शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

तिन्ही हंगामांत पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना परावृत्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:58 IST

गोंदिया : तालुक्यात असलेल्या सिंचन व्यवस्थेचा योग्य व्यवस्थापन व वापर केला गेला, तर तालुक्यात वर्षात खरीप, रब्बी व ...

गोंदिया : तालुक्यात असलेल्या सिंचन व्यवस्थेचा योग्य व्यवस्थापन व वापर केला गेला, तर तालुक्यात वर्षात खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तिन्ही हंगामांत शेती केली जाऊ शकते. यासाठी पाटबंधारे विभागाच्या मदतीने प्रायोगिक तत्त्वावर काही गावांची निवड करून शेतकऱ्यांना मुबलक पाणी आणि योग्य मार्गदर्शन करीत तिन्ही हंगामांत शेती करण्यास परावृत्त करा, असा सल्ला आमदार विनोद अग्रवाल यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.

गोंदिया तालुक्याची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक नुकतीच कृषी विभागाच्या कार्यालयात पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला उपविभागीय कृषी अधिकारी पी. पाटील, तालुका कृषी अधिकारी डी. एम. तुमडाम, कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. एम. एस. देशमुख, राजू माथुरकर, गोंदिया वीज वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता अमोल जयस्वाल, मनोज खोटेले, आर. के. कटरे, बाघ इटियाडोहचे उपविभागीय अभियंता व्ही. व्ही. निगम, महाबीजचे प्रतिनिधी ए. एन. गावंडे, पी. व्ही. कलेवार, डब्ल्यू. टेंभुर्णे उपस्थित होते.

आ. अग्रवाल म्हणाले रब्बी पिकात धानव्यतिरिक्त कलिंगड, खरबूज, लाखोळी, तूर, पोपट, जवस, उडीद, हरभरा, वाटाणा, इत्यादी पिकांचा, तर उन्हाळी पिकांत तीळ, करडई, मूग, उडीद, आदींचा समावेश करून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण तालुक्यात याचे प्रात्यक्षिक करण्याची नावीन्यपूर्ण संकल्पना सुचविली.

कृषी अधिकारी तुमडाम यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत काही गावांची निवड करून प्रयोग करण्याचे आश्वासन दिले.

५५०० मेट्रिक टन युरियाची मागणी

दरवर्षी खते आणि बियाण्यांचा तुटवडा जाणवत असल्याने शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून नियोजन करून खरिपासाठी आवश्यक बियाणे व खते आधीच उपलब्ध करून ठेवण्याचे निर्देश आमदार विनोद अग्रवाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. खरिपासाठी धानाचे महाबीजकडे ५५०० क्विंटल, तर खासगी कंपनीचे ५००० क्विंटल, अशी एकूण १०५०० क्विंटल मागणी केली असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली; तर खतांसाठी ५५०० मेट्रिक टन युरिया, तर १६७२६ मेट्रिक टन इतर खतांची मागणी केली आहे.

जैविक खतांचा वापर करणाऱ्यावर भर द्या

धान पिकावर सर्वाधिक मावा, तुडतुडा, पतंग अशा विविध रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. यावर उपाय म्हणून रासायनिक उपचारांपेक्षा जैविक उपचार जास्त उपयुक्त असून, यासाठी कामगंध सापळा, निंबोळी अर्क, मेटारायझियम, ट्रायकोकार्ड व जैविक कीटकनाशकांचा वापर सोयीस्कर असल्याचे यांच्या वापरातून निदर्शनात आले आहे, तसेच शेतकऱ्यांना कीड नियंत्रणावर उपाययोजना कशी करता येईल यासाठी वेळोवेळी पत्रकार परिषद, प्रेस नोट, पत्रके यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रोग नियंत्रण करण्यासंबंधीच्या सूचना करण्यात आल्या.