शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

डाव्या कालव्याची वितरिका फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 22:47 IST

आकोट शेतशिवारात असलेल्या वितरिकेला तडे गेल्याने वितरिकेचे पाणी गावरस्त्यावर वाहत आहे. तसेच डाव्या कालव्यात आकोट गावाच्या बाहेर पुलावरुन पाणी पडत असल्याने डाव्या कालव्याला मोठे भगदाड पडले आहे. शेत शिवारात सर्वत्र पाणी साचले आहे. आकोट येथे नेरला उपसा सिंचन योजनेची आकोट वितरिका फुटल्याने शेतातील वितरिकेचे पाणी गावात परत येत आहे.

ठळक मुद्देधानपीक पाण्याखाली : तर मुख्य कालव्यालाही धोका

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा-कोसरा : आकोट शेतशिवारात असलेल्या वितरिकेला तडे गेल्याने वितरिकेचे पाणी गावरस्त्यावर वाहत आहे. तसेच डाव्या कालव्यात आकोट गावाच्या बाहेर पुलावरुन पाणी पडत असल्याने डाव्या कालव्याला मोठे भगदाड पडले आहे. शेत शिवारात सर्वत्र पाणी साचले आहे.आकोट येथे नेरला उपसा सिंचन योजनेची आकोट वितरिका फुटल्याने शेतातील वितरिकेचे पाणी गावात परत येत आहे. त्यामुळे आकोटच्या मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी दिसत आहे. वितरिकेचे पाणी डाव्या कालव्यावर असलेल्या आकोट जवळील पुलावरुन खाली कोसळत असल्याने डावा कालव्यास मोठे भगदाड पडले. याकडे डावा कालवा धरण विभागाचे दुर्लक्ष होत आहे.नेरला उपसा सिंचन योजनेच्या आकोट वितरिकेचे काम चालू आहे. ते अपूर्ण असल्याने पावसाळ्यात वितरिकेला तडे गेले. वितरिकेचे पाणी शेतातून आकोटच्या रस्त्यावर आले आहे. यामुळे धान पिकांची नासाडी झाली आहे. वितरिकेचे पाणी डाव्या कालव्यात पडत असल्याने कालव्याचा एका बाजूस खोल खड्डा पडला आहे. जिथे वितरिकेचे पाणी कालव्यात पडते तिथून २०० फूट अंतरावर डावा कालव्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचेही दुर्लक्ष होत आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास डावा कालव्याला तडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.उपकालव्याची वितरिका फुटल्याने धानपीक पाण्याखालीमासळ : गोसे बु. धरणाच्या डावा उपमुख्य कालव्याची वितरिका घरतोडा शिवारात फुटल्याने अनेक शेतकऱ्यांचे धानपीक बुडाले असून धानपीक सडल्याची भीती व्यक्त केल्या जात आहे. गेल्या तीन चार दिवसापासून मासळ, घरतोडा, खैर, ढोलसर, सरांडी बु. परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. परिसरातील नाले ओसंडून वाहत आहेत. शेतशिवारात पाणी भरल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. त्यातच कालव्याची पार फुटल्याने नहरातील पाणी संपूर्ण शेतशिवारात पसरला आहे. त्यामुळे सुमारे २५ एकरातील धानपिकाला नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर नुकसानभरपाई शासनाने द्यावी अशी मागणी घरतोडा येथील शेतकरी स्वप्नील शेंद्रे, ऋषी ब्राम्हणकर, प्रल्हाद फुंडे, राजेश रामटेके, होमराज कठाणे, प्रमोद कठाणे, लोमेश्वर फुंडे, देवदास कठाणे, कारु फटे, विनोद फटे, ऋषी फुंडे, लालचंद देशमुख, गोपाल देशमुख आदींनी केली आहे.