शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
4
सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
6
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
7
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
8
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
9
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
10
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
11
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
12
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
14
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
15
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
16
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
17
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
18
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
19
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
20
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?

जिल्ह्यात गटशेती योजनेचा फज्जा

By admin | Updated: January 18, 2015 22:41 IST

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या विकासासाठी व उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्याचा संकल्प केला. त्यातीलच एक प्रकार गटशेतीचा आहे. भंडारा जिल्ह्यात एक हजार गट शेतीधारक आहेत.

संजय मते - आंधळगावमहाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या विकासासाठी व उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्याचा संकल्प केला. त्यातीलच एक प्रकार गटशेतीचा आहे. भंडारा जिल्ह्यात एक हजार गट शेतीधारक आहेत. मात्र आत्मा फाउंडेशन पुणे व कृषी विभागाच्या बेजबाबदारपणामुळे या योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसते. विदर्भासह जिल्ह्यात सुद्धा गटशेती केवळ कृषीविभाग व आत्मा कंपनीच्या कागदावरच दिसून येते. जिल्ह्यातील पारंपारिक शेती पद्धतीमुळे शेतकरी नेहमीच आर्थिक संकटात सापडत आहे. या संकटातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शासनाने गटशेती ही योजना तयार केली. यामध्ये शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविणे आणि त्यासाठी शेतमालाची विक्री सहजतेने करता यावी, अशी गटशेतीची मूळ संकल्पना होती. शेतकऱ्यांसाठी सामूहिक शेतीचा दृष्टीकोन समोर ठेवून उपलब्ध साधन सामुग्रीचा सामूहिक वापर करणे, बियाणे, खते, किटकनाशके आदींचा खर्च सामूहिकरित्या केल्यास शेतकऱ्यांना शेती परवडेल तसेच शेतमालाची विक्रीही सामूहिकरित्या करून चांगला नफा मिळविण्याचा उद्देश या योजनेचा आहे. आत्मा व कृषी विभागाने या योजनेचे केवळ कागदी घोडे नाचवून शेतकऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आल्याचे कागदोपत्री दाखविले. गटशेतीत पिकाच्या लागवडीपासून काढणीपर्यंत मोठा खर्च होतो. मात्र यानंतरही शेतकऱ्यांच्या पदरी जेमतेम उत्पन्न येते. अनेक शेतकऱ्यांनी गट स्थापन केले. मात्र त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या चांगल्या योजनांचा बोजवारा उडवत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. दरम्यान जिल्ह्यात आत्मांतर्गत राबविण्यात येणाऱ्या गटशेती योजनेच्या कामावर जिल्हा विभागाचे नियंत्रण आहे. या शेतीसाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यात येत असून शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध होत असल्यामुळे योजनेला शेतकऱ्यांची सुद्धा पसंती आहे. मात्र सर्व कागदोपत्री घोडे चालत असल्याने गटधारक शेतकरी महत्त्वाकांक्षी योजनेपासून वंचित असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.