शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने नव्या वादाला फोडणी
2
“राहुल गांधींची प्रभू श्रीरामांवर श्रद्धा, आता अयोध्येला जाणार”; काँग्रेस नेते म्हणाले…
3
जितेंद्र यांनी प्रॉपर्टी मार्केटमध्ये उडवली खळबळ; जपानी कंपनीसोबत ५५९.२५ कोटी रुपयांचा करार, नक्की प्रकरण काय?
4
राज्यातील 'या' शहरात नव्या मतदारांचा विस्फोट! ४४ टक्के एवढे प्रचंड संख्येने मतदार वाढले, फटका कोणाला? 
5
प्रशासकराजपूर्वी २९ पैकी किती महापालिकांत भाजपची सत्ता होती? समोर आली मोठी आकडेवारी...
6
ट्रम्प यांचा नवा 'रिअल इस्टेट' प्लॅन फसला! ग्रीनलँड विकत घेण्याच्या ऑफरला पंतप्रधानांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
7
पगारदारांनो लक्ष द्या! तुमच्या पीएफ खात्यावर मिळतोय ७ लाखांचा मोफत विमा; असा करा क्लेम
8
नोकरी सोडून शेतीची धरली कास! १३ लाखांच्या कर्जात बुडलेला तरुण आता कमावतोय वार्षिक २ कोटी
9
राधिका आपटेने बंडच पुकारलं! कामाच्या तासांवरुन निर्मात्यांसमोर ठेवल्या अटी, म्हणाली...
10
अत्यंत हलाखीची परिस्थिती, पत्र्याचं घर अन् गंभीर आजाराचा सामना; जालन्याचा काळू डॉन म्हणाला- "दर महिन्याला रक्त बदलावं लागतं..."
11
मुंबई १ नंबर, पुणे २...! राज्यातील तिसरे सर्वात मोठे शहर कोणते? ९९ टक्के लोक चुकणार हमखास...
12
आता चांदी ₹3 लाखच्या जवळ...! MCX वर 10800 रुपयांनी वधारला भाव; गुंतवणूकदारांना करतेय मालामाल
13
वंदे भारत, तेजस, शताब्दी की गतिमान; तिकीट दर वाढल्यावर कोणत्या ट्रेनचा प्रवास स्वस्त?
14
Thailand Train Accident: थायलंडमध्ये चालत्या ट्रेनवर कोसळली अवाढव्य क्रेन; २२ प्रवाशांचा मृत्यू, चिनी बनावटीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
15
८० वर्षांच्या डॉक्टरची १५ कोटींची फसवणूक! १७ दिवस 'डिजिटल अरेस्ट', ७०० बँक खात्यांत पैसा
16
भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांच्या निवासस्थानाला आग, अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव
17
एका शेअरवर ५७ रुपयांचा डिविडंड देणार TATA समूहाची 'ही' कंपनी; रेकॉर्ड डेट जवळ, तुमच्याकडे आहे का?
18
नातूच झाला काळ! स्वतःच्या हाताने संपवलं आजी-आजोबांचं आयुष्य; आजीच्या एका खुणेने पकडला गेला
19
पंतप्रधान कार्यालयाला तक्रार, पत्र पाठवायचेय? आजपासून पत्ता बदलला, संक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या जागेत स्थलांतर...
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडी धरणातून एकाच दिवसात पाण्याचा विसर्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:33 IST

तुमसर: मध्य प्रदेश शासनाने बावनथडी धरणातून १३ मे रोजी सकाळी ११ वाजता ४८ क्यूसेक पाणी विसर्ग सुरू केला आणि ...

