शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जिल्हा दोषसिद्धतेत अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 22:18 IST

एखादा गुन्हा घडल्यानंतर न्यायालयात प्रकरण सिद्ध करण्यासाठी पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातूनच अनेक आरोपींची सुटका होते. परिणामी दोष सिद्धतेचे प्रमाण कमी होते.

ठळक मुद्देशिक्षेचे प्रमाण २३.३५ टक्के : भंडारा जिल्हा पोलीस दलाची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एखादा गुन्हा घडल्यानंतर न्यायालयात प्रकरण सिद्ध करण्यासाठी पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातूनच अनेक आरोपींची सुटका होते. परिणामी दोष सिद्धतेचे प्रमाण कमी होते. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी भंडारा जिल्ह्याची सूत्रे हाती घेतली तेव्हापासून गुन्हे दोषसिद्धतेत जिल्हा अव्वल आला आहे. जिल्ह्यात वर्षभरात न्यायालयात दाखल ४ हजार ११८ प्रकरणापैकी ९६० प्रकरणात न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली. दोषसिद्धतेचे प्रमाण २३.३५ टक्के आहे.जिल्ह्यात विविध गुन्ह्यांचा तपास करून पोलीस प्रकरण न्यायप्रविष्ट करतात. मात्र अनेक प्रकरणात विविध कारणाने आरोपी दोषमुक्त होतात. गत चार वर्षाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास यात सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येते. २०१५ साली दोषसिद्धतेचे प्रमाण १७.७७ टक्के होते. तर २०१६ मध्ये १८.९१ टक्के, २०१७ मध्ये १७.२३ टक्के आहे. मात्र गतवर्षी २०१८ साली यात ६.१२ टक्क्याने वाढ होऊन २३.३५ टक्के दोष सिद्धतेचे प्रमाण आहे.भंडारा जिल्ह्यात २०१८ मध्ये चार हजार १११ प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आली. त्यापैकी ९६० प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठावली.२०१७ मध्ये चार हजार ५० प्रकरणांपैकी ९९८ म्हणजे १७.२३, २०१६ मध्ये तीन हजार १९९ प्रकरणांपैकी ६०५ म्हणजे १८.९१ आणि २०१५ मध्ये तीन हजार ७७७ प्रकरणांपैकी ६७० म्हणजेच १७.७४ टक्के दोष सिद्धतेचे प्रमाण दिसून आले.जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी जिल्ह्याची सूत्रे हाती घेतली त्यावेळेस पासून त्यांनी दोषसिद्धतेबाबत आपल्या अधिनस्थ यंत्रणेला कामी लावले. प्रकरणाचा तपास योग्यरित्या करून आरोपींना शिक्षा कशी होईल यादृष्टीने त्यांनी मार्गदर्शन केले. त्या अंतर्गत दोषसिद्धतेचे प्रमाण वाढले आहे. सत्र न्यायालयात २०१८ मध्ये दाखल १३० प्रकरणांपैकी ४४ प्रकरणात न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली तर जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल ३६१ प्रकरणांपैकी ४४१ प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आली. शिक्षेचे प्रमाण ३९.६ टक्के आहे. शिक्षेचे प्रमाण वाढल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये याची भीती निर्माण झाली आहे.भंडारा जिल्ह्यात दोषसिद्धततेचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. २०१५ पासून यात सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हे प्रमाण आणखी वाढविण्यासाठी अधिनस्त अधिकारी कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहे. लवकरच जिल्ह्याचे दोषसिद्धतेचे प्रमाण ३५ टक्क्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे.-विनिता साहू, जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा.