शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अशुद्ध पाण्यापासून आजारांचा प्रसार

By admin | Updated: June 15, 2016 00:49 IST

पावसाळ्यात वातावरणात बदल होतो. उन्हाळ्यात कोरडी, गरम हवा जाऊन आर्द्रता वाढते. तापमानात सतत बदल होतो.

डासांच्या उत्पत्तीचा काळ : मुलांना विषाणुजन्य संसर्ग होण्याची भीतीसाकोली : पावसाळ्यात वातावरणात बदल होतो. उन्हाळ्यात कोरडी, गरम हवा जाऊन आर्द्रता वाढते. तापमानात सतत बदल होतो. सलग पाऊस राहिल्यास दिवसेंदिवस स्वच्छ सूर्यप्रकाश येत नाही. ठिकठिकाणी पाणी साचते. त्यामुळे चिलटे व माशांचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळे पावसाळी आजार वाढतात. पाण्यातून मुलांना संसर्ग होण्याची भीती असते. लहान बाळ पटकन काही वस्तू तोंडात टाकते. त्यामुळे त्यातून विषाणूसंसर्ग होऊ शकतो.दूषित पाणी व अन्न यामुळे पावसाळ्यात आजार बळावतात. अनेकदा नळालाही दूषित पाणी येते. याचा थेट फटका घरातील मंडळींना बसत असून ते आजारी पडतात. संसर्गाने तो अधिक प्रभावी होत जातो. अशात मुलांच्या वापराची भांडी उकळून निर्जंतुक करून ठेवावी व पाणी उकळून प्यावे. त्यामुळे लहान मुलांना पटकन होणारा संसर्गाचा धोका टाळता येऊ शकतो. अशुद्ध पाण्यामुळे मुलांना जुलाब, उलट्या, गॅस्ट्रो, कावीळ, टायफॉईड आणि क्वचित कॉलरा यांच्या साथीची लागण होऊ शकते. या आजारांकडे वेळेत लक्ष न दिल्यास बाळाला डिहायड्रेशन होऊ शकते. म्हणून अन्न व पाण्याची शुद्धता कोणत्याही परिस्थितीत ठेवायला हवी. हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया, कीटकजन्य आजार डासांपासून मलेरिया होतो. पावसाळ््यात पाणी तुंबून राहते. करवंट्या, शहाळी, जुने टायर, मडकी, गुरांची पाण्याची भांडी, जुन्या कॅनमध्ये पाऊस साचतो. त्याने, डेंग्यू व मलेरियाचे डास वाढतात. हे दोन्ही आजार जीवघेणे ठरू शकतात. घरातील गच्ची, अंगणात ठेवलेले रिकामे डबे, रंगाचे डबे, पाण्याच्या टाक्या, ड्रममध्ये पाणी साचून त्यात डासांची उत्पत्ती होते आणि त्यातूनच रोगांचा प्रसार होतो. हे टाळण्यासाठी नागरिकांनी काय काळजी घ्यावी, याबाबत आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जाते. घरावरील पाण्याची टाकी किंवा फ्लॅटच्या तळघरातील टाकी पूर्णपणे रिकामी करणे शक्य नसते. अशा ठिकाणी डासांनी अंडी घालू नये त्यासाठी या टाक्या झाकणाने पूर्ण घट्ट बंद कराव्यात, जेणेकरून त्यात डासांचा शिरकाव होणार नाही. गच्चीत रिकाम्या भांड्यांतही नकळत पाणी साचते आणि डासांची पैदास होते. डेंग्यू, चिकुनगुनियाचा प्रसार अशातूनच होतो. कीटकजन्य आजार डासांपासून मलेरिया, डेंग्यू हे आजार होतात. खोकताना तोंडावर रु माल धरा, निरोगी लहान मुलांना रुग्णालयात किंवा दवाखान्यात घेऊन जाऊ नका, लहान मुलांना आजारी असताना शाळेत पाठवू नका, त्याने साथ पसरते, बाळांचे लसीकरण व्यवस्थित करा, घराजवळ पाणी साचू देऊ नका. (तालुका प्रतिनिधी)