शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

प्रकल्पग्रस्त मोबदल्यापासून वंचित

By admin | Updated: June 24, 2015 01:12 IST

जिल्ह्यात हरितक्रांती घडावी म्हणून शासनाने गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प साकारला. या प्रकल्पांतर्गत हजारो नागरिक बेघर झाले.

जवाहरनगर : जिल्ह्यात हरितक्रांती घडावी म्हणून शासनाने गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प साकारला. या प्रकल्पांतर्गत हजारो नागरिक बेघर झाले. शानाने त्यांना पॅकेज जाहीर केले. प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन घरदार बहाल केले अशा खैरी येथील गावठाण बाहेरील ६० घरांना अजूनही कोणत्याही प्रकारचे मोबदला, पॅकेज मिळाले नाही. याकडे गोसेखुर्द विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांमध्ये शासन व प्रशासनाविरोधात असंतोष आहे. खैरी सालेबर्डी येथील गावठाण भुसंपादन प्रकरणात प्रकल्पग्रस्तांची घरे संपादित करण्यात आले. संबंधित विभागाने या गावाला गावठत्तणातील घरांना मुळ मोबदला व पॅकेज रक्कम देण्यात आली. परंतु येथील गावठाणाबाहेरील ते ६० कुटूंबे अजूनही मोबदला व पॅकेज रक्कम मिळण्याची प्रतिक्षा संबंधित विभागाकडे करीत आहे.खैरी या गावचे पुनर्वसन अशोकनगर फुलमोगरा या नियोजित स्थळी युद्धपातळीवर सुरू आहे. काही कुटूंबे या ठिकाणी वास्तव्यास गेली आहे. सदर येथील ६० घरांना सुद्धा भुखंड, पट्टे सुद्धा मिळाली आहेत. सदर कुटुंबे स्वेच्छा पुनर्वसन करण्याच्या तयारीत असतानासुद्धा गोसेखुर्द पुनर्वसन विभाग या ६० घरांचा मोबदला व पॅकेज देण्यास दिरंगाई करीत आहे. सदर घरे मोडकळीस आले आहे. दरवर्षी घरांची दुरूस्ती करून नाकीनऊ आले आहे. जीव मुठीत घेऊन ही कुटूंबे मोडक्या घरात वास्तव्य करीत आहे. संबंधित विभाग व प्रशासनाने विरोधात प्रकल्पग्रस्तांमध्ये मोठा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोसीखुर्द विभागाने या ६० कुटूंबाना मोबदला पॅकेज लवकरात लवकर देण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. (वार्ताहर)