शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

दिघोरीतील पशुवैद्यकीय दवाखाना वाऱ्यावर

By admin | Updated: November 15, 2014 22:42 IST

शासनाच्या दुर्लक्षामुळे व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे दिघोरीतील पशुवैद्यकीय दवाखान्याचे तीन तेरा वाजले असून पशुपालकांना नाईलाजास्तव खासगी डॉक्टरांकडून महागडी सेवा घ्यावी लागत आहे.

दिघोरी (मोठी) : शासनाच्या दुर्लक्षामुळे व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे दिघोरीतील पशुवैद्यकीय दवाखान्याचे तीन तेरा वाजले असून पशुपालकांना नाईलाजास्तव खासगी डॉक्टरांकडून महागडी सेवा घ्यावी लागत आहे.दिघोरी मोठी येथील लोकसंख्या ५-६ हजाराच्या घरात असून बहुसंख्य जनतेची उपजिविका शेतीवर अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बऱ्याचवेळा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. त्यामुळे शेतीलाजोडधंदा म्हणून येथील शेतकऱ्यांनी पशुपालनाला सुरुवात केली. मात्र मागील २५ जून २०१३ रोजी पासून येथील कार्यरत डॉ.राठोड यांची बदली झाली तर चपराशी निवृत्त झाल्यानंतर आजपावेतो दिघोरी पशुदवाखाना कायमस्वरुपी डॉक्टर मिळाले नाही. पशुपालकांना आपल्या जनावरांचे उपचार करण्यासाठी खासगी डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागत आहे. येथील कार्यरत डॉक्टर राठोड यांचे बदलीनंतर जवळपास ६ महिने लाखांदूर येथील डॉक्टर खुणे यांनी आठवड्यातून दिघोरी दवाखान्यात दोन दिवस सेवा देणे सुरु केले. त्यानंतरची सहा महिने डॉक्टरविना दवाखाना अशी ख्याती दिघोरी पशुदवाखान्याला प्राप्त झाली व नंतरचे सहा महिने सानगडी येथील महिला डॉक्टर आठवड्यातून दोन दिवस दिघोरीतच्या पशुदवाखान्याला सेवा देत आहेत. मात्र आठवड्यातील उर्वरित पाच दिवसात जर जनावरांना आजाराची लागण झाल्यास पशुपालकांना खासगी डॉक्टरांकडूनच महागडी सेवा घ्यावी लागते. म्हणजेच पशुपालकांना आर्थिक भुर्दंड व मानसीक त्रास देण्यापलिकडे या विभागाने काहीच केले नसल्याची प्रचिती येते.दिघोरीला पशुवैद्यकीय दवाखान्याची स्वत:ची इमारत व्हावी यासाठी जिल्हा परिषदेला राज्य शासनाकडून जागा हस्तांतरीत करण्यात आली. मात्र या घटनेला जवळपास पाच वर्षाचा कालावधी लोटला असला तरी अजूनपावेतो दिघोरीत पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारतीचे भूमिपूजन झालेले नाही.शासनाकडून पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी जागा देण्यात आली. मात्र इमारत बांधकाम विभाग अयशस्वी ठरला. तसेच सध्या भाड्याच्या घरात असलेला दवाखाना आजही कायम असून येथे डॉक्टरांची नेमणूक नसल्याने संबंधित विभागाने दिघोरीतील पशुपालकांना व पशुंना वाऱ्यारच सोडले असले असे म्हणणे वावगे ठरणार नाही.पशुपालकांना जास्तीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू नये. वेळेवर जनावरांवर उपचार व्हावे या उदात्त हेतूने शासनाने गावोगावी पशुदवाखान्यांची निर्मिती केली. मात्र लोकप्रतिनिधींच्या उदासीन व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे येथील पशुदवाखाना वाऱ्यावर सोडला आहे. पशुपालकांना वेळेवर व चांगली सेवा मिळविण्यासाठी ताबडतोब दिघोरीत कायमस्वरुपी डॉक्टर व कंपाउंडरची व्यवस्था करून देण्याची मागणी येथील पशुपालकांनी केली आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील काय, असा सवाल पशुपालकांनी केला आहे.