शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

बावनथडी धरणातून एकाच दिवसात पाण्याचा विसर्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:33 IST

तुमसर: मध्य प्रदेश शासनाने बावनथडी धरणातून १३ मे रोजी सकाळी ११ वाजता ४८ क्यूसेक पाणी विसर्ग सुरू केला आणि ...

तुमसर: मध्य प्रदेश शासनाने बावनथडी धरणातून १३ मे रोजी सकाळी ११ वाजता ४८ क्यूसेक पाणी विसर्ग सुरू केला आणि शुक्रवार १४ मे रोजी दुपारी ४ वाजता विसर्ग बंद केला. त्यामुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक गावे तहानलेलीच आहेत. या गावात पाणीटंचाई निर्माण झाली असून, भाजीपाला व ऊस पीक धोक्यात आले आहे. पाणी विसर्ग करण्याचे नियोजन चुकल्याचे दिसून असून, किमान १० एमसीएम पाण्याचा विसर्ग करण्याची गरज होती.

तुमसर तालुक्यातील सुमारे १५ गावे व मध्य प्रदेशातील बारा गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे आंतरराज्य बावनथडी प्रकल्पातून पाणी विसर्ग करण्याची मागणी होती. भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी बालाघाट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन पाणी विसर्ग करण्याची मागणी केली होती. त्या आनुषंगाने बालाघाट येथील जिल्हाधिकाऱ्यांनी बावनथडी प्रकल्प अधिकाऱ्यांना धरणातून पाणी विसर्ग करण्याच्या निर्देश दिले होते. १३ मे रोजी सकाळी ११ वाजता बावनथडी धरणातून ४८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. लगेच १४ मे रोजी दुपारी ४ वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला. मध्य प्रदेशातील मोवाडपर्यंत आणि तुमसर तालुक्यातील बपेरा व महालगावपर्यंत पाणी पोहोचले नसल्याची माहिती आहे. मध्य प्रदेशातील टेकाडी, चिचोली, शंकरपिपरिया, डोंगरिया या गावापर्यंत अद्याप पाणी पोहोचले नसून बावनथडी नदीचे पात्र अद्याप कोरडे आहे.

महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना या नदीकाठावर असून, नदी घाटातील गावात तीन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड व उसाची शेती केली आहे. या शेतीला पाण्याची नितांत गरज आहे. पाण्याअभावी ही पिके मरणासन्न अवस्थेत पोहोचलेली आहेत नळ योजना सुद्धा शेवटची घटका मोजत आहेत. बावनथडी धरणातून केवळ ५ एमसीएम पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचले नाही. किमान दहा एमसीएम पाण्याच्या विसर्ग करण्याची गरज होती. अल्प पाण्याच्या विसर्गामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाण्याचा विसर्ग पोहोचला नाही. किमान १० एम.सीएम पाणी विसर्ग करण्याची मागणी पठार संघर्ष समितीचे संयोजक दीपक पुष्पतोडे यांनी केली आहे.

बॉक्स

पाण्यावर दोन राज्यांच्या हक्क

बावनथडी धरण आंतरराज्यीय असून, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांचे हा संयुक्त प्रकल्प आहे. धरणातील पाण्यावर मध्य प्रदेशात शासनाचे नियंत्रण आहे. त्यामुळे धरणातून पाणी विसर्ग करण्याची जबाबदारी मध्य प्रदेशची आहे. दरवर्षी एप्रिलच्या मध्यात बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्यात येतो. यावर्षी मे महिन्यात पाणी विसर्ग करण्यात आले. धरणातून पाच एमसीएम पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नदीपात्र कोरडे असल्यामुळे अनेक गावापर्यंत पाण्याचा विसर्ग पोहोचला नाही.

बॉक्स

रेती घाटावर मेहरबानी

मध्य प्रदेश शासनाने बावनथडी नदीकाठावरील सर्व रेती घाटांचे लिलाव केला आहे. पाणी विसर्ग केल्यामुळे रेती उत्खननाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. त्यांचे हित लक्षात घेऊन कमी प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्याची माहिती आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे पाण्याविना येथे हाल सुरू आहे.

कोट

बावनथडी धरणातून कमी प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे मध्य प्रदेशातील दहा ते बारा गावांत अद्यापपर्यंत पाणी पोहोचले नाही. त्यामुळे येथील भाजीपाला व ऊस पीक धोक्यात आले आहे. पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. येथे तत्काळ पुन्हा पाणी विसर्ग करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल.

मुकेश ठाकरे, सरपंच