शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

अशुद्ध पाण्यापासून आजारांचा प्रसार

By admin | Updated: June 15, 2016 00:49 IST

पावसाळ्यात वातावरणात बदल होतो. उन्हाळ्यात कोरडी, गरम हवा जाऊन आर्द्रता वाढते. तापमानात सतत बदल होतो.

डासांच्या उत्पत्तीचा काळ : मुलांना विषाणुजन्य संसर्ग होण्याची भीतीसाकोली : पावसाळ्यात वातावरणात बदल होतो. उन्हाळ्यात कोरडी, गरम हवा जाऊन आर्द्रता वाढते. तापमानात सतत बदल होतो. सलग पाऊस राहिल्यास दिवसेंदिवस स्वच्छ सूर्यप्रकाश येत नाही. ठिकठिकाणी पाणी साचते. त्यामुळे चिलटे व माशांचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळे पावसाळी आजार वाढतात. पाण्यातून मुलांना संसर्ग होण्याची भीती असते. लहान बाळ पटकन काही वस्तू तोंडात टाकते. त्यामुळे त्यातून विषाणूसंसर्ग होऊ शकतो.दूषित पाणी व अन्न यामुळे पावसाळ्यात आजार बळावतात. अनेकदा नळालाही दूषित पाणी येते. याचा थेट फटका घरातील मंडळींना बसत असून ते आजारी पडतात. संसर्गाने तो अधिक प्रभावी होत जातो. अशात मुलांच्या वापराची भांडी उकळून निर्जंतुक करून ठेवावी व पाणी उकळून प्यावे. त्यामुळे लहान मुलांना पटकन होणारा संसर्गाचा धोका टाळता येऊ शकतो. अशुद्ध पाण्यामुळे मुलांना जुलाब, उलट्या, गॅस्ट्रो, कावीळ, टायफॉईड आणि क्वचित कॉलरा यांच्या साथीची लागण होऊ शकते. या आजारांकडे वेळेत लक्ष न दिल्यास बाळाला डिहायड्रेशन होऊ शकते. म्हणून अन्न व पाण्याची शुद्धता कोणत्याही परिस्थितीत ठेवायला हवी. हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया, कीटकजन्य आजार डासांपासून मलेरिया होतो. पावसाळ््यात पाणी तुंबून राहते. करवंट्या, शहाळी, जुने टायर, मडकी, गुरांची पाण्याची भांडी, जुन्या कॅनमध्ये पाऊस साचतो. त्याने, डेंग्यू व मलेरियाचे डास वाढतात. हे दोन्ही आजार जीवघेणे ठरू शकतात. घरातील गच्ची, अंगणात ठेवलेले रिकामे डबे, रंगाचे डबे, पाण्याच्या टाक्या, ड्रममध्ये पाणी साचून त्यात डासांची उत्पत्ती होते आणि त्यातूनच रोगांचा प्रसार होतो. हे टाळण्यासाठी नागरिकांनी काय काळजी घ्यावी, याबाबत आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जाते. घरावरील पाण्याची टाकी किंवा फ्लॅटच्या तळघरातील टाकी पूर्णपणे रिकामी करणे शक्य नसते. अशा ठिकाणी डासांनी अंडी घालू नये त्यासाठी या टाक्या झाकणाने पूर्ण घट्ट बंद कराव्यात, जेणेकरून त्यात डासांचा शिरकाव होणार नाही. गच्चीत रिकाम्या भांड्यांतही नकळत पाणी साचते आणि डासांची पैदास होते. डेंग्यू, चिकुनगुनियाचा प्रसार अशातूनच होतो. कीटकजन्य आजार डासांपासून मलेरिया, डेंग्यू हे आजार होतात. खोकताना तोंडावर रु माल धरा, निरोगी लहान मुलांना रुग्णालयात किंवा दवाखान्यात घेऊन जाऊ नका, लहान मुलांना आजारी असताना शाळेत पाठवू नका, त्याने साथ पसरते, बाळांचे लसीकरण व्यवस्थित करा, घराजवळ पाणी साचू देऊ नका. (तालुका प्रतिनिधी)