शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

महागाव महसूल मंडळात धानपिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 00:44 IST

तालुक्यात १३ व १४ आॅक्टोबर रोजी महागाव महसूल मंडळात अचानक झालेला चक्रीवादळ व पावसाच्या तडाख्यामुळे हजारो हेक्टर मधील धान पीकाला फटका बसला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : चक्रीवादळ व पावसाचा तडाखा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : तालुक्यात १३ व १४ आॅक्टोबर रोजी महागाव महसूल मंडळात अचानक झालेला चक्रीवादळ व पावसाच्या तडाख्यामुळे हजारो हेक्टर मधील धान पीकाला फटका बसला आहे. वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अद्यापही सर्वेक्षण करण्यात आले नाही. खासदार नाना पटोले यांनी बाधित क्षेत्राच्या जानवा गावाला मंगळवारी भेट देऊन शेतकºयांना संयम राखण्याचे आवाहन केले.आसमानी व सुलतानी संकटामुळे बळीराजा सदैव त्रस्त असतो. दुष्काळाच्या दुष्टचक्राचे वलय सदैव त्याचा पाठलाग करीत असते. अवसायनात जीवन कंठीत असताना कर्जबाजारीपणा दूर होत नाही. तोच पुन्हा एकदा महागाव महसूल मंडळातील शेतकºयांवर एकाएकीच आभाळ कोसळले. १३ व १४ तारखेला आलेल्या वादळी पावसाने बळीराजाच्या तोंडात आलेला घास निसर्गाने हिरावला. शेतात झोपलेले धानपिक बघून त्यांचे डोळे पाणावले. शेतकºयांनी याची माहिती देताच खासदार पटोले यांनी मंगळवारी जानवा गावाला रात्री भेट देवून शेतातील धान पिकाची पाहणी केली. लगेच त्यांनी जिल्हाधिकाºयांशी शेतकºयांच्या व्यथा संदर्भात चर्चा केली. या नैसर्गिक संकटामुळे ७० टक्के धानपिकाचे नुकसान झाले आहे. या धानपीकाला तुडतुडा या किटकाचा प्रादुर्भाव आहे. पण निद्रावस्थेत असलेल्या धानपिकावर किटकनाशक फवारणी करणे सुद्धा शेतकºयांना शक्य नाही. हताश होऊन शेवटी तशाच अवस्थेत त्यांनी हे धानपिक सोडून दिले. यापूर्वी याच परिसरात २८ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसानेही धानपिकाची नासाडी केली होती. परिपक्वतेच्या वाटेवर असलेले हे धानपिक कापणी सुद्धा करु शकत नाही, अशी विदारक अवस्था परिसरातील शेतकºयांची आहे.यावेळी पटोले यांनी शेतकºयांना धीर दिला. ते म्हणाले पीक विम्याची योजना चुकीची आहे. पीक विमा काढलेल्या शेतकºयांना नुकसानभरपाई मिळायला हवी. हवामानाच्या आधारावर विमा मिळायला पाहिजे अशी मागणी आपण केंद्र शासनाकडे केली आहे. कर्जमाफीचे शासनाचे धोरण चुकीचे आहे. कर्ज भरणा केला त्यांना व ज्यांनी केला नाही अशानांही कर्जमाफीचा लाभ मिळायला हवा. आॅनलाईन पद्धत व सर्व्हर डाऊनमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.अनेकांचे अर्ज करुन देखील ते अपलोड झाले नाहीत. त्यामुळे सर्व शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी. ओरिसा राज्यात धानाला २९९० रुपये प्रतिक्विंटल भाव तर महाराष्टÑात १५५० रुपये एवढा आहे. ही विषयमता का? असा प्रश्न निर्माण करुन शेतकºयांना प्रतिक्विंटल एक हजार रुपये बोनस देण्याची मागणी त्यांनी केली. शेतकºयांना धैर्य देताना एकोप्याने संकटाला सामोरे जा. प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन केले.