शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

बावनथडी धरणातून एकाच दिवसात पाण्याचा विसर्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:33 IST

तुमसर: मध्य प्रदेश शासनाने बावनथडी धरणातून १३ मे रोजी सकाळी ११ वाजता ४८ क्यूसेक पाणी विसर्ग सुरू केला आणि ...

तुमसर: मध्य प्रदेश शासनाने बावनथडी धरणातून १३ मे रोजी सकाळी ११ वाजता ४८ क्यूसेक पाणी विसर्ग सुरू केला आणि शुक्रवार १४ मे रोजी दुपारी ४ वाजता विसर्ग बंद केला. त्यामुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक गावे तहानलेलीच आहेत. या गावात पाणीटंचाई निर्माण झाली असून, भाजीपाला व ऊस पीक धोक्यात आले आहे. पाणी विसर्ग करण्याचे नियोजन चुकल्याचे दिसून असून, किमान १० एमसीएम पाण्याचा विसर्ग करण्याची गरज होती.

तुमसर तालुक्यातील सुमारे १५ गावे व मध्य प्रदेशातील बारा गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे आंतरराज्य बावनथडी प्रकल्पातून पाणी विसर्ग करण्याची मागणी होती. भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी बालाघाट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन पाणी विसर्ग करण्याची मागणी केली होती. त्या आनुषंगाने बालाघाट येथील जिल्हाधिकाऱ्यांनी बावनथडी प्रकल्प अधिकाऱ्यांना धरणातून पाणी विसर्ग करण्याच्या निर्देश दिले होते. १३ मे रोजी सकाळी ११ वाजता बावनथडी धरणातून ४८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. लगेच १४ मे रोजी दुपारी ४ वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला. मध्य प्रदेशातील मोवाडपर्यंत आणि तुमसर तालुक्यातील बपेरा व महालगावपर्यंत पाणी पोहोचले नसल्याची माहिती आहे. मध्य प्रदेशातील टेकाडी, चिचोली, शंकरपिपरिया, डोंगरिया या गावापर्यंत अद्याप पाणी पोहोचले नसून बावनथडी नदीचे पात्र अद्याप कोरडे आहे.

महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना या नदीकाठावर असून, नदी घाटातील गावात तीन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड व उसाची शेती केली आहे. या शेतीला पाण्याची नितांत गरज आहे. पाण्याअभावी ही पिके मरणासन्न अवस्थेत पोहोचलेली आहेत नळ योजना सुद्धा शेवटची घटका मोजत आहेत. बावनथडी धरणातून केवळ ५ एमसीएम पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचले नाही. किमान दहा एमसीएम पाण्याच्या विसर्ग करण्याची गरज होती. अल्प पाण्याच्या विसर्गामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाण्याचा विसर्ग पोहोचला नाही. किमान १० एम.सीएम पाणी विसर्ग करण्याची मागणी पठार संघर्ष समितीचे संयोजक दीपक पुष्पतोडे यांनी केली आहे.

बॉक्स

पाण्यावर दोन राज्यांच्या हक्क

बावनथडी धरण आंतरराज्यीय असून, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांचे हा संयुक्त प्रकल्प आहे. धरणातील पाण्यावर मध्य प्रदेशात शासनाचे नियंत्रण आहे. त्यामुळे धरणातून पाणी विसर्ग करण्याची जबाबदारी मध्य प्रदेशची आहे. दरवर्षी एप्रिलच्या मध्यात बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्यात येतो. यावर्षी मे महिन्यात पाणी विसर्ग करण्यात आले. धरणातून पाच एमसीएम पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नदीपात्र कोरडे असल्यामुळे अनेक गावापर्यंत पाण्याचा विसर्ग पोहोचला नाही.

बॉक्स

रेती घाटावर मेहरबानी

मध्य प्रदेश शासनाने बावनथडी नदीकाठावरील सर्व रेती घाटांचे लिलाव केला आहे. पाणी विसर्ग केल्यामुळे रेती उत्खननाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. त्यांचे हित लक्षात घेऊन कमी प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्याची माहिती आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे पाण्याविना येथे हाल सुरू आहे.

कोट

बावनथडी धरणातून कमी प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे मध्य प्रदेशातील दहा ते बारा गावांत अद्यापपर्यंत पाणी पोहोचले नाही. त्यामुळे येथील भाजीपाला व ऊस पीक धोक्यात आले आहे. पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. येथे तत्काळ पुन्हा पाणी विसर्ग करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल.

मुकेश ठाकरे, सरपंच