शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

जिल्हा प्रशासन होणार ‘पेपरलेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:40 IST

शासकीय कार्यालयातील दप्तरदिरंगाईचा अनुभव न घेतलेला व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही काम होत नसल्याचा अनेकांचा वर्षानुवर्षांचा अनुभव आहे. मात्र आता ई-आॅफीसच्या माध्यमातून भंडारा जिल्हा प्रशासन पेपरलेस होत आहे.

ठळक मुद्देदप्तरदिरंगाई थांबणार : राज्यात ई-आॅफीस होणारा भंडारा चौथा जिल्हा, प्रशासनात येणार गतीमानता

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासकीय कार्यालयातील दप्तरदिरंगाईचा अनुभव न घेतलेला व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही काम होत नसल्याचा अनेकांचा वर्षानुवर्षांचा अनुभव आहे. मात्र आता ई-आॅफीसच्या माध्यमातून भंडारा जिल्हा प्रशासन पेपरलेस होत आहे. त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली असून चंद्रपूर, औरंगाबाद, रत्नागिरी नंतर पेपरलेस होणारा भंडारा हा चौथा जिल्हा ठरणार आहे.प्रत्येक नागरिकाचा प्रशासकीय कार्यालयाशी कोणत्या ना कोणत्या कारणाने संबंध येतो. मात्र त्या ठिकाणी अनेकांना वाईट अनुभवाची उदाहरणे आहेत. याठिकाणी दिलेल्या तक्रारीवर केव्हा योग्य निर्णय होईल याचा नेम नसतो. परंपरागत कार्यशैलीत कागदाला कागद लावून फाईल तयार केली फाईल या टेबलवरून त्या टेबलवर फिरत असते. यातच बराच अवधी जातो. काम रखडले जाते. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने ई-आॅफीस प्रणाली सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २० आॅगस्ट २०१३ रोजी यासाठी आदेश निर्गमित केला. त्यानुसार भंडारा जिल्हा प्रशासनाने ई-आॅफीससाठी पुढाकार घेतला आहे. कामकाज गतीमान, प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठी ई-आॅफीस करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. परंतु परंपरागत पद्धतीने काम करण्याची सवय असलेले अधिकारी, कर्मचारी सुरुवातीला यासाठी तयार नव्हते. त्यांचे मत परिवर्तन करून ही प्रणाली त्यांना कशी सहज आणि सोपी आहे हे समजावून सांगितले. भंडाराचे निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी सर्व कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेवून पेपरलेस कार्यालयाची संकल्पना समजवून सांगितली. त्यानंतर तांत्रिक तयारी सुरु झाली. अधिकारी - कर्मचाºयांची संगणकीकृत माहिती गोळा करण्यात आली. मुंबईच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे सर्व्हरवरील जागेसाठी पाठपुरावा करण्यात आला. जिल्हा सेतू समितीतून निधीही उपलब्ध करून घेण्यात आला. दोन महिन्यानंतर माहिती तंत्रज्ञान विभागाने सर्व्हर जागा उपलब्ध करून दिली. आधिकारी-कर्मचाºयांना माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अभियंत्यांनी दोन दिवस प्रशिक्षण दिले. १ आॅगस्ट या महसूल दिनाच्या पूर्वसंध्येला पहिली फाईल ई-आॅफीसमधून बाहेर पडली.पेपरलेस प्रणालीत संबंधिताने तक्रार अर्ज जिल्हा प्रशासनाकडे सादर केला की त्याची ई-फाईल तयार केली जाते. तक्रारदाराला त्याचा एसएमएस जातो. त्यात नोंदणी क्रमांक दिला जातो. या क्रमांच्या आधारे तक्रारदार आपल्या अर्जाची स्थिती पाहू शकतो. तसेच संबंधित अधिकाºयाच्या पोर्टलमध्ये ही सर्व माहिती अवघ्या काही वेळातच पोहचते. काम किती दिवसात करायचे याचाही त्यावर अवधी असतो. त्यामुळे दाखल झालेल्या तक्रारीवर टोलवाटोलवी करण्यास कुठेही जागा नसते. येवढेच नाहीतर जिल्हाधिकारी कार्यालयात सुटीचा अर्ज कागदावर घेणे आता बंद करण्यात आले आहे. या प्रणालीचा वापर करूनच सुटीचा अर्ज दिला जातो. अधिकारी कर्मचारी किती वाजता आला याचीही माहिती या प्रणालीतून क्षणात कळते. ही प्रणाली या पूर्वी चंद्रपूर, औरंगाबाद, रत्नागिरी या जिल्ह्याने स्वीकारली. आता भंडारा जिल्हाही यासाठी सज्ज झाला आहे. संपूर्ण जिल्हा प्रशासन पेपरलेस होवून तक्रारींचा निपटारा वेळेत होईल.वर्षभरात वाचणार पाच हजार रिम कागदजिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यांच्या अधिनस्थ असलेल्या सर्व कार्यालयामध्ये वर्षाला पाच हजार रिम कागद लागतो. मात्र आता पेपरलेस प्रणालीमुळे कागदाचा खर्च वाचणार आहे. त्यातही महत्वाचे म्हणजे पर्यावरणाचे रक्षण होणार आहे. २० हजार कागदांसाठी एक झाड तुटते. भंडारा जिल्हा प्रशासन पेपरलेस झाल्याने वर्षभरात हजार ते १२०० झाडांची कत्तल थांबेल आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण होईल.डिजिटल इंडियाच्या माध्यमातून भंडारा जिल्हा प्रशासनाने पेपरलेस होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. या प्रणालीमुळे जनतेची कामे निर्धारित वेळेत केली जातील. कामकाजात पारदर्शकता येवून गतीमानता वाढेल.-विजय भाकरे,निवासी उपजिल्हाधिकारी, भंडारा.