शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

अनाथाश्रमात मुलांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी केली दिवाळी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 05:00 IST

महिला व बालविकास विभागांतर्गत आमगाव येथे अनाथाश्रम आहे. गत २० वर्षापासून गंगाधर भालाधरे या अनाथ मुलांचे पालन पोषण करतात. सहा ते १८ वयोगटातील तब्बल २१ मुले-मुली येथे आहेत. सर्व सुविधा आणि मायेची पाखर येथे मिळत असली तरी दिवाळी सणाची कायम हुरहुर या निरागस बालकांच्या चेहऱ्यावर दिसत होती. हेच संवेदनशील मनाचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी हेरले. सोमवारी सायंकाळी त्यांच्या वाहनाचा ताफा थेट आमगावच्या अनाथाश्रमात पोहचला.

ठळक मुद्देभेटवस्तू देऊन बालकांसोबत केले भोजन

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आयुष्यात कायम अंधार असलेल्या अनाथ निरागस बालकांच्या जीवनात यंदाची दिवाळी आशेचा किरण घेवून आली. खुद्द जिल्हाधिकारी दिवाळीच्या फराळासह आणि भेटवस्तू घेऊन अनाथाश्रमात पोहचले. बालकांसोबत गप्पा मारत जमीनीवर बसून त्यांच्यासोबत भोजनही केले. एवढेच नाही तर पुढील शिक्षणाची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. हा हृदयस्पर्शी सोहळा सायंकाळी भंडारा तालुक्यातील आमगाव येथील अनाथाश्रमात रंगला होता. तब्बल तीन तास जिल्हाधिकाऱ्यांनी या मुलांसोबत घालवून त्यांच्यासोबत आनंद वाटला. महिला व बालविकास विभागांतर्गत आमगाव येथे अनाथाश्रम आहे. गत २० वर्षापासून गंगाधर भालाधरे या अनाथ मुलांचे पालन पोषण करतात. सहा ते १८ वयोगटातील तब्बल २१ मुले-मुली येथे आहेत. सर्व सुविधा आणि मायेची पाखर येथे मिळत असली तरी दिवाळी सणाची कायम हुरहुर या निरागस बालकांच्या चेहऱ्यावर दिसत होती. हेच संवेदनशील मनाचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी हेरले. सोमवारी सायंकाळी त्यांच्या वाहनाचा ताफा थेट आमगावच्या अनाथाश्रमात पोहचला. त्यावेळी त्यांच्यासोबत निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे. समाज कल्याण उपायुक्त आशा कवाडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय नंदागवळी, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते होते. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या सोबत बालकांच्या भोजनाचे सर्व साहित्य घेतले होते. एवढेच नाही तर दिवाळीचे फटाके, भेटवस्तू सोबत आणली होती. यावेळी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी या बालकांसोबत फटाके फोडून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला. मुलांच्या खेळण्यासाठी जाळी आणि व्हॉलीबॉलही भेट देण्यात आला. यावेळी या बालकांनी नृत्य. गाणी सादर करुन जिल्हाधिकाऱ्यांपुढे आपल्या कलेचे प्रदर्शन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी या मुलांसोबत जमीनीवर बसून भोजन घेतले. यावेळी अनाथाश्रमातील मुलांच्या पुढील शिक्षणाची व्यवस्था आपण करणार असल्याचे त्यांनी यावेळी मुलांना सांगितले. दिवाळीच्या पर्वात बालकांच्या जीवनात आनंद पेरण्याचा हा उपक्रम अनेकांना आदर्श देऊन गेला. यावेळी स्मृती लोणारे या बालिकेचा सर्वांनी वाढदिवस साजरा केला. केक कापुन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी स्मृतीला आपल्या हाताने केक भरविला. तेव्हा वातावरण भावविभोर झाले.  कधीही वाढदिवस साजरा न झालेली स्मृती या प्रसंगाने भावना विवश झाली होती. तिला काय करावे हेही सुचत नव्हते. उपस्थितांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

साहेब, तुम्ही कलेक्टर होण्यासाठी काय केलेदिवाळीचा सोहळा साजरा करीत असताना सुरुवातीला बालके अबोल दिसत होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या शैलीने त्यांना बोलते केले. बालके एवढी खुलत गेली की एका बालकाने थेट जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारला. तुम्ही कलेक्टर कसे झाला. तुम्हाला समस्या आल्या नाही काय असे विचारले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी आपण कलेक्टर कसे झालो आणि समस्यावर कशी मात केली हे उदाहरणासह सांगितले. जीवनात कोणत्याही समस्या आल्या तरी न डगमगता त्याचा सामना करा असा संदेश त्यांनी दिला. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी