शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थी शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 23:02 IST

मागेल त्याला शेततळे, सिंचन विहिर, बोडी खोलीकरण, मागेल त्याला बोडी, जलयुक्त शिवार, शेती यांत्रिकीकरण, गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजना, फळप्रक्रिया उद्योग यासह कृषी विभागाच्या अनेक महत्वांकाक्षी योजनेच्या गोंदिया जिल्हयातील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्हिडिओ कॉन्सफरन्सद्वारे संवाद साधला. या संवादामुळे कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेले लाभार्थी शेतकरी सुखावले असून लाभार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांशी मनमोकळा संवाद साधला.

ठळक मुद्देलोकसंवाद कार्यक्रम : कृषी विभागाच्या योजनांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मागेल त्याला शेततळे, सिंचन विहिर, बोडी खोलीकरण, मागेल त्याला बोडी, जलयुक्त शिवार, शेती यांत्रिकीकरण, गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजना, फळप्रक्रिया उद्योग यासह कृषी विभागाच्या अनेक महत्वांकाक्षी योजनेच्या गोंदिया जिल्हयातील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्हिडिओ कॉन्सफरन्सद्वारे संवाद साधला. या संवादामुळे कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेले लाभार्थी शेतकरी सुखावले असून लाभार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांशी मनमोकळा संवाद साधला.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या व्हिडिओ कॉन्सफरन्समध्ये भंडारा जिल्हयातील शेडनेट हाऊस, ट्रॅक्टर अवजारे, फळबाग लागवड, ठिबक सिंचन, पॅक हाऊस, नाला खोलीकरण, शेततळे, मल्चींग, जमीन आरोग्य पत्रिका इत्यादी योजनेचे १८ लाभार्थी सहभागी झाले होते. लोक संवाद कार्यक्रमाच्या दुसºया पर्वात आज कृषी विभागाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.जालना, पालघर, नगर, परभणी, वाशिम, गोंदिया, सोलापूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, यवतमाळ व जळगाव या जिल्हयातील लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला. या संवादामधून मुख्यमंत्र्यांनी लाभार्थ्यांशी हितगुज केले. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सेंद्रिय शेती मिशन सुरु केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे ध्येय असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शेतीच्या विविध योजनांसाठी १० हजार कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. जलयुक्त शिवारमध्ये राज्यातील १६ हजार गावे जल परिपूर्ण झाली असून ३४ लाख हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. १ लाख ३७ हजार शेततळे निर्माण केले असून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ५१ लाख खातेदारांसाठी २४ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत.शेतकºयांना इत्यंभूत माहिती मिळावी यासाठी महाराष्ट्र अग्रीटेक प्रकल्पाची सुरुवात मुख्यमंत्र्यांनी आज केली. राज्यातील दिड कोटी शेतकºयांना डिजीटल प्लाटफॉर्मवर आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. एमआरसॅक व इस्त्रोच्या सहाय्याने महाराष्ट्र अग्रिटेक प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रत्येक शेतकरी डिजीटली ट्रॅक करणारा देशातील पहिला प्रयोग असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी माती परिक्षण करुन मृद आरोग्य पत्रिका मिळवून घ्यावी. गट शेतीचा लाभ घ्यावा. दुधात भेसळ करणाऱ्यावर कडक कारवाई करणार, राज्यात १ लाख सौर कृषी पंप देण्यात येणार व सर्व फिडर सोलरवर आणणार, गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत कुटूंबाचा समावेश करणार, असल्याचेही मुख्यमत्र्यांनी सांगितले.