शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी धनगर समाजाचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 22:13 IST

महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाचे चार वर्ष लोटूनही धनगर बांधवांना अनुसूचित जमाती आरक्षणाची अद्यापही अंमलबजावणी केली नाही तर शासनाला टी.स. चा अहवाल प्राप्त झाला असताना सुद्धा तोलवरूनच केंद्र सरकारला पाठवणार असे खोटे आश्वासन दिल्याने धनगर समाज संघर्ष समिती भंडारा जिल्ह्याच्या वतीने आज पासून बेमुदत आमरण उपोषणाचे आयोजन केले आहे.

ठळक मुद्देसंघर्ष सुरूच : मागण्या पूर्ण न झाल्यास जलसमाधी आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाचे चार वर्ष लोटूनही धनगर बांधवांना अनुसूचित जमाती आरक्षणाची अद्यापही अंमलबजावणी केली नाही तर शासनाला टी.स. चा अहवाल प्राप्त झाला असताना सुद्धा तोलवरूनच केंद्र सरकारला पाठवणार असे खोटे आश्वासन दिल्याने धनगर समाज संघर्ष समिती भंडारा जिल्ह्याच्या वतीने आज पासून बेमुदत आमरण उपोषणाचे आयोजन केले आहे.धनगर समाज संघर्ष समिती भंडारा जिल्हाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राजमाता अहिल्यादेवी होळकर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला माल्यार्पण करून उपोषण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आले. या उपोषणात उपोषणकर्ते जिल्हाध्यक्ष राजकुमार मरठे, उपाध्यक्ष जयशंकर घटारे, राजेश पेरे, दिनेश अहिर, सोनु हातेल, सुनिल मुकूर्णे, उमेश हातेल आदीचा समावेश आहे.२०१४ च्या निवडणुकापूर्वी विविध सभामध्ये व विशेषत: बारामती येथील सभेमध्ये आम्ही सत्तेत येताच धनगर समाजाला तात्काळ आरक्षण लागू करा असे वचन दिले होते. इतकेच नव्हे तर धनगर समाज संघर्ष समितीला लेखी पत्रही दिले होते. मात्र आपणास सत्तेत येवून चार वर्षाचा कालखंड लोटूनही आजपावतो धरगर आरक्षणाचा विषय आपण ताटकळत ठेवला आहे. आणि टिस च्या अहवालाचा आपण जो उल्लेख केला होता तो शासनाला प्राप्त झाला असून शासन केंद्र सरकारला अहवाल पाठवण्यास वेळकाढू धोरणचा अवलंब करित आहे.संविधानात अनुसूचित जमातीच्या यादीत अनुक्रमांक ३६ वर धनगर असा उल्लेख आहे. धनगर धनगड ही एकच जमात असून केवळ इंग्रजी लिपीतील ड व देवनागरीत र असा भाषेमुळे झालेला फरक आहे. ओरीसा, बिहार, झारखंड उत्तर प्रदेश सरकारने धनगड - धनगर हे एकच आहेत, असे मान्य करून त्या राज्यात त्यांना सवलती लागू केल्या आहेत. तर महाराष्ट्र राज्यातच का नाही. तसेच मेंढपाळांना चराई क्षेत्र खुले करण्यात यावे, मेंढपाळ वस्ती गावातील माळरान खुले करण्यात यावे आदी मागण्यांचे महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाचे चार वर्षे लोटूनही धनगर बांधवांना अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही तर शासनाला टी.स. चा अहवाल प्राप्त झाला असतानाही तो पाठविण्यात आला नाही. त्या अनुषंगाने धनगर समाज संघर्ष समिती जिल्हा भंडारा वतीने आमरण उपोषण सुरू केले आहे. सदर आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्यास संघटनेच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला आहे. यावेळी उपोषण मंडपात धनगर समाज संघर्ष समिती जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश हातेल, राजन पडारे, चंद्रशेखर अहिर, रवि घटारे, भगवान पडोळे, मोरेश्वर पडारे, मंगलदास खऊळ पंडितराव पांडे, सुरेश कवाने आदी उपस्थित होते.