शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धानाला सडका वास

By admin | Updated: October 6, 2016 00:53 IST

धानाचे कोठार असलेल्या आपल्या जिल्ह्याला मागील १५ दिवसांपासून अस्मानी संकटाने घेरले आहे.

धानाचे कोठार संकटात : शेतकरी घाबरला, पाऊस थांबणे गरजेचेपालांदूर : धानाचे कोठार असलेल्या आपल्या जिल्ह्याला मागील १५ दिवसांपासून अस्मानी संकटाने घेरले आहे. हलके व माध्यम धान कापणीला आले असून काही ठिकाणी कापणी केलेले धान सडत आहे. तर काही ठिकाणी हवा व पाऊसाचा जोरदार झोताने धान भुईसपाट झाले. सततच्या पावसाने बांधातील पाणी निघत नसल्याने पडलेल्या धानाचा सडका वास येत आहे तर कित्येक शेतकरी पडलेला धान उभा करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.मागील तीन वर्षाचा ओला, कोरडा दुष्काळ, डोक्यावर घेत हिम्मतीने नव्या हंगामाला शेतकरी नव्या उर्जेने तयार होते. मात्र निसर्ग लहरी झाल्याने अनियमितपणा वाढला आहे. जुन महिन्यात पाऊसाची अत्यल्प हजेरीने पेरणी अर्धी व लांबली जुलै महिन्यात समाधानकारक पण कही खुशी कही गम करीत हजेरी लावली. आॅगस्टला ताण देत निंदन वाढला. धान कमी पण निंदण जास्त, अशी स्थिती झाली. सप्टेंबरला पहिला, दुसरा हपत्यात कमी जासत हजेरी लावीत महिनाअखेरपर्यंत जबरदस्त हजेरी लावली. दिवसभर ढगाळ हवामानामुळे किडीचा उपद्रव वाढला. कापणीच्या धानाला तुळतुळा, अळी, करपा यांचा त्रास वाढल्याने नियंत्रणाकरीता खर्च वाढला. कृषी विभाग जेमतेम एखादेवेळेस अनुदानावर औषधी पुरवितात ही नियमित करून खर्च कमी करण्याची आवश्यकता आहे. करपा रोगात नविन प्रश्न तयार झाला असून निसवलेली लोंबी अक्षरक्ष: पांढरी होतात. दाणे भरतच नाही बऱ्याच शेतात गळ्याजवळील दाणे पोचटच असतात, असे रोग नवीन असल्याने सामान्य शेतकऱ्याला कळणारे नसल्याने नुकसान होत आहे.लाखनी तालुक्यातील चुलबंधच्या खोऱ्यातील धानशेती पावसाने प्रभावित झाली असून लोहारा, नरव्हा, मऱ्हेगाव, वाकल, खराशी, पाथरी शिवारात धान कापले असून सततच्या पावसाने सडत आहेत. पाणी बांधातून पूर्णपणे निघत नसल्याने मोठी अडचण शेतकऱ्यासमोर उभी झालेली आहे. पंजाबराव कृषी विद्यापिठ अंतर्गत साकोली कार्यालयातून डॉ. उषा डोंगरवार व्हॉटसअ‍ॅपवरून माहिती पुरवित ५ आॅक्टोंबरपर्यंत पावसाचा अंदाज असून धान कापणी न करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.शासन-प्रशासनाने पिकविमा उतरविण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. त्यात नैसर्गीक आपत्ती आल्यास लाभ मिळणार म्हटले होते. पंधरादिवसापासून भंडारा जिल्ह्यात रोगराई व पावसाच्या कहराने धानपिक नुकसानग्रस्त झाले आहे. ते पाहण्याकरीता विमा कंपनी किंवा अधिनस्त कर्मचारी फिरकले नाही. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून सावरण्याची गरज आहे. (वार्ताहर)