शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

लोकवाहिनी बरबटली घाणीने

By admin | Updated: November 30, 2014 22:59 IST

दळणवळणाचे प्रमुख साधन असलेल्या एसटी महामंडळाच्या बसेसच्या उपयोगीतेमुळे तिला 'लोकवाहिनी' हे बिरूद मिळाले आहे. मात्र याच लोकवाहिनीतील अस्वच्छतेमुळे आता प्रवशांचा जीव गुदमरत

भंडारा : दळणवळणाचे प्रमुख साधन असलेल्या एसटी महामंडळाच्या बसेसच्या उपयोगीतेमुळे तिला 'लोकवाहिनी' हे बिरूद मिळाले आहे. मात्र याच लोकवाहिनीतील अस्वच्छतेमुळे आता प्रवशांचा जीव गुदमरत असल्याचे वास्तव आहे. एसटी बसेसच्या स्वच्छतेकडे कमालीचे दुर्लक्ष केले जात आहे. एकीकडे वातानुकूलित सेवा देण्याची वल्गना करत असले तरी प्रत्यक्षात एसटी बसेसची स्थिती अतिशय गंभीर आहे.ग्रामीण भागासह मोठमोठी महानगरामध्ये जाण्यासाठी भंडारातुन एसटी बसशिवाय कोणताच दुसरा पर्याय नाही. त्यामुळे महामंडळाच्या गाड्यांवरच प्रवासाचे गणित अवलंबुन आहे. तिकिटाचे दर वाढले म्हणून कुरकुर करणारा सर्वसामान्य माणूस नेहमीच प्रवास करण्यासाठी एसटीबसला प्राधान्य देतो. मात्र बरेचदा त्याचाही येथील गैरसोयीमुळे नाईलाज होत असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक फोफावली अशी ओरड सर्वच स्तरांतुन केली जाते. याला बऱ्याच अंशी एसटी महामंडळाचा कारभार जबाबदार असल्याचे दिसते. ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटीबसकडे कोणाचे लक्ष नाही. या बसमधुन प्रवास करताना अनेक असुविधा दिसून येतात.ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसची नियमित स्वच्छताच केली जात नाही. गाडीमध्ये साचलेल्या घाणीमुळे अगदी जीव नकोसा होतो. अनेकांना तर हा वास सहन होत नसल्याने सातत्याने उलट्या होतात. याला चांगला पर्यायी शब्द प्रवाश्यांनीच शोधुन काढला आहे. उलट्या होण्यास 'एसटी लागते' असे म्हणतात. महामंडळाच्या नाकर्तेपणावर पांघरूण घालण्यासाठी प्रवाशांनीच आपली समजूत काढली आहे. काहींना एसटीतून अशा स्थितीत प्रवास करणे शक्यच होत नसल्याने अवैध प्रवाशी वाहनांचा आधार घ्यावा लागतो.बसमध्ये चढताक्षणीच दाराचा कोपरा पानांच्या पिचकाऱ्यांनी रंगलेला दिसतो. तेथून घाणीला सुरूवात होतो. खिडक्या ह्या उलटीने माखलेल्या असतात. खर्ऱ्याची पन्नी, व्हेपर्स, चिप्स खाऊन त्याचे पॉकेट संपूर्ण बसमध्ये उडत असतात. बसमध्ये मोठ्या प्रमाणात माती साचलेली असते. एखादी व्यक्ती चालू गाडीतच मनसोक्त झुरके घेताना दिसतो. गर्दीचे खचाखच भरलेल्या गाडीमध्यें हा धुर कोडल्याने सर्वांनाच धुम्रपान घडते. हा प्रकार थांबविण्यासाठी तसदी गाडीतील वाहक कधीच घेत नाही. सार्वजनिक ठिाकाणी थुंकणेही कायद्याने निषिध्द आहे. मात्र याकडे लक्ष देण्यास कोणालाच वेळ नाही. बसमध्ये बसून धूम्रपान केले अथवा थुंकले, कचरा टाकला म्हणून कोणालाही आजपर्यंत दंड झाला नाही. त्यामुळे प्रत्येक जण बेफामपणे कोणाचीही पर्वा न करता एसटी बस रंगविण्याचे काम प्रवासदरम्यान करतो. कर्तव्यावर असलेल्या वाहकाने पुढाकार घेऊन अशा प्रवाशांची तक्रार केल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्याची तरतुद आहे. मात्र वाहक अशी तक्रार करण्यास धजावत नाही. त्यामुळेच लोकवाहिनी असलेली एसटीबस आज घाणीच्या विळख्यात सापडलेली आहे. बसच्या तुटक्या सीट, फुटलेल्या खिडक्या ही तर नित्याचीच बाब झाली आहे. आज सर्वत्र वैयक्तीक स्वच्छतेचा नारा दिला जात असताना एसटी महामंडळाला अजून तरी जाग आलेली दिसत नाही. एसटीसाठीसुध्दा स्वतंत्र स्वच्छता अभियान राबविण्यासाठी गरज आहे. बसेसच्या स्वच्छतेची जबाबदारी ही महामंडळाप्रमाणेच प्रवाशांवरही अवलंबून आहे. मात्र नियमित स्वच्छता दिसल्यास प्रवासीसुध्दा ती घाण करताना निश्चित कचरतील, त्यासाठी महामंडळाने एक पाऊल पुढे येण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी )