शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

बावनथडी धरणातून एकाच दिवसात पाण्याचा विसर्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:33 IST

तुमसर: मध्य प्रदेश शासनाने बावनथडी धरणातून १३ मे रोजी सकाळी ११ वाजता ४८ क्यूसेक पाणी विसर्ग सुरू केला आणि ...

तुमसर: मध्य प्रदेश शासनाने बावनथडी धरणातून १३ मे रोजी सकाळी ११ वाजता ४८ क्यूसेक पाणी विसर्ग सुरू केला आणि शुक्रवार १४ मे रोजी दुपारी ४ वाजता विसर्ग बंद केला. त्यामुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक गावे तहानलेलीच आहेत. या गावात पाणीटंचाई निर्माण झाली असून, भाजीपाला व ऊस पीक धोक्यात आले आहे. पाणी विसर्ग करण्याचे नियोजन चुकल्याचे दिसून असून, किमान १० एमसीएम पाण्याचा विसर्ग करण्याची गरज होती.

तुमसर तालुक्यातील सुमारे १५ गावे व मध्य प्रदेशातील बारा गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे आंतरराज्य बावनथडी प्रकल्पातून पाणी विसर्ग करण्याची मागणी होती. भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी बालाघाट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन पाणी विसर्ग करण्याची मागणी केली होती. त्या आनुषंगाने बालाघाट येथील जिल्हाधिकाऱ्यांनी बावनथडी प्रकल्प अधिकाऱ्यांना धरणातून पाणी विसर्ग करण्याच्या निर्देश दिले होते. १३ मे रोजी सकाळी ११ वाजता बावनथडी धरणातून ४८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. लगेच १४ मे रोजी दुपारी ४ वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला. मध्य प्रदेशातील मोवाडपर्यंत आणि तुमसर तालुक्यातील बपेरा व महालगावपर्यंत पाणी पोहोचले नसल्याची माहिती आहे. मध्य प्रदेशातील टेकाडी, चिचोली, शंकरपिपरिया, डोंगरिया या गावापर्यंत अद्याप पाणी पोहोचले नसून बावनथडी नदीचे पात्र अद्याप कोरडे आहे.

महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना या नदीकाठावर असून, नदी घाटातील गावात तीन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड व उसाची शेती केली आहे. या शेतीला पाण्याची नितांत गरज आहे. पाण्याअभावी ही पिके मरणासन्न अवस्थेत पोहोचलेली आहेत नळ योजना सुद्धा शेवटची घटका मोजत आहेत. बावनथडी धरणातून केवळ ५ एमसीएम पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचले नाही. किमान दहा एमसीएम पाण्याच्या विसर्ग करण्याची गरज होती. अल्प पाण्याच्या विसर्गामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाण्याचा विसर्ग पोहोचला नाही. किमान १० एम.सीएम पाणी विसर्ग करण्याची मागणी पठार संघर्ष समितीचे संयोजक दीपक पुष्पतोडे यांनी केली आहे.

बॉक्स

पाण्यावर दोन राज्यांच्या हक्क

बावनथडी धरण आंतरराज्यीय असून, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांचे हा संयुक्त प्रकल्प आहे. धरणातील पाण्यावर मध्य प्रदेशात शासनाचे नियंत्रण आहे. त्यामुळे धरणातून पाणी विसर्ग करण्याची जबाबदारी मध्य प्रदेशची आहे. दरवर्षी एप्रिलच्या मध्यात बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्यात येतो. यावर्षी मे महिन्यात पाणी विसर्ग करण्यात आले. धरणातून पाच एमसीएम पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नदीपात्र कोरडे असल्यामुळे अनेक गावापर्यंत पाण्याचा विसर्ग पोहोचला नाही.

बॉक्स

रेती घाटावर मेहरबानी

मध्य प्रदेश शासनाने बावनथडी नदीकाठावरील सर्व रेती घाटांचे लिलाव केला आहे. पाणी विसर्ग केल्यामुळे रेती उत्खननाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. त्यांचे हित लक्षात घेऊन कमी प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्याची माहिती आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे पाण्याविना येथे हाल सुरू आहे.

कोट

बावनथडी धरणातून कमी प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे मध्य प्रदेशातील दहा ते बारा गावांत अद्यापपर्यंत पाणी पोहोचले नाही. त्यामुळे येथील भाजीपाला व ऊस पीक धोक्यात आले आहे. पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. येथे तत्काळ पुन्हा पाणी विसर्ग करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल.

मुकेश ठाकरे, सरपंच