शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

जिल्हा तापाने फणफणला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:40 IST

भंडारा जिल्हा हा तलावाचा जिल्हा आहे. प्रत्येक गावात तलाव आहे. पावसाळ्यात या तलावांमध्ये माेठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली आहे. ...

भंडारा जिल्हा हा तलावाचा जिल्हा आहे. प्रत्येक गावात तलाव आहे. पावसाळ्यात या तलावांमध्ये माेठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली आहे. यासाेबतच रस्त्यावरील खड्डे, तुंबलेली गटारे, पाण्याची डबकी यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच वातावरणात सातत्याने बदल हाेत असल्याने विविध आजारांनी डाेके वर काढले आहे. सर्दी, अंगदुखी, खाेकला, ताप, डिहायड्रेशन, अंगावर चट्टे, जिभेला चव नसने, प्लेट लेट कमी असणे असे रुग्ण आता वाढीस लागले आहे.

काेराेनामुळे नागरिक आधीच धास्तावलेले आहेत. जिल्ह्यात काेराेनाचे रुग्ण नसले तरी नागरिकांच्या मनात काेराेनाची भीती कायम आहे. त्यामुळे अनेकजण अंगावरच आजार काढताना दिसत आहे. घरीच गाेळ्या घेऊन आजार काढत असल्याचे दिसत आहे. यामुळे ही साथ वाढीस लागली आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात आणि बहुतांश सर्वच गावात असे रुग्ण दिसून येत आहे.

जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण भागातील खासगी दवाखान्यांमध्ये गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाच्या जिल्हा आराेग्य यंत्रणेच्या वतीने जनजागृतीवर भर दिला जात असून, आराेग्य यंत्रणाही सक्षमपणे कामाला लागली आहे.

बाॅक्स

जिल्ह्यात डेंग्यूच्या १५ रुग्णांची नाेंद

ग्रामीण भागात डेंग्यूचा प्रकाेप वाढला आहे. जानेवारी ते जुलै या कालावधीत ३३५ व्यक्तींची चाचणी करण्यात आली हाेती. त्यात १५ रुग्ण डेंग्यूचे आढळून आले आहेत. अनेकदा खासगी प्रयाेगशाळेत तपासणी केली जाते. तेथे डेंग्यूसदृश लक्षणे असली तरी डेंग्यू म्हणूनच सांगितले जाते. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरत आहे. शासकीय मानकानुसार डेंग्यूची नाेंद आराेग्य विभाग करीत असते. परंतु खासगी प्रयाेगशाळेतील अहवालाने नागरिकांच्या भीतीत भर घातली आहे. आराेग्य विभाग याबाबत वारंवार सूचना देत असल्या तरी गावकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

बाॅक्स

अशी घ्या काळजी

डेंग्यू अथवा साथीचे आजार हाेऊ नये म्हणून नागरिकांनी गावातील गटारे, नाल्या वाहती करणे आवश्यक आहे. घराचा परिसर व गुरांचे गाेठे नेहमीच स्वच्छ ठेवावे. शेणखताचे खड्डे लांब अंतरावर असावे, घाणीच्या ठिकाणी मॅलेथियान किटकनाशक पावडराचे धुरळे करावी, घराच्या आसपास सांडपाणी साठवू देऊ नये. डासापासून बचावासाठी मच्छरदाणीचा उपयाेग करावा. आठवड्यातून एक दिवस काेरडा दिवस पाळावा या उपाययाेजनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी केले आहे.

बाॅक्स

तत्काळ डाॅक्टरांचा सल्ला घ्या

१५ वर्षांखालील मुलांना अचानक ताप येणे, वर्तणुकीत बदल हाेणे, झटके व तत्काळ बेशुद्ध पडणे, अशी लक्षणे आढळून आल्यास सदरहू रुग्णाला तात्काळ जवळच्या रुग्णालयात जाऊन डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.

काेट

ग्रामीण भागात साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आराेग्य यंत्रणा प्रभावीपणे काम करीत आहे. कर्मचाऱ्यांमार्फत गावनिहाय सर्वेक्षण केले जात आहे. पाणी साठ्यांची तपासणी करुन शुद्धीकरणासाठी मार्गदर्शन केले जात आहे. नागरिकांनी या काळात काळजी घ्यावी.

- डाॅ. आदिती त्याडी

जिल्हा हिवताप अधिकारी