शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

धारगाव धान खरेदी केंद्र २५ जूनपासून पूर्ववत सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:25 IST

गत काही दिवसांपासून या विषयाला घेऊन धारगाव येथील शेतकऱ्यांनी ग्राम आंदोलन समितीच्या वतीने विविध आंदोलने केली. तत्पूर्वी धारगाव परिसरातील ...

गत काही दिवसांपासून या विषयाला घेऊन धारगाव येथील शेतकऱ्यांनी ग्राम आंदोलन समितीच्या वतीने विविध आंदोलने केली. तत्पूर्वी धारगाव परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी ग्राम आंदोलन समितीमार्फत राजेगाव (धारगाव) येथील केंद्रावर हल्लाबोल केला. परिसरातील बारा गावांचे शेतकरी धारगाव धान खरेदी केंद्रासोबत जोडले आहेत. बारदाना संपला म्हणून खरेदी केंद्रावरून शेतकऱ्यांना परत पाठविले जात होते.त्यामुळे बारदाण्याची व्यवस्था करण्यात यावी. नोंदणी क्रमांकानुसार शेतकऱ्यांचे धान घेत नाहीत. प्रत्येक बोऱ्यांमागे पंधरा हमाली घेण्यात येत होती. ओलावा आहे म्हणून अधिकचे किती धान शेतकऱ्यांकडून घेतले जावेत याचेही निर्धारण करावे. जोपर्यंत शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात येत नाहीत तोपर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवावे, अशाप्रकारच्या शेतकऱ्यांनी मागण्या मांडल्या होत्या. सदर मागण्या सोडविल्या नाहीत तर येत्या गुरुवारला जिल्हा पणन अधिकारी यांच्या कार्यालयाला कुलूप ठोको आंदोलन करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला होता. त्या अनुषंगाने भंडारा जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग यांनी ग्राम आंदोलन समितीला जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे यांच्या कक्षात चर्चेला बोलाविले होते आणि या चर्चेचे फलित म्हणजे धारगाव धान खरेदी केंद्र पुन्हा पूर्ववत सुरु होणार असल्याची घोषणा झाली. तसेच प्रत्येक बोऱ्यामागे हमाली देण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट झाले. कारण सरकार धान खरेदी केंद्राला बोऱ्यामागे अकरा रुपये देत असते. जर केंद्रप्रमुख हमाली घेत असेल तर त्यांची पोलिसांत, लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी, असे स्पष्ट जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे यांनी सांगितले.

यावेळी ग्रामआंदोलन समितीचे महेंद्र निंबार्ते, मंगेश वंजारी, महेश गिऱ्हेपुंजे, दीपक वंजारी, नीलकंठ कायते, शंकर लोले, सुरेश बांते, लोकेश मोटघरे, पतिराम गिऱ्हेपुंजे, कवळु गिऱ्हेपुंजे, देवा बोदेले, आकाश वंजारी, पंढरी गिऱ्हेपुंजे, विलास वरकडे, भूषण मरघडे, पोलीस विभागातर्फे राम दीक्षित, महेश रघुवंशी, नरेंद्र झलके, इतर पोलीस आणि होमगार्ड कुमक तथा शेतकरी उपस्थित होते.