शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
3
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
4
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
5
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
6
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
7
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
8
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
9
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
10
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
11
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
12
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
13
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
14
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
15
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
16
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
17
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
18
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
19
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
20
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!

तिन्ही हंगामांत पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना परावृत्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:58 IST

गोंदिया : तालुक्यात असलेल्या सिंचन व्यवस्थेचा योग्य व्यवस्थापन व वापर केला गेला, तर तालुक्यात वर्षात खरीप, रब्बी व ...

गोंदिया : तालुक्यात असलेल्या सिंचन व्यवस्थेचा योग्य व्यवस्थापन व वापर केला गेला, तर तालुक्यात वर्षात खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तिन्ही हंगामांत शेती केली जाऊ शकते. यासाठी पाटबंधारे विभागाच्या मदतीने प्रायोगिक तत्त्वावर काही गावांची निवड करून शेतकऱ्यांना मुबलक पाणी आणि योग्य मार्गदर्शन करीत तिन्ही हंगामांत शेती करण्यास परावृत्त करा, असा सल्ला आमदार विनोद अग्रवाल यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.

गोंदिया तालुक्याची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक नुकतीच कृषी विभागाच्या कार्यालयात पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला उपविभागीय कृषी अधिकारी पी. पाटील, तालुका कृषी अधिकारी डी. एम. तुमडाम, कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. एम. एस. देशमुख, राजू माथुरकर, गोंदिया वीज वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता अमोल जयस्वाल, मनोज खोटेले, आर. के. कटरे, बाघ इटियाडोहचे उपविभागीय अभियंता व्ही. व्ही. निगम, महाबीजचे प्रतिनिधी ए. एन. गावंडे, पी. व्ही. कलेवार, डब्ल्यू. टेंभुर्णे उपस्थित होते.

आ. अग्रवाल म्हणाले रब्बी पिकात धानव्यतिरिक्त कलिंगड, खरबूज, लाखोळी, तूर, पोपट, जवस, उडीद, हरभरा, वाटाणा, इत्यादी पिकांचा, तर उन्हाळी पिकांत तीळ, करडई, मूग, उडीद, आदींचा समावेश करून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण तालुक्यात याचे प्रात्यक्षिक करण्याची नावीन्यपूर्ण संकल्पना सुचविली.

कृषी अधिकारी तुमडाम यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत काही गावांची निवड करून प्रयोग करण्याचे आश्वासन दिले.

५५०० मेट्रिक टन युरियाची मागणी

दरवर्षी खते आणि बियाण्यांचा तुटवडा जाणवत असल्याने शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून नियोजन करून खरिपासाठी आवश्यक बियाणे व खते आधीच उपलब्ध करून ठेवण्याचे निर्देश आमदार विनोद अग्रवाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. खरिपासाठी धानाचे महाबीजकडे ५५०० क्विंटल, तर खासगी कंपनीचे ५००० क्विंटल, अशी एकूण १०५०० क्विंटल मागणी केली असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली; तर खतांसाठी ५५०० मेट्रिक टन युरिया, तर १६७२६ मेट्रिक टन इतर खतांची मागणी केली आहे.

जैविक खतांचा वापर करणाऱ्यावर भर द्या

धान पिकावर सर्वाधिक मावा, तुडतुडा, पतंग अशा विविध रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. यावर उपाय म्हणून रासायनिक उपचारांपेक्षा जैविक उपचार जास्त उपयुक्त असून, यासाठी कामगंध सापळा, निंबोळी अर्क, मेटारायझियम, ट्रायकोकार्ड व जैविक कीटकनाशकांचा वापर सोयीस्कर असल्याचे यांच्या वापरातून निदर्शनात आले आहे, तसेच शेतकऱ्यांना कीड नियंत्रणावर उपाययोजना कशी करता येईल यासाठी वेळोवेळी पत्रकार परिषद, प्रेस नोट, पत्रके यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रोग नियंत्रण करण्यासंबंधीच्या सूचना करण्यात आल्या.