शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

जिल्हा दोषसिद्धतेत अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 22:18 IST

एखादा गुन्हा घडल्यानंतर न्यायालयात प्रकरण सिद्ध करण्यासाठी पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातूनच अनेक आरोपींची सुटका होते. परिणामी दोष सिद्धतेचे प्रमाण कमी होते.

ठळक मुद्देशिक्षेचे प्रमाण २३.३५ टक्के : भंडारा जिल्हा पोलीस दलाची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एखादा गुन्हा घडल्यानंतर न्यायालयात प्रकरण सिद्ध करण्यासाठी पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातूनच अनेक आरोपींची सुटका होते. परिणामी दोष सिद्धतेचे प्रमाण कमी होते. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी भंडारा जिल्ह्याची सूत्रे हाती घेतली तेव्हापासून गुन्हे दोषसिद्धतेत जिल्हा अव्वल आला आहे. जिल्ह्यात वर्षभरात न्यायालयात दाखल ४ हजार ११८ प्रकरणापैकी ९६० प्रकरणात न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली. दोषसिद्धतेचे प्रमाण २३.३५ टक्के आहे.जिल्ह्यात विविध गुन्ह्यांचा तपास करून पोलीस प्रकरण न्यायप्रविष्ट करतात. मात्र अनेक प्रकरणात विविध कारणाने आरोपी दोषमुक्त होतात. गत चार वर्षाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास यात सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येते. २०१५ साली दोषसिद्धतेचे प्रमाण १७.७७ टक्के होते. तर २०१६ मध्ये १८.९१ टक्के, २०१७ मध्ये १७.२३ टक्के आहे. मात्र गतवर्षी २०१८ साली यात ६.१२ टक्क्याने वाढ होऊन २३.३५ टक्के दोष सिद्धतेचे प्रमाण आहे.भंडारा जिल्ह्यात २०१८ मध्ये चार हजार १११ प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आली. त्यापैकी ९६० प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठावली.२०१७ मध्ये चार हजार ५० प्रकरणांपैकी ९९८ म्हणजे १७.२३, २०१६ मध्ये तीन हजार १९९ प्रकरणांपैकी ६०५ म्हणजे १८.९१ आणि २०१५ मध्ये तीन हजार ७७७ प्रकरणांपैकी ६७० म्हणजेच १७.७४ टक्के दोष सिद्धतेचे प्रमाण दिसून आले.जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी जिल्ह्याची सूत्रे हाती घेतली त्यावेळेस पासून त्यांनी दोषसिद्धतेबाबत आपल्या अधिनस्थ यंत्रणेला कामी लावले. प्रकरणाचा तपास योग्यरित्या करून आरोपींना शिक्षा कशी होईल यादृष्टीने त्यांनी मार्गदर्शन केले. त्या अंतर्गत दोषसिद्धतेचे प्रमाण वाढले आहे. सत्र न्यायालयात २०१८ मध्ये दाखल १३० प्रकरणांपैकी ४४ प्रकरणात न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली तर जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल ३६१ प्रकरणांपैकी ४४१ प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आली. शिक्षेचे प्रमाण ३९.६ टक्के आहे. शिक्षेचे प्रमाण वाढल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये याची भीती निर्माण झाली आहे.भंडारा जिल्ह्यात दोषसिद्धततेचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. २०१५ पासून यात सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हे प्रमाण आणखी वाढविण्यासाठी अधिनस्त अधिकारी कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहे. लवकरच जिल्ह्याचे दोषसिद्धतेचे प्रमाण ३५ टक्क्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे.-विनिता साहू, जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा.