शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
5
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
6
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
7
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
8
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
9
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
10
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
11
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
12
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
13
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
14
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
15
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
16
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
17
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
18
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
19
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
20
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा

धानाला सडका वास

By admin | Updated: October 6, 2016 00:53 IST

धानाचे कोठार असलेल्या आपल्या जिल्ह्याला मागील १५ दिवसांपासून अस्मानी संकटाने घेरले आहे.

धानाचे कोठार संकटात : शेतकरी घाबरला, पाऊस थांबणे गरजेचेपालांदूर : धानाचे कोठार असलेल्या आपल्या जिल्ह्याला मागील १५ दिवसांपासून अस्मानी संकटाने घेरले आहे. हलके व माध्यम धान कापणीला आले असून काही ठिकाणी कापणी केलेले धान सडत आहे. तर काही ठिकाणी हवा व पाऊसाचा जोरदार झोताने धान भुईसपाट झाले. सततच्या पावसाने बांधातील पाणी निघत नसल्याने पडलेल्या धानाचा सडका वास येत आहे तर कित्येक शेतकरी पडलेला धान उभा करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.मागील तीन वर्षाचा ओला, कोरडा दुष्काळ, डोक्यावर घेत हिम्मतीने नव्या हंगामाला शेतकरी नव्या उर्जेने तयार होते. मात्र निसर्ग लहरी झाल्याने अनियमितपणा वाढला आहे. जुन महिन्यात पाऊसाची अत्यल्प हजेरीने पेरणी अर्धी व लांबली जुलै महिन्यात समाधानकारक पण कही खुशी कही गम करीत हजेरी लावली. आॅगस्टला ताण देत निंदन वाढला. धान कमी पण निंदण जास्त, अशी स्थिती झाली. सप्टेंबरला पहिला, दुसरा हपत्यात कमी जासत हजेरी लावीत महिनाअखेरपर्यंत जबरदस्त हजेरी लावली. दिवसभर ढगाळ हवामानामुळे किडीचा उपद्रव वाढला. कापणीच्या धानाला तुळतुळा, अळी, करपा यांचा त्रास वाढल्याने नियंत्रणाकरीता खर्च वाढला. कृषी विभाग जेमतेम एखादेवेळेस अनुदानावर औषधी पुरवितात ही नियमित करून खर्च कमी करण्याची आवश्यकता आहे. करपा रोगात नविन प्रश्न तयार झाला असून निसवलेली लोंबी अक्षरक्ष: पांढरी होतात. दाणे भरतच नाही बऱ्याच शेतात गळ्याजवळील दाणे पोचटच असतात, असे रोग नवीन असल्याने सामान्य शेतकऱ्याला कळणारे नसल्याने नुकसान होत आहे.लाखनी तालुक्यातील चुलबंधच्या खोऱ्यातील धानशेती पावसाने प्रभावित झाली असून लोहारा, नरव्हा, मऱ्हेगाव, वाकल, खराशी, पाथरी शिवारात धान कापले असून सततच्या पावसाने सडत आहेत. पाणी बांधातून पूर्णपणे निघत नसल्याने मोठी अडचण शेतकऱ्यासमोर उभी झालेली आहे. पंजाबराव कृषी विद्यापिठ अंतर्गत साकोली कार्यालयातून डॉ. उषा डोंगरवार व्हॉटसअ‍ॅपवरून माहिती पुरवित ५ आॅक्टोंबरपर्यंत पावसाचा अंदाज असून धान कापणी न करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.शासन-प्रशासनाने पिकविमा उतरविण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. त्यात नैसर्गीक आपत्ती आल्यास लाभ मिळणार म्हटले होते. पंधरादिवसापासून भंडारा जिल्ह्यात रोगराई व पावसाच्या कहराने धानपिक नुकसानग्रस्त झाले आहे. ते पाहण्याकरीता विमा कंपनी किंवा अधिनस्त कर्मचारी फिरकले नाही. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून सावरण्याची गरज आहे. (वार्ताहर)