शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

डाकसेवकांच्या संपामुळे नागरिकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 22:41 IST

मागील १५ दिवसापासून डाकसेवक संपावर गेल्यामुळे ग्रामीण भागातील डाकसेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. डाक सेवकांच्या अनुपस्थितीत पोस्टाच्या कार्यालयीन कामाचा अतिरिक्त भार पोस्टमास्तरांना उचलावा लागत असून टपालाच्या बॅगांचा खच कार्यालयात जमा आहे.

ठळक मुद्देपोस्टमास्तरवर कामाचा ताण : कार्यालयात टपालाच्या पिशव्यांचा खच

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मागील १५ दिवसापासून डाकसेवक संपावर गेल्यामुळे ग्रामीण भागातील डाकसेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. डाक सेवकांच्या अनुपस्थितीत पोस्टाच्या कार्यालयीन कामाचा अतिरिक्त भार पोस्टमास्तरांना उचलावा लागत असून टपालाच्या बॅगांचा खच कार्यालयात जमा आहे.सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा. सेवानिवृत्ती वेतन लागू करण्यात यावा. कायमस्वरूपी कामगारांचा दर्जा देण्यात यावा आदी प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक युनियनने २२ मे पासून संपाला प्रारंभ केला आहे. पंधराव्या दिवशीही हा संप नियमितरीत्या सुरु असून देशातील २ लाख ७० हजार ग्रामीण टपाल कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. या संपाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील टपाल सेवेवर होत आहे. संपामुळे इंडीयन पोस्ट पेमेंट बँक, सुकन्या समृद्धी योजना, डायरेक्ट बेनीफीट ट्रांसफर (आर.डी.), ग्रामीण टपाल जीवन विमा पोस्टल बचत खात्यांची कामे खोळंबली आहेत.डाक कार्यालयातून येणाऱ्या जाणाºया, टपालांच्या बॅग डाक सेवकांच्या अनुपस्थितीने कार्यालयातच पडून आहेत. टपाल वितरणाचे काम बंद आहे. परिणामी नागरिकांची पोस्टाने येणारी महत्वाची कागदपत्रे पोस्टातच अडकून पडली आहेत. या संपामुळे टपाल सेवा विस्कळीत झाली असून संपूर्ण कामकाज रखडलेले असताना १५ दिवसानंतरही केंद्र सरकारने या संपावर कोणताही तोडगा काढलेला नाही. त्यामुळे ग्रामीण नागरिकांची गैरसोय होत आहे.