शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST

भंडारा : जिल्ह्यातील अर्भक मृत्युदर व बालमृत्युदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पाच वर्षांपर्यंतच्या बालकांमध्ये ...

भंडारा : जिल्ह्यातील अर्भक मृत्युदर व बालमृत्युदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पाच वर्षांपर्यंतच्या बालकांमध्ये अतिसार हे प्रमुख मृत्यूचे कारण आहे. १० टक्के बालके अतिसारामुळे दगावतात. त्यामुळे बालमृत्यू टाळण्यासाठी १५ जुलै ते ३० जुलै या कालावधीत जिल्ह्यात विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येणार आहे.

या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्हास्तरीय सुकाणू समितीची सभा पार पडली. या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ. प्रशांत उईके, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. रियाज फारुकी, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मनोहर बारस्कर, आय.ए.पी.चे अध्यक्ष डाॅ. अशोक ब्राह्मणकर, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डाॅ. माधुरी माथूरकर, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते याशिवाय महिला बालकल्याण विभाग पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, सर्व तालुका आरोग्यधिकारी, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी चंद्रमणी मेश्राम, जिल्हा समूह संघटक चंद्रकुमार बारई उपस्थित होते.

विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्याचे उद्देश याबाबत माहिती देण्यात आली. यात पालक आणि काळजी वाहकांमध्ये अतिसार तसेच कोविड - १९ आजारांच्या प्रतिबंधक आणि व्यवस्थापनविषयक माहिती देण्यात आली.

बालकांमध्ये ओआरएस आणि झिंकच्या वापराबाबतचे प्रमाण जास्त होईल याची सुनिश्चिती करणे, जनजागृती करणे, अतिसारामध्ये घ्यावयाची काळजी, ओआरएस व झिंक गोळ्या यांचा वापर कसा करायचा, गोळ्यांचे घरोघरी वाटप, आदींबाबतही माहिती देण्यात आली. पंधरवडाअंतर्गत मोहीम यशस्वी करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले.