शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
3
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
4
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
5
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
6
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
7
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
8
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
9
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
10
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
11
Gold Silver Price 1 October: एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
13
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
14
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
15
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
16
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
17
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
18
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
19
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
20
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

ठाण्यातील आठवडी बाजाराला अस्वच्छतेचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 21:56 IST

भंडारा तालुक्यातील नव्या रूपात उदयास येणारी तथा खेड्यातून शहरी करणाकडे वळणारी ठाणा सिटीमध्ये ग्रामपंचायत शासन-प्रशासनाचे नियोजन शुन्य कारभत्तर कंत्राटदाराचे बाजार प्रती दुर्लक्ष यामुळे बाजारात अस्वच्छतेचा पसारा पडलेला आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देभाजी विक्रेत्यांचाही मनमानी कारभार : कंत्राटदाराचे व ग्रामपंचायतचे दुर्लक्ष, नागरिकांच्या आरोग्याला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : भंडारा तालुक्यातील नव्या रूपात उदयास येणारी तथा खेड्यातून शहरी करणाकडे वळणारी ठाणा सिटीमध्ये ग्रामपंचायत शासन-प्रशासनाचे नियोजन शुन्य कारभत्तर कंत्राटदाराचे बाजार प्रती दुर्लक्ष यामुळे बाजारात अस्वच्छतेचा पसारा पडलेला आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.भंडारा जिल्हा आठवडी बाजारांचा लिलाव हे जिल्हा परिषदतर्फे करण्यात येतो. मात्र ठाणा येथील बाजार स्वत:च्या मालकीचा असल्यामुळे येथे ग्रामपंचायत ठाणा हे दर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बाजार लिलाव करीत असतो.भंडारा परिसरातील बाजार कंत्राटदार या बाजार लिलावात हिरीरीने सहभाग नोंदवित असतात. दरवर्षी येथील बाजार लिलाव वाढीवर असतो. त्या मानाने येथील कंत्राटदाराची रक्कमही वाढत असते. ठाणा येथे आठवड्यातून अर्थात बुधवार व रविवारला बाजार भरत असतो. बाजारात येणारे विक्रेते हे भंडारा, शहापूर, नांदोरा, निहारवानी, चिखलाबोडी, धानला, बोरगाव, महादुला, पांजरा, चिखली, खरबी, राजेदहेगाव, परसोडी, ठाणा, सावरी, कोंढा, पेवठा या ठिकाणाहून भाजी व खाद्य विक्रेते येत असतात. सकाळपासून येथे विक्रेत्यांची रेलचेल असते. ग्रामपंचायत ठाणा कार्यालयात तलावाजवळ हा बाजार भरतो. येथे येणारे भाजी विक्रेते तलावातील अस्वच्छता पाण्याद्वारे पालेभाज्या धुत असतात. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.बुधवार व रविवारला साहित्याची विक्री करीत अनावश्यक भाजीपाला त्याच ठिकाणी सोडून जातात. दुसऱ्या दिवशी बाजारात सडलेले, कुजलेले भाजीपाल्यांची दुर्गंधी येत असते. बाजार व्यतिरिक्त दिवसी जेष्ठ नागरिक या मोकळ्या जागेवर फिरायला जाताना अस्वच्छताच्या त्रासाला बळी पडतात. याबाबद ग्रामपंचायत कमेटीला याबाबद विचारणा केली असता सुमारे पावणे चार लाखाच्या कंत्राटदारामध्ये अस्तित्वात असलेल्या बोरचा वापर बाजाराची स्वच्छता व पार्किंगची सोय कंत्राटदाराकडे असल्याचे सांगितले जाते. दुर्गंधी धोरणामुळे व ग्रामपंचायत शासन-प्रशासासनाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. परिणामी भविष्यात मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जेष्ठ नागरिक गंगाराम धांडे यांनी याबाबद ग्रामपंचायतला वारंवार सांगितले असता याकडे कानाडोळा करीत आहे. या ज्वलंत प्रश्नाकडे संबंधित वरिष्ठ विभागाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.