शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

ठाण्यातील आठवडी बाजाराला अस्वच्छतेचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 21:56 IST

भंडारा तालुक्यातील नव्या रूपात उदयास येणारी तथा खेड्यातून शहरी करणाकडे वळणारी ठाणा सिटीमध्ये ग्रामपंचायत शासन-प्रशासनाचे नियोजन शुन्य कारभत्तर कंत्राटदाराचे बाजार प्रती दुर्लक्ष यामुळे बाजारात अस्वच्छतेचा पसारा पडलेला आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देभाजी विक्रेत्यांचाही मनमानी कारभार : कंत्राटदाराचे व ग्रामपंचायतचे दुर्लक्ष, नागरिकांच्या आरोग्याला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : भंडारा तालुक्यातील नव्या रूपात उदयास येणारी तथा खेड्यातून शहरी करणाकडे वळणारी ठाणा सिटीमध्ये ग्रामपंचायत शासन-प्रशासनाचे नियोजन शुन्य कारभत्तर कंत्राटदाराचे बाजार प्रती दुर्लक्ष यामुळे बाजारात अस्वच्छतेचा पसारा पडलेला आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.भंडारा जिल्हा आठवडी बाजारांचा लिलाव हे जिल्हा परिषदतर्फे करण्यात येतो. मात्र ठाणा येथील बाजार स्वत:च्या मालकीचा असल्यामुळे येथे ग्रामपंचायत ठाणा हे दर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बाजार लिलाव करीत असतो.भंडारा परिसरातील बाजार कंत्राटदार या बाजार लिलावात हिरीरीने सहभाग नोंदवित असतात. दरवर्षी येथील बाजार लिलाव वाढीवर असतो. त्या मानाने येथील कंत्राटदाराची रक्कमही वाढत असते. ठाणा येथे आठवड्यातून अर्थात बुधवार व रविवारला बाजार भरत असतो. बाजारात येणारे विक्रेते हे भंडारा, शहापूर, नांदोरा, निहारवानी, चिखलाबोडी, धानला, बोरगाव, महादुला, पांजरा, चिखली, खरबी, राजेदहेगाव, परसोडी, ठाणा, सावरी, कोंढा, पेवठा या ठिकाणाहून भाजी व खाद्य विक्रेते येत असतात. सकाळपासून येथे विक्रेत्यांची रेलचेल असते. ग्रामपंचायत ठाणा कार्यालयात तलावाजवळ हा बाजार भरतो. येथे येणारे भाजी विक्रेते तलावातील अस्वच्छता पाण्याद्वारे पालेभाज्या धुत असतात. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.बुधवार व रविवारला साहित्याची विक्री करीत अनावश्यक भाजीपाला त्याच ठिकाणी सोडून जातात. दुसऱ्या दिवशी बाजारात सडलेले, कुजलेले भाजीपाल्यांची दुर्गंधी येत असते. बाजार व्यतिरिक्त दिवसी जेष्ठ नागरिक या मोकळ्या जागेवर फिरायला जाताना अस्वच्छताच्या त्रासाला बळी पडतात. याबाबद ग्रामपंचायत कमेटीला याबाबद विचारणा केली असता सुमारे पावणे चार लाखाच्या कंत्राटदारामध्ये अस्तित्वात असलेल्या बोरचा वापर बाजाराची स्वच्छता व पार्किंगची सोय कंत्राटदाराकडे असल्याचे सांगितले जाते. दुर्गंधी धोरणामुळे व ग्रामपंचायत शासन-प्रशासासनाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. परिणामी भविष्यात मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जेष्ठ नागरिक गंगाराम धांडे यांनी याबाबद ग्रामपंचायतला वारंवार सांगितले असता याकडे कानाडोळा करीत आहे. या ज्वलंत प्रश्नाकडे संबंधित वरिष्ठ विभागाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.