनी डाेके वर काढले आहे. सर्दी, अंगदुखी, खाेकला, ताप, डिहायड्रेशन, अंगावर चट्टे, जिभेला चव नसने, प्लेट लेट कमी असणे असे रुग्ण आता वाढीस लागले आहे.

काेराेनामुळे नागरिक आधीच धास्तावलेले आहेत. जिल्ह्यात काेराेनाचे रुग्ण नसले तरी नागरिकांच्या मनात काेराेनाची भीती कायम आहे. त्यामुळे अनेकजण अंगावरच आजार काढताना दिसत आहे. घरीच गाेळ्या घेऊन आजार काढत असल्याचे दिसत आहे. यामुळे ही साथ वाढीस लागली आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात आणि बहुतांश सर्वच गावात असे रुग्ण दिसून येत आहे.

जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण भागातील खासगी दवाखान्यांमध्ये गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाच्या जिल्हा आराेग्य यंत्रणेच्या वतीने जनजागृतीवर भर दिला जात असून, आराेग्य यंत्रणाही सक्षमपणे कामाला लागली आहे.

बाॅक्स

जिल्ह्यात डेंग्यूच्या १५ रुग्णांची नाेंद

ग्रामीण भागात डेंग्यूचा प्रकाेप वाढला आहे. जानेवारी ते जुलै या कालावधीत ३३५ व्यक्तींची चाचणी करण्यात आली हाेती. त्यात १५ रुग्ण डेंग्यूचे आढळून आले आहेत. अनेकदा खासगी प्रयाेगशाळेत तपासणी केली जाते. तेथे डेंग्यूसदृश लक्षणे असली तरी डेंग्यू म्हणूनच सांगितले जाते. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरत आहे. शासकीय मानकानुसार डेंग्यूची नाेंद आराेग्य विभाग करीत असते. परंतु खासगी प्रयाेगशाळेतील अहवालाने नागरिकांच्या भीतीत भर घातली आहे. आराेग्य विभाग याबाबत वारंवार सूचना देत असल्या तरी गावकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

बाॅक्स

अशी घ्या काळजी

डेंग्यू अथवा साथीचे आजार हाेऊ नये म्हणून नागरिकांनी गावातील गटारे, नाल्या वाहती करणे आवश्यक आहे. घराचा परिसर व गुरांचे गाेठे नेहमीच स्वच्छ ठेवावे. शेणखताचे खड्डे लांब अंतरावर असावे, घाणीच्या ठिकाणी मॅलेथियान किटकनाशक पावडराचे धुरळे करावी, घराच्या आसपास सांडपाणी साठवू देऊ नये. डासापासून बचावासाठी मच्छरदाणीचा उपयाेग करावा. आठवड्यातून एक दिवस काेरडा दिवस पाळावा या उपाययाेजनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी केले आहे.

बाॅक्स

तत्काळ डाॅक्टरांचा सल्ला घ्या

१५ वर्षांखालील मुलांना अचानक ताप येणे, वर्तणुकीत बदल हाेणे, झटके व तत्काळ बेशुद्ध पडणे, अशी लक्षणे आढळून आल्यास सदरहू रुग्णाला तात्काळ जवळच्या रुग्णालयात जाऊन डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.

काेट

ग्रामीण भागात साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आराेग्य यंत्रणा प्रभावीपणे काम करीत आहे. कर्मचाऱ्यांमार्फत गावनिहाय सर्वेक्षण केले जात आहे. पाणी साठ्यांची तपासणी करुन शुद्धीकरणासाठी मार्गदर्शन केले जात आहे. नागरिकांनी या काळात काळजी घ्यावी.

- डाॅ. आदिती त्याडी

जिल्हा हिवताप अधिकारी