शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात खरिपाची केवळ ०.१२ टक्के पेरणी

By admin | Updated: June 25, 2016 00:20 IST

रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडा गेला. पावसाने अद्याप दमदार हजेरी लावली नाही.

देवानंद नंदेश्वर भंडारारोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडा गेला. पावसाने अद्याप दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे आकाशाकडे नजरा लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या वाट्याला निराशाच आली. आता आर्द्र्रा नक्षत्रातही ढग जमा होऊन हुलकावणी देत आहे. त्यामुळे पावसाच्या आशेने भात नर्सरी (पऱ्हे) टाकणाऱ्या शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढावले आहे.आर्द्रा नक्षत्र सुरू असून आतातरी चांगला पाऊस पडेल व बियाणांची पेरणी करता येईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र पुन्हा अपेक्षाभंगाचे दु:ख शेतकऱ्यांच्या नशिबी आले. यावर्षी कृषी विभागाने खरीप हंगामासाठी २ लाख ९ हजार ५२३ हेक्टर क्षेत्र निर्धारीत केले असून केवळ ०. १२ हेक्टरमध्ये खरिपाची लागवड झाली. भात पिकासाठी १ लाख ८२ हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारीत केले असून केवळ ६३५ हेक्टर क्षेत्रात भात नर्सरीची लागवड करण्यात आली. जून महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही अद्याप चांगला पाऊस बरसला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी नर्सरी लावणे बंद केले आहे. ज्यांनी आधीच बियाणे टाकले ते वाया जाण्याची शक्यता बळावली आहे. ओलिताची सोय असणाऱ्या शेतकरी काहीशी हिंमत बांधून आहे.जिल्ह्यात ६३५ हेक्टरमध्ये भात नर्सरी, ५९ हेक्टरमध्ये आवत्याची लागवड केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिली. आर्द्र्रा नक्षत्रात दमदार पाऊस पडेल, तलाव, बोडी भरून जाईल, अशी शेतकऱ्यांची आशा असते. मात्र पावसाच्या या नक्षत्रात उन्हाळ्याचाच भास होत आहे. मागीलवर्षीसुद्धा पावसाने साथ दिली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करण्याची वेळ आली होती. यंदा आणखीच बिकट स्थिती दिसून येत आहे. आठवडाभरापूर्वी अल्प प्रमाणात पाऊस पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे पेरणीला सुरूवात केली. त्यानंतर पावसाचे दर्शन झाले नाही. त्यामुळे उगवलेली नर्सरी करपण्याच्या मार्गावर आहे. काही ठिकाणी नर्सरी उगवलीच नाही. शेतात भात नर्सरीसाठी टाकलेले दाने पक्षी टीपत आहेत. त्यामुळे पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर चिंतेचे सावट पसरले आहे. पाऊस येत नसला तरी ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याची सुविधा आहे, ते नर्सरीसाठी बियाणे पेरणी करीत आहेत. मात्र जे शेतकरी पूर्णत: पावसावर अवलंबून आहेत, त्यांनी पेरणी थांबविलेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १७.३ मिमी पाऊस झालेला आहे. मात्र भात नर्सरीसाठी १५६.५ मिमी पावसाची गरज असते. दुबार पेरणीचे संकटकेवळ एकदाच रिमझिम आलेल्या पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांचे पऱ्हे (भात नर्सरी) सुकू लागल्या आहेत. ज्यांनी नर्सरीसाठी बियाणे घातले, उन्हामुळे ते अंकुरीतच झाले नाही. ते दाने पोपट व पक्षी टिपत आहेत. शिवाय ज्यांची रोपवाटिका काही प्रमाणात उगवली आहे, तेथे ओलावा राहण्यासाठी शेतकरी मोटारपंपच्या सहाय्याने पाणी देत आहेत. मात्र पाण्याच्या शोधात रानडुकरे रोपवाटिका नष्ट करीत आहेत. यामुळे दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावले आहे. पावसाची हुलकावणीजिल्ह्यात यंदा चक्रीवादळाने कहर केला. मात्र पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नाही. त्यामुळे भात नर्सरीचे क्षेत्र अत्यल्प आहे. भंडारा व तुमसर तालुका वगळता मोहाडी तालुक्यात ५० हेक्टरमध्ये, पवनी ५०, साकोली २१०, लाखांदूर २०८, लाखनी तालुक्यात ११७ हेक्टरमध्ये अशी एकूण ६३५ हेक्टरमध्ये भात नर्सरी तयार करण्यात आली आहे. साकोली तालुक्यात ४५ हेक्टर आणि लाखांदूर तालुक्यामध्ये १४ हेक्टर क्षेत्रात आवत्याची लागवड करण्यात आली आहे. याशिवाय तुरीसारख्या बांधावरच्या पिकांची १५२ हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली. निसर्गाच्या अवकृपेमुळे चार वर्षांपासून शेतकरी संकटांचा सामना करीत आहे.