शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

गोसेखुर्द प्रकल्पातून दहा दिवसात ११४० दलघमी पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 05:00 IST

गतवर्षी महापुराला कारणीभूत ठरलेल्या या प्रकल्पाचे पाणी यंदा नियंत्रितपद्धतीने सोडण्यात येत आहे. २३ जुलै रोजी सर्वप्रथम या प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले होते. तेव्हापासून दरारोज या प्रकल्पाचे दरवाजे कमी जास्त संख्येत उघडण्यात येत आहे. २ ऑगस्ट रोजी या प्रकल्पाचे ११ दरवाजे ११ मीटरने उघडण्यात आले होते. त्यातून ११९२ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यासोबतच डाव्या कालव्यातूनही पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

ठळक मुद्देजलस्तर नियंत्रणासाठी उपाय : प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने प्रकल्पाचा जलस्तर कायम ठेवण्यासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गत दहा दिवसात प्रकल्पाचे दरवाजे उघडून ११४० दलघमी पाणी सोडण्यात आले. वैनगंगा नदी आणि गोसेखुर्द प्रकल्पाचा जलस्तर पावसाळ्यात वाढत आहे. गतवर्षी महापुराला कारणीभूत ठरलेल्या या प्रकल्पाचे पाणी यंदा नियंत्रितपद्धतीने सोडण्यात येत आहे. २३ जुलै रोजी सर्वप्रथम या प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले होते. तेव्हापासून दरारोज या प्रकल्पाचे दरवाजे कमी जास्त संख्येत उघडण्यात येत आहे. २ ऑगस्ट रोजी या प्रकल्पाचे ११ दरवाजे ११ मीटरने उघडण्यात आले होते. त्यातून ११९२ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यासोबतच डाव्या कालव्यातूनही पाण्याचा विसर्ग केला जात आहे. दहा दिवसात तब्बल ११४० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. भंडारा-नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दोन लाख ५० हजार ८०० हेक्टर जमीन सिंचनाची क्षमता या प्रकल्पाची आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पातील जलसाठा २४३.११ मीटर असून पाण्याची टक्केवारी ४०.५९ टक्के आहे. गोसे गावाजवळ बांधण्यात आलेल्या या प्रकल्पाची लांबी ११.३५ किमी असून उंची २२.५ मीटर आहे. पाणी साठवण क्षमता ११४६ दलघमी आहे. सद्यस्थितीत ३०३ दलघमी पाणीसाठा असतानाही पूर परिस्थिती उद्भवू नये म्हणून या प्रकल्पाचे पाणी नियंत्रित केले जात आहे.

पुनर्वसनाचा प्रश्न कायम- गोसे प्रकल्पामुळे बाधित झालेल्या काही गावांचे पुनर्वसन अद्यापही प्रलंबित आहे. त्यामुळे हा प्रकल्प १०० टक्के क्षमतेने भरला जात नाही. त्यामुळेच या प्रकल्पात ४० टक्के पेक्षा अधिक पाणी संग्रहीत केले जात नाही. गोसेप्रकल्पाचे पाणी सोडल्यानंतर वैनगंगा दुथडी भरून वाहत आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.कारधा येथे वैनगंगा पातळी इशारा पातळीपेक्षा कमी- भंडारा शहराजवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीची सोमवारी २४३.१२ मीटर पातळी मोजण्यात आली होती. येथे इशारा पातळी २४५ मीटर आणि धोका पातळी २४५.५० मीटर आहे. सद्यस्थितीत इशारा पातळीपेक्षा कमी पाणी आहे. मात्र लहान पुलाच्या मोऱ्या वैनगंगा दुथडी असल्याने बुजल्या आहेत. प्रशासनाने पुलावरील सुरक्षा कठडे काठले असून नागरिकांनी सावध रहावे, अशा सूचना दिल्या आहे.

 

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प