शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा तापाने फणफणला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:40 IST

भंडारा जिल्हा हा तलावाचा जिल्हा आहे. प्रत्येक गावात तलाव आहे. पावसाळ्यात या तलावांमध्ये माेठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली आहे. ...

भंडारा जिल्हा हा तलावाचा जिल्हा आहे. प्रत्येक गावात तलाव आहे. पावसाळ्यात या तलावांमध्ये माेठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली आहे. यासाेबतच रस्त्यावरील खड्डे, तुंबलेली गटारे, पाण्याची डबकी यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच वातावरणात सातत्याने बदल हाेत असल्याने विविध आजारांनी डाेके वर काढले आहे. सर्दी, अंगदुखी, खाेकला, ताप, डिहायड्रेशन, अंगावर चट्टे, जिभेला चव नसने, प्लेट लेट कमी असणे असे रुग्ण आता वाढीस लागले आहे.

काेराेनामुळे नागरिक आधीच धास्तावलेले आहेत. जिल्ह्यात काेराेनाचे रुग्ण नसले तरी नागरिकांच्या मनात काेराेनाची भीती कायम आहे. त्यामुळे अनेकजण अंगावरच आजार काढताना दिसत आहे. घरीच गाेळ्या घेऊन आजार काढत असल्याचे दिसत आहे. यामुळे ही साथ वाढीस लागली आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात आणि बहुतांश सर्वच गावात असे रुग्ण दिसून येत आहे.

जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण भागातील खासगी दवाखान्यांमध्ये गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाच्या जिल्हा आराेग्य यंत्रणेच्या वतीने जनजागृतीवर भर दिला जात असून, आराेग्य यंत्रणाही सक्षमपणे कामाला लागली आहे.

बाॅक्स

जिल्ह्यात डेंग्यूच्या १५ रुग्णांची नाेंद

ग्रामीण भागात डेंग्यूचा प्रकाेप वाढला आहे. जानेवारी ते जुलै या कालावधीत ३३५ व्यक्तींची चाचणी करण्यात आली हाेती. त्यात १५ रुग्ण डेंग्यूचे आढळून आले आहेत. अनेकदा खासगी प्रयाेगशाळेत तपासणी केली जाते. तेथे डेंग्यूसदृश लक्षणे असली तरी डेंग्यू म्हणूनच सांगितले जाते. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरत आहे. शासकीय मानकानुसार डेंग्यूची नाेंद आराेग्य विभाग करीत असते. परंतु खासगी प्रयाेगशाळेतील अहवालाने नागरिकांच्या भीतीत भर घातली आहे. आराेग्य विभाग याबाबत वारंवार सूचना देत असल्या तरी गावकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

बाॅक्स

अशी घ्या काळजी

डेंग्यू अथवा साथीचे आजार हाेऊ नये म्हणून नागरिकांनी गावातील गटारे, नाल्या वाहती करणे आवश्यक आहे. घराचा परिसर व गुरांचे गाेठे नेहमीच स्वच्छ ठेवावे. शेणखताचे खड्डे लांब अंतरावर असावे, घाणीच्या ठिकाणी मॅलेथियान किटकनाशक पावडराचे धुरळे करावी, घराच्या आसपास सांडपाणी साठवू देऊ नये. डासापासून बचावासाठी मच्छरदाणीचा उपयाेग करावा. आठवड्यातून एक दिवस काेरडा दिवस पाळावा या उपाययाेजनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी केले आहे.

बाॅक्स

तत्काळ डाॅक्टरांचा सल्ला घ्या

१५ वर्षांखालील मुलांना अचानक ताप येणे, वर्तणुकीत बदल हाेणे, झटके व तत्काळ बेशुद्ध पडणे, अशी लक्षणे आढळून आल्यास सदरहू रुग्णाला तात्काळ जवळच्या रुग्णालयात जाऊन डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.

काेट

ग्रामीण भागात साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आराेग्य यंत्रणा प्रभावीपणे काम करीत आहे. कर्मचाऱ्यांमार्फत गावनिहाय सर्वेक्षण केले जात आहे. पाणी साठ्यांची तपासणी करुन शुद्धीकरणासाठी मार्गदर्शन केले जात आहे. नागरिकांनी या काळात काळजी घ्यावी.

- डाॅ. आदिती त्याडी

जिल्हा हिवताप अधिकारी