शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

डबघाईस आलेल्या संस्थेतील शेतकऱ्यांना जिल्हा बँकेचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2016 00:35 IST

अनेक वर्षापासून निसर्ग कोपला आहे. त्यामुळे जिल्हा संकटात ओढवला असून त्यात शेतकरी कोलमडला आहे.

सुनील फुंडे यांचा मदतीचा हात : शेतकऱ्यांना मिळणार शून्य टक्के दराने कर्ज भंडारा : अनेक वर्षापासून निसर्ग कोपला आहे. त्यामुळे जिल्हा संकटात ओढवला असून त्यात शेतकरी कोलमडला आहे. शेतकऱ्यांना कर्ज देणाऱ्या बँकांही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. दुष्काळ सदृश्य स्थिती लक्षात घेता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी अवसायनात सापडलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना आधार देऊन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना स्वबळावर उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.सन २०१३ मध्ये कमी कर्ज वसुलीच्या निकषाखाली शासनाने अवसायनात काढलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना आधार देऊन त्यांच्यामार्फत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा मानाने जगण्याचा अधिकार सुनिल फुंडे यांनी मिळवून दिला. आजतागायत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतील ७४० सभासदांकडे ४०६.९७ लाख रूपयाची थकबाकी शिल्लक आहे. त्यामुळे शेतकरी सभासदांना नवीन पीककर्ज शुन्य टक्के व्याजदराने जिल्ह्यातील कोणतीही बँक उपलब्ध करून देऊ शकत नाही. या परिस्थितीची माहिती शासन व प्रशासनाला असतानाही ते काहीच करू शकले नाही. मात्र ही व्यथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांच्या लक्षात आली. त्यांनी अवसायनात आलेल्या विविध कार्यकारी सेवा संस्थाकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यासाठी त्यांनी प्रत्येक गावातील चौकाचौकात आवाहान करणारे फलक लावले. यावरच न थांबता अधिनिस्त असणाऱ्या कर्मचारी व, अधिकाऱ्यांना गावांगावात जावून सभा घेण्याविषयी सभा घेण्याचे निर्देश दिले. थकीत शेतकरी सभासदांना शासन निर्णयाप्रमाणे शुन्य टक्के व्याज दराने जिल्हा बँक कर्जपुरवठा करायला तयार आहे तेव्हा बिनव्याजी एकरी १६,५०० रूपये कर्जपुरवठा घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. अवसायान संस्थेतील शेतकरी सभासद नवीन चालू पिक कर्ज वाटपाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा ताठमानेने नवीन खरीप हंगामात उत्तम प्रकारे शेती करू शकतील असा मानसही जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. (जिल्हा प्रतिनिधी)