शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

डबघाईस आलेल्या संस्थेतील शेतकऱ्यांना जिल्हा बँकेचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2016 00:35 IST

अनेक वर्षापासून निसर्ग कोपला आहे. त्यामुळे जिल्हा संकटात ओढवला असून त्यात शेतकरी कोलमडला आहे.

सुनील फुंडे यांचा मदतीचा हात : शेतकऱ्यांना मिळणार शून्य टक्के दराने कर्ज भंडारा : अनेक वर्षापासून निसर्ग कोपला आहे. त्यामुळे जिल्हा संकटात ओढवला असून त्यात शेतकरी कोलमडला आहे. शेतकऱ्यांना कर्ज देणाऱ्या बँकांही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. दुष्काळ सदृश्य स्थिती लक्षात घेता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी अवसायनात सापडलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना आधार देऊन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना स्वबळावर उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.सन २०१३ मध्ये कमी कर्ज वसुलीच्या निकषाखाली शासनाने अवसायनात काढलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना आधार देऊन त्यांच्यामार्फत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा मानाने जगण्याचा अधिकार सुनिल फुंडे यांनी मिळवून दिला. आजतागायत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतील ७४० सभासदांकडे ४०६.९७ लाख रूपयाची थकबाकी शिल्लक आहे. त्यामुळे शेतकरी सभासदांना नवीन पीककर्ज शुन्य टक्के व्याजदराने जिल्ह्यातील कोणतीही बँक उपलब्ध करून देऊ शकत नाही. या परिस्थितीची माहिती शासन व प्रशासनाला असतानाही ते काहीच करू शकले नाही. मात्र ही व्यथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांच्या लक्षात आली. त्यांनी अवसायनात आलेल्या विविध कार्यकारी सेवा संस्थाकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यासाठी त्यांनी प्रत्येक गावातील चौकाचौकात आवाहान करणारे फलक लावले. यावरच न थांबता अधिनिस्त असणाऱ्या कर्मचारी व, अधिकाऱ्यांना गावांगावात जावून सभा घेण्याविषयी सभा घेण्याचे निर्देश दिले. थकीत शेतकरी सभासदांना शासन निर्णयाप्रमाणे शुन्य टक्के व्याज दराने जिल्हा बँक कर्जपुरवठा करायला तयार आहे तेव्हा बिनव्याजी एकरी १६,५०० रूपये कर्जपुरवठा घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. अवसायान संस्थेतील शेतकरी सभासद नवीन चालू पिक कर्ज वाटपाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा ताठमानेने नवीन खरीप हंगामात उत्तम प्रकारे शेती करू शकतील असा मानसही जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. (जिल्हा प्रतिनिधी)