तुमसर: मध्य प्रदेश शासनाने बावनथडी धरणातून १३ मे रोजी सकाळी ११ वाजता ४८ क्यूसेक पाणी विसर्ग सुरू केला आणि शुक्रवार १४ मे रोजी दुपारी ४ वाजता विसर्ग बंद केला. त्यामुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक गावे तहानलेलीच आहेत. या गावात पाणीटंचाई निर्माण झाली असून, भाजीपाला व ऊस पीक धोक्यात आले आहे. पाणी विसर्ग करण्याचे नियोजन चुकल्याचे दिसून असून, किमान १० एमसीएम पाण्याचा विसर्ग करण्याची गरज होती.

तुमसर तालुक्यातील सुमारे १५ गावे व मध्य प्रदेशातील बारा गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे आंतरराज्य बावनथडी प्रकल्पातून पाणी विसर्ग करण्याची मागणी होती. भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी बालाघाट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन पाणी विसर्ग करण्याची मागणी केली होती. त्या आनुषंगाने बालाघाट येथील जिल्हाधिकाऱ्यांनी बावनथडी प्रकल्प अधिकाऱ्यांना धरणातून पाणी विसर्ग करण्याच्या निर्देश दिले होते. १३ मे रोजी सकाळी ११ वाजता बावनथडी धरणातून ४८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. लगेच १४ मे रोजी दुपारी ४ वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला. मध्य प्रदेशातील मोवाडपर्यंत आणि तुमसर तालुक्यातील बपेरा व महालगावपर्यंत पाणी पोहोचले नसल्याची माहिती आहे. मध्य प्रदेशातील टेकाडी, चिचोली, शंकरपिपरिया, डोंगरिया या गावापर्यंत अद्याप पाणी पोहोचले नसून बावनथडी नदीचे पात्र अद्याप कोरडे आहे.

महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना या नदीकाठावर असून, नदी घाटातील गावात तीन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड व उसाची शेती केली आहे. या शेतीला पाण्याची नितांत गरज आहे. पाण्याअभावी ही पिके मरणासन्न अवस्थेत पोहोचलेली आहेत नळ योजना सुद्धा शेवटची घटका मोजत आहेत. बावनथडी धरणातून केवळ ५ एमसीएम पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचले नाही. किमान दहा एमसीएम पाण्याच्या विसर्ग करण्याची गरज होती. अल्प पाण्याच्या विसर्गामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाण्याचा विसर्ग पोहोचला नाही. किमान १० एम.सीएम पाणी विसर्ग करण्याची मागणी पठार संघर्ष समितीचे संयोजक दीपक पुष्पतोडे यांनी केली आहे.

बॉक्स

पाण्यावर दोन राज्यांच्या हक्क

बावनथडी धरण आंतरराज्यीय असून, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांचे हा संयुक्त प्रकल्प आहे. धरणातील पाण्यावर मध्य प्रदेशात शासनाचे नियंत्रण आहे. त्यामुळे धरणातून पाणी विसर्ग करण्याची जबाबदारी मध्य प्रदेशची आहे. दरवर्षी एप्रिलच्या मध्यात बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्यात येतो. यावर्षी मे महिन्यात पाणी विसर्ग करण्यात आले. धरणातून पाच एमसीएम पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नदीपात्र कोरडे असल्यामुळे अनेक गावापर्यंत पाण्याचा विसर्ग पोहोचला नाही.

बॉक्स

रेती घाटावर मेहरबानी

मध्य प्रदेश शासनाने बावनथडी नदीकाठावरील सर्व रेती घाटांचे लिलाव केला आहे. पाणी विसर्ग केल्यामुळे रेती उत्खननाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. त्यांचे हित लक्षात घेऊन कमी प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्याची माहिती आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे पाण्याविना येथे हाल सुरू आहे.

कोट

बावनथडी धरणातून कमी प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे मध्य प्रदेशातील दहा ते बारा गावांत अद्यापपर्यंत पाणी पोहोचले नाही. त्यामुळे येथील भाजीपाला व ऊस पीक धोक्यात आले आहे. पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. येथे तत्काळ पुन्हा पाणी विसर्ग करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल.

मुकेश ठाकरे, सरपंच