शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST

भंडारा : जिल्ह्यातील अर्भक मृत्युदर व बालमृत्युदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पाच वर्षांपर्यंतच्या बालकांमध्ये ...

भंडारा : जिल्ह्यातील अर्भक मृत्युदर व बालमृत्युदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पाच वर्षांपर्यंतच्या बालकांमध्ये अतिसार हे प्रमुख मृत्यूचे कारण आहे. १० टक्के बालके अतिसारामुळे दगावतात. त्यामुळे बालमृत्यू टाळण्यासाठी १५ जुलै ते ३० जुलै या कालावधीत जिल्ह्यात विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येणार आहे.

या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्हास्तरीय सुकाणू समितीची सभा पार पडली. या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ. प्रशांत उईके, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. रियाज फारुकी, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मनोहर बारस्कर, आय.ए.पी.चे अध्यक्ष डाॅ. अशोक ब्राह्मणकर, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डाॅ. माधुरी माथूरकर, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते याशिवाय महिला बालकल्याण विभाग पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, सर्व तालुका आरोग्यधिकारी, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी चंद्रमणी मेश्राम, जिल्हा समूह संघटक चंद्रकुमार बारई उपस्थित होते.

विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्याचे उद्देश याबाबत माहिती देण्यात आली. यात पालक आणि काळजी वाहकांमध्ये अतिसार तसेच कोविड - १९ आजारांच्या प्रतिबंधक आणि व्यवस्थापनविषयक माहिती देण्यात आली.

बालकांमध्ये ओआरएस आणि झिंकच्या वापराबाबतचे प्रमाण जास्त होईल याची सुनिश्चिती करणे, जनजागृती करणे, अतिसारामध्ये घ्यावयाची काळजी, ओआरएस व झिंक गोळ्या यांचा वापर कसा करायचा, गोळ्यांचे घरोघरी वाटप, आदींबाबतही माहिती देण्यात आली. पंधरवडाअंतर्गत मोहीम यशस्वी करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले.