शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

सिहोरा येथे दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा व बावनथडी नद्यांचे खोऱ्यात असणाऱ्या सिहोरा परिसरातील नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. सुकळी आणि येरली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद करण्यात आल्याने नागरिकांवर गढूळ पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.सिहोरा परिसरात असणाऱ्या नद्यांचे पात्रात पुराचे पाणी गढूळ आहे. हे पाणी शुद्धीकरणासाठी सुकळी व येरली प्रादेशिक ...

ठळक मुद्देनद्यांच्या पात्रात गढूळ पाणी : पाण्याचे स्त्रोतही खराब

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा व बावनथडी नद्यांचे खोऱ्यात असणाऱ्या सिहोरा परिसरातील नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. सुकळी आणि येरली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद करण्यात आल्याने नागरिकांवर गढूळ पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.सिहोरा परिसरात असणाऱ्या नद्यांचे पात्रात पुराचे पाणी गढूळ आहे. हे पाणी शुद्धीकरणासाठी सुकळी व येरली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आलेल्या आहेत. अनेक वर्षापूर्वीपासून सुकळी गावाची योजना रखडली आहे. तर येरली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना थंडबस्त्यात आहे. सिहोरा गावात एकमात्र ही योजना सुरु आहे. दरम्यान सलग्नीत गावात स्वतंत्र नळ योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत. या नळ योजनांना जलशुद्धीकरण केंद्र नाही. यामुळे याच गढूळ पाण्याने नागरिकांना पाण्याची तहान भागवावी लागत आहे. दरम्यान येरली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद झाली. या योजनेचे अभिनव टाकीत पाणी पुरवठा करण्यासाठी मोहगावचे (खदान) सरपंच उमेश कटरे यांची निर्णय घेत गावागावातच पाण्याचे स्त्रोत निर्माण केले आहे. या नवीन स्त्रोताने गावकऱ्यांना काही महिने मोठा दिलासा मिळाला आहे.गावात दोन पाणी पुरवठा योजना असल्याने उन्हाळ्यातही पाणी टंचाई जाणवली नाही. परंतु पावसाळा लागताच स्त्रोताचे चित्र गडगडले आहे. या स्त्रोतामधून गढूळ पाणी येत असल्याने गावकरी हैराण झाले आहेत. गावात गावकºयांना काळ्या पाण्याची सजा असे चित्र दिसून येत आहे. गढूळ पाण्याचे झरे सुरु झाल्याने याचा शोध घेतला जात आहे.परिणामत: गावकºयांना पिण्याचे पाणी बाहेरून आणावे लागत आहे. मोहगाव (खदान) गावात दुषित पाण्याने गावकºयांची झोपच उडाली आहे. नद्यांचे काठावरील पाणी पुरवठा करणाºया योजना मधून पिण्याचे उपलब्ध होत आहेत. गावकरी तथा शाळा व अंगणवाडींनाच याच पाण्याच पुरवठा होत आहे.बालकांना शुद्ध पाणी पुरवठा व शालेय, आरोग्य परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर यांनी सिहोरा परिसरात आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. अंगणवाडी, शाळा, आरोग्य व गावात पावसाळ्यात आरोग्याची काळजी विषयक, पिण्याचे पाणी आदी विषयावर चर्चा होणार आहे. काही गावात गढूळ पाणी पुरवठ्याचे संकट ओढावले असल्याने या आढावा बैठकीकडे लक्ष लागले आहे.पावसाळ्यात अंगणवाडी, शाळा व गावात पाण्याचे नियोजन, शुद्ध पाणी, स्वच्छता आदी महत्वपूर्ण आहेत. याकरिता आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.-धनेंद्र तुरकर, सभापती, जि.प. भंडारा.मोहगाव (खदान) गावात पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र पाण्याचे स्त्रोत आहेत. अचानक या स्त्रोतांना गढूळ पाणी येत असल्याने त्याचा शोध घेतला जात आहे. दोन तीन दिवसात स्थिती सुधारेल.-उमेश कटरे, सरपंच मोहगाव (ख.)