शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

तर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस सुरक्षा नाकारावी

By admin | Updated: September 1, 2015 00:26 IST

जिल्ह्यातील जनतेच्या सुरक्षेचा जबाबदारी ज्या पोलीस प्रशासनावर आहे, त्या पोलीस प्रशासनाच्या प्रमुखाला ‘युजलेस’ म्हणने चुकीचे आहे.

नरेंद्र भोंडेकर गरजले : लोकप्रतिनिधींनाही मिळते अपमानास्पद वागणूक भंडारा : जिल्ह्यातील जनतेच्या सुरक्षेचा जबाबदारी ज्या पोलीस प्रशासनावर आहे, त्या पोलीस प्रशासनाच्या प्रमुखाला ‘युजलेस’ म्हणने चुकीचे आहे. गृह विभाग युजलेस असेल तर त्यांचे पोलीसही युजलेस आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस सुरक्षाही घेऊ नये. अशा जिल्हाधिकाऱ्यांना आता जिल्ह्यातून हटविण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आयोजित पत्रपरिषदेत केली.यावेळी भोंडेकर म्हणाले, जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या होत असताना एकाही शेतकऱ्यांच्या घरी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली नाही. पवनी येथे तहसील कार्यालयात झालेल्या घटनेनंतर जिल्हाधिकारी त्यांचे नेतृत्व करतात, ते जनतेची कामे करण्यासाठी आले की कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी आले असा प्रश्न निर्माण झाला आहे.महिना भरापूर्वी शहरात प्रीती पटेल या महिलेचा खून व अश्विनी शिंदे या तरुणीवर झालेल्या जीवघेण्या हल्ला झाला होता. हल्ल्यानंतर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी धीरजकुमार यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी त्यांनी लोकप्रतिनिधींनाही अपमानास्पद वागणूक दिली. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात कोणत्याही शिष्टमंडळाला जिल्हाधिकाऱ्यांना भेटावयाचे असेल तर पाच-सहा लोकांना परवानगी देण्यात येते. आणि स्वत: २५ लोकांना घेऊन पोलीस अधीक्षकांकडे जातात आणि त्यांच्याच कक्षात जावून त्यांना अपमानास्पद शब्दात बोलतात, आयपीएस नाही म्हणतात, असे बोलणे हे प्रमुख अधिकाऱ्यांना उचित ठरणारे नाही. जिल्ह्यातील दोन प्रमुख अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसेल तर जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सुटणार कसे? या दोघांच्या वादामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन केले. तीन दिवसाच्या लेखणी बंद आंदोलनाचा फटका जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला बसला. जिल्ह्यात दोन प्रमुख अधिकाऱ्यांमध्ये अतिशय खालच्या स्तरावरचे भांडण सुरू असतानाही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी कुठे गेले आणि गप्प का आहेत, असा सवालही त्यांनी केला. जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांना ‘युजलेस’, तुम्ही ‘आयपीएस’ नाही असे म्हणून मनोबल खच्ची करीत असेल तर शिवसेना त्याचे कदापि समर्थन करणार नाही. अशा जिल्हाधिकाऱ्यांचे स्थानांतरण करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला संजय रेहपाडे, सुरेश धुर्वे, यशवंत सोनकुसरे, अनिल गायधने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)