शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

ठाण्यातील आठवडी बाजाराला अस्वच्छतेचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 21:56 IST

भंडारा तालुक्यातील नव्या रूपात उदयास येणारी तथा खेड्यातून शहरी करणाकडे वळणारी ठाणा सिटीमध्ये ग्रामपंचायत शासन-प्रशासनाचे नियोजन शुन्य कारभत्तर कंत्राटदाराचे बाजार प्रती दुर्लक्ष यामुळे बाजारात अस्वच्छतेचा पसारा पडलेला आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देभाजी विक्रेत्यांचाही मनमानी कारभार : कंत्राटदाराचे व ग्रामपंचायतचे दुर्लक्ष, नागरिकांच्या आरोग्याला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : भंडारा तालुक्यातील नव्या रूपात उदयास येणारी तथा खेड्यातून शहरी करणाकडे वळणारी ठाणा सिटीमध्ये ग्रामपंचायत शासन-प्रशासनाचे नियोजन शुन्य कारभत्तर कंत्राटदाराचे बाजार प्रती दुर्लक्ष यामुळे बाजारात अस्वच्छतेचा पसारा पडलेला आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.भंडारा जिल्हा आठवडी बाजारांचा लिलाव हे जिल्हा परिषदतर्फे करण्यात येतो. मात्र ठाणा येथील बाजार स्वत:च्या मालकीचा असल्यामुळे येथे ग्रामपंचायत ठाणा हे दर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बाजार लिलाव करीत असतो.भंडारा परिसरातील बाजार कंत्राटदार या बाजार लिलावात हिरीरीने सहभाग नोंदवित असतात. दरवर्षी येथील बाजार लिलाव वाढीवर असतो. त्या मानाने येथील कंत्राटदाराची रक्कमही वाढत असते. ठाणा येथे आठवड्यातून अर्थात बुधवार व रविवारला बाजार भरत असतो. बाजारात येणारे विक्रेते हे भंडारा, शहापूर, नांदोरा, निहारवानी, चिखलाबोडी, धानला, बोरगाव, महादुला, पांजरा, चिखली, खरबी, राजेदहेगाव, परसोडी, ठाणा, सावरी, कोंढा, पेवठा या ठिकाणाहून भाजी व खाद्य विक्रेते येत असतात. सकाळपासून येथे विक्रेत्यांची रेलचेल असते. ग्रामपंचायत ठाणा कार्यालयात तलावाजवळ हा बाजार भरतो. येथे येणारे भाजी विक्रेते तलावातील अस्वच्छता पाण्याद्वारे पालेभाज्या धुत असतात. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.बुधवार व रविवारला साहित्याची विक्री करीत अनावश्यक भाजीपाला त्याच ठिकाणी सोडून जातात. दुसऱ्या दिवशी बाजारात सडलेले, कुजलेले भाजीपाल्यांची दुर्गंधी येत असते. बाजार व्यतिरिक्त दिवसी जेष्ठ नागरिक या मोकळ्या जागेवर फिरायला जाताना अस्वच्छताच्या त्रासाला बळी पडतात. याबाबद ग्रामपंचायत कमेटीला याबाबद विचारणा केली असता सुमारे पावणे चार लाखाच्या कंत्राटदारामध्ये अस्तित्वात असलेल्या बोरचा वापर बाजाराची स्वच्छता व पार्किंगची सोय कंत्राटदाराकडे असल्याचे सांगितले जाते. दुर्गंधी धोरणामुळे व ग्रामपंचायत शासन-प्रशासासनाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. परिणामी भविष्यात मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जेष्ठ नागरिक गंगाराम धांडे यांनी याबाबद ग्रामपंचायतला वारंवार सांगितले असता याकडे कानाडोळा करीत आहे. या ज्वलंत प्रश्नाकडे संबंधित वरिष्ठ विभागाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.