शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

जिल्हाधिकारी शेतावर

By admin | Updated: November 1, 2016 00:41 IST

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करून...

सेंद्रीय शेतीची पाहणी : शाश्वत शेती अभियानात सहभागी शेतकऱ्यांशी संवादगोंदिया : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे सरळ शेताच्या बांधावर दाखल झाले. तिरोडा तालुक्यातील बिहिरीया या गावाला भेट देवून त्यांनी तेथील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी, तहसीलदार रविंद्र चव्हाण, तालुका कृषी अधिकारी पोटदुखे, सरपंच प्रमिला पटले, उपसरपंच मदन पटले उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सेंद्रीय शेती करणाऱ्या टेकचंद जमईवार, नंदिकशोर जमईवार, रेवाशंकर पटले, दिनेश जमईवार यांच्या शेतीची पाहणी करून त्यांच्याशी चर्चा केली. उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या सेंद्रीय व रासायनिक शेतीतील पिकाची तुलना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितली. सेंद्रीय शेतीतील पिकामध्ये किड व रोगाचा प्रादुर्भाव नगण्य प्रमाणात असून पिकही जोमदार असल्याचे तसेच या शेतीतील पिकासाठी कीटकनाशक व खताचा खर्च नसल्याचे त्यांनी सांगितले. या शेतीतून यावर्षी भरघोस उत्पन्न मिळणार असल्याचेही या शेतकऱ्यांनी सांगितले. उलट त्यांच्याकडे असलेल्या रासायनिक शेतीच्या पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला असून यावर नियंत्रणासाठी किटकनाशकांचा वापर करण्यात आल्यामुळे या शेतीसाठी खर्च आल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांनी या गावातील सेंद्रीय शेती व रासायनिक शेतीचे पीक बघितले. त्यांना सेंद्रीय शेतीतील पीक अत्यंत चांगल्या स्थितीत दिसून आले. सेंद्रीय शेतीचे प्राथमिक निष्कर्ष आश्वासक असून उत्पादनात चांगली वाढ होण्याची शक्यताही त्यांनी विशद केली. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास यामुळे मदत होणार असून धानाला चांगला भावही मिळणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पीक पाहणीनंतर सांगितले.यावेळी त्यांनी सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतरही शेतकऱ्यांशी चर्चा केली. सेंद्रीय प्रात्यक्षिक कापणीच्यावेळी प्रत्यक्ष भेट देण्याची सूचना उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना त्यांनी केली. (जिल्हा प्रतिनिधी)