शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

जिल्ह्यात गटशेती योजनेचा फज्जा

By admin | Updated: January 18, 2015 22:41 IST

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या विकासासाठी व उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्याचा संकल्प केला. त्यातीलच एक प्रकार गटशेतीचा आहे. भंडारा जिल्ह्यात एक हजार गट शेतीधारक आहेत.

संजय मते - आंधळगावमहाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या विकासासाठी व उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्याचा संकल्प केला. त्यातीलच एक प्रकार गटशेतीचा आहे. भंडारा जिल्ह्यात एक हजार गट शेतीधारक आहेत. मात्र आत्मा फाउंडेशन पुणे व कृषी विभागाच्या बेजबाबदारपणामुळे या योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसते. विदर्भासह जिल्ह्यात सुद्धा गटशेती केवळ कृषीविभाग व आत्मा कंपनीच्या कागदावरच दिसून येते. जिल्ह्यातील पारंपारिक शेती पद्धतीमुळे शेतकरी नेहमीच आर्थिक संकटात सापडत आहे. या संकटातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शासनाने गटशेती ही योजना तयार केली. यामध्ये शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविणे आणि त्यासाठी शेतमालाची विक्री सहजतेने करता यावी, अशी गटशेतीची मूळ संकल्पना होती. शेतकऱ्यांसाठी सामूहिक शेतीचा दृष्टीकोन समोर ठेवून उपलब्ध साधन सामुग्रीचा सामूहिक वापर करणे, बियाणे, खते, किटकनाशके आदींचा खर्च सामूहिकरित्या केल्यास शेतकऱ्यांना शेती परवडेल तसेच शेतमालाची विक्रीही सामूहिकरित्या करून चांगला नफा मिळविण्याचा उद्देश या योजनेचा आहे. आत्मा व कृषी विभागाने या योजनेचे केवळ कागदी घोडे नाचवून शेतकऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आल्याचे कागदोपत्री दाखविले. गटशेतीत पिकाच्या लागवडीपासून काढणीपर्यंत मोठा खर्च होतो. मात्र यानंतरही शेतकऱ्यांच्या पदरी जेमतेम उत्पन्न येते. अनेक शेतकऱ्यांनी गट स्थापन केले. मात्र त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या चांगल्या योजनांचा बोजवारा उडवत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. दरम्यान जिल्ह्यात आत्मांतर्गत राबविण्यात येणाऱ्या गटशेती योजनेच्या कामावर जिल्हा विभागाचे नियंत्रण आहे. या शेतीसाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यात येत असून शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध होत असल्यामुळे योजनेला शेतकऱ्यांची सुद्धा पसंती आहे. मात्र सर्व कागदोपत्री घोडे चालत असल्याने गटधारक शेतकरी महत्त्वाकांक्षी योजनेपासून वंचित असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.