शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
8
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
11
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
12
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
13
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
15
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
16
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
17
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
18
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
19
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
20
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश

डाव्या कालव्याची वितरिका फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 22:47 IST

आकोट शेतशिवारात असलेल्या वितरिकेला तडे गेल्याने वितरिकेचे पाणी गावरस्त्यावर वाहत आहे. तसेच डाव्या कालव्यात आकोट गावाच्या बाहेर पुलावरुन पाणी पडत असल्याने डाव्या कालव्याला मोठे भगदाड पडले आहे. शेत शिवारात सर्वत्र पाणी साचले आहे. आकोट येथे नेरला उपसा सिंचन योजनेची आकोट वितरिका फुटल्याने शेतातील वितरिकेचे पाणी गावात परत येत आहे.

ठळक मुद्देधानपीक पाण्याखाली : तर मुख्य कालव्यालाही धोका

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा-कोसरा : आकोट शेतशिवारात असलेल्या वितरिकेला तडे गेल्याने वितरिकेचे पाणी गावरस्त्यावर वाहत आहे. तसेच डाव्या कालव्यात आकोट गावाच्या बाहेर पुलावरुन पाणी पडत असल्याने डाव्या कालव्याला मोठे भगदाड पडले आहे. शेत शिवारात सर्वत्र पाणी साचले आहे.आकोट येथे नेरला उपसा सिंचन योजनेची आकोट वितरिका फुटल्याने शेतातील वितरिकेचे पाणी गावात परत येत आहे. त्यामुळे आकोटच्या मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी दिसत आहे. वितरिकेचे पाणी डाव्या कालव्यावर असलेल्या आकोट जवळील पुलावरुन खाली कोसळत असल्याने डावा कालव्यास मोठे भगदाड पडले. याकडे डावा कालवा धरण विभागाचे दुर्लक्ष होत आहे.नेरला उपसा सिंचन योजनेच्या आकोट वितरिकेचे काम चालू आहे. ते अपूर्ण असल्याने पावसाळ्यात वितरिकेला तडे गेले. वितरिकेचे पाणी शेतातून आकोटच्या रस्त्यावर आले आहे. यामुळे धान पिकांची नासाडी झाली आहे. वितरिकेचे पाणी डाव्या कालव्यात पडत असल्याने कालव्याचा एका बाजूस खोल खड्डा पडला आहे. जिथे वितरिकेचे पाणी कालव्यात पडते तिथून २०० फूट अंतरावर डावा कालव्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचेही दुर्लक्ष होत आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास डावा कालव्याला तडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.उपकालव्याची वितरिका फुटल्याने धानपीक पाण्याखालीमासळ : गोसे बु. धरणाच्या डावा उपमुख्य कालव्याची वितरिका घरतोडा शिवारात फुटल्याने अनेक शेतकऱ्यांचे धानपीक बुडाले असून धानपीक सडल्याची भीती व्यक्त केल्या जात आहे. गेल्या तीन चार दिवसापासून मासळ, घरतोडा, खैर, ढोलसर, सरांडी बु. परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. परिसरातील नाले ओसंडून वाहत आहेत. शेतशिवारात पाणी भरल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. त्यातच कालव्याची पार फुटल्याने नहरातील पाणी संपूर्ण शेतशिवारात पसरला आहे. त्यामुळे सुमारे २५ एकरातील धानपिकाला नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर नुकसानभरपाई शासनाने द्यावी अशी मागणी घरतोडा येथील शेतकरी स्वप्नील शेंद्रे, ऋषी ब्राम्हणकर, प्रल्हाद फुंडे, राजेश रामटेके, होमराज कठाणे, प्रमोद कठाणे, लोमेश्वर फुंडे, देवदास कठाणे, कारु फटे, विनोद फटे, ऋषी फुंडे, लालचंद देशमुख, गोपाल देशमुख आदींनी केली आहे.