शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

लाभार्थी शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 23:02 IST

मागेल त्याला शेततळे, सिंचन विहिर, बोडी खोलीकरण, मागेल त्याला बोडी, जलयुक्त शिवार, शेती यांत्रिकीकरण, गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजना, फळप्रक्रिया उद्योग यासह कृषी विभागाच्या अनेक महत्वांकाक्षी योजनेच्या गोंदिया जिल्हयातील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्हिडिओ कॉन्सफरन्सद्वारे संवाद साधला. या संवादामुळे कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेले लाभार्थी शेतकरी सुखावले असून लाभार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांशी मनमोकळा संवाद साधला.

ठळक मुद्देलोकसंवाद कार्यक्रम : कृषी विभागाच्या योजनांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मागेल त्याला शेततळे, सिंचन विहिर, बोडी खोलीकरण, मागेल त्याला बोडी, जलयुक्त शिवार, शेती यांत्रिकीकरण, गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजना, फळप्रक्रिया उद्योग यासह कृषी विभागाच्या अनेक महत्वांकाक्षी योजनेच्या गोंदिया जिल्हयातील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्हिडिओ कॉन्सफरन्सद्वारे संवाद साधला. या संवादामुळे कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेले लाभार्थी शेतकरी सुखावले असून लाभार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांशी मनमोकळा संवाद साधला.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या व्हिडिओ कॉन्सफरन्समध्ये भंडारा जिल्हयातील शेडनेट हाऊस, ट्रॅक्टर अवजारे, फळबाग लागवड, ठिबक सिंचन, पॅक हाऊस, नाला खोलीकरण, शेततळे, मल्चींग, जमीन आरोग्य पत्रिका इत्यादी योजनेचे १८ लाभार्थी सहभागी झाले होते. लोक संवाद कार्यक्रमाच्या दुसºया पर्वात आज कृषी विभागाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.जालना, पालघर, नगर, परभणी, वाशिम, गोंदिया, सोलापूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, यवतमाळ व जळगाव या जिल्हयातील लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला. या संवादामधून मुख्यमंत्र्यांनी लाभार्थ्यांशी हितगुज केले. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सेंद्रिय शेती मिशन सुरु केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे ध्येय असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शेतीच्या विविध योजनांसाठी १० हजार कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. जलयुक्त शिवारमध्ये राज्यातील १६ हजार गावे जल परिपूर्ण झाली असून ३४ लाख हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. १ लाख ३७ हजार शेततळे निर्माण केले असून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ५१ लाख खातेदारांसाठी २४ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत.शेतकºयांना इत्यंभूत माहिती मिळावी यासाठी महाराष्ट्र अग्रीटेक प्रकल्पाची सुरुवात मुख्यमंत्र्यांनी आज केली. राज्यातील दिड कोटी शेतकºयांना डिजीटल प्लाटफॉर्मवर आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. एमआरसॅक व इस्त्रोच्या सहाय्याने महाराष्ट्र अग्रिटेक प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रत्येक शेतकरी डिजीटली ट्रॅक करणारा देशातील पहिला प्रयोग असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी माती परिक्षण करुन मृद आरोग्य पत्रिका मिळवून घ्यावी. गट शेतीचा लाभ घ्यावा. दुधात भेसळ करणाऱ्यावर कडक कारवाई करणार, राज्यात १ लाख सौर कृषी पंप देण्यात येणार व सर्व फिडर सोलरवर आणणार, गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत कुटूंबाचा समावेश करणार, असल्याचेही मुख्यमत्र्यांनी सांगितले.