शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

डाव्या कालव्याची वितरिका फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 22:47 IST

आकोट शेतशिवारात असलेल्या वितरिकेला तडे गेल्याने वितरिकेचे पाणी गावरस्त्यावर वाहत आहे. तसेच डाव्या कालव्यात आकोट गावाच्या बाहेर पुलावरुन पाणी पडत असल्याने डाव्या कालव्याला मोठे भगदाड पडले आहे. शेत शिवारात सर्वत्र पाणी साचले आहे. आकोट येथे नेरला उपसा सिंचन योजनेची आकोट वितरिका फुटल्याने शेतातील वितरिकेचे पाणी गावात परत येत आहे.

ठळक मुद्देधानपीक पाण्याखाली : तर मुख्य कालव्यालाही धोका

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा-कोसरा : आकोट शेतशिवारात असलेल्या वितरिकेला तडे गेल्याने वितरिकेचे पाणी गावरस्त्यावर वाहत आहे. तसेच डाव्या कालव्यात आकोट गावाच्या बाहेर पुलावरुन पाणी पडत असल्याने डाव्या कालव्याला मोठे भगदाड पडले आहे. शेत शिवारात सर्वत्र पाणी साचले आहे.आकोट येथे नेरला उपसा सिंचन योजनेची आकोट वितरिका फुटल्याने शेतातील वितरिकेचे पाणी गावात परत येत आहे. त्यामुळे आकोटच्या मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी दिसत आहे. वितरिकेचे पाणी डाव्या कालव्यावर असलेल्या आकोट जवळील पुलावरुन खाली कोसळत असल्याने डावा कालव्यास मोठे भगदाड पडले. याकडे डावा कालवा धरण विभागाचे दुर्लक्ष होत आहे.नेरला उपसा सिंचन योजनेच्या आकोट वितरिकेचे काम चालू आहे. ते अपूर्ण असल्याने पावसाळ्यात वितरिकेला तडे गेले. वितरिकेचे पाणी शेतातून आकोटच्या रस्त्यावर आले आहे. यामुळे धान पिकांची नासाडी झाली आहे. वितरिकेचे पाणी डाव्या कालव्यात पडत असल्याने कालव्याचा एका बाजूस खोल खड्डा पडला आहे. जिथे वितरिकेचे पाणी कालव्यात पडते तिथून २०० फूट अंतरावर डावा कालव्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचेही दुर्लक्ष होत आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास डावा कालव्याला तडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.उपकालव्याची वितरिका फुटल्याने धानपीक पाण्याखालीमासळ : गोसे बु. धरणाच्या डावा उपमुख्य कालव्याची वितरिका घरतोडा शिवारात फुटल्याने अनेक शेतकऱ्यांचे धानपीक बुडाले असून धानपीक सडल्याची भीती व्यक्त केल्या जात आहे. गेल्या तीन चार दिवसापासून मासळ, घरतोडा, खैर, ढोलसर, सरांडी बु. परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. परिसरातील नाले ओसंडून वाहत आहेत. शेतशिवारात पाणी भरल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. त्यातच कालव्याची पार फुटल्याने नहरातील पाणी संपूर्ण शेतशिवारात पसरला आहे. त्यामुळे सुमारे २५ एकरातील धानपिकाला नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर नुकसानभरपाई शासनाने द्यावी अशी मागणी घरतोडा येथील शेतकरी स्वप्नील शेंद्रे, ऋषी ब्राम्हणकर, प्रल्हाद फुंडे, राजेश रामटेके, होमराज कठाणे, प्रमोद कठाणे, लोमेश्वर फुंडे, देवदास कठाणे, कारु फटे, विनोद फटे, ऋषी फुंडे, लालचंद देशमुख, गोपाल देशमुख आदींनी केली आहे.