शहरं
Join us  
Trending Stories
1
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
2
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
3
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
4
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
5
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
6
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
7
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
8
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
9
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
10
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
11
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
12
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
13
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
14
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
15
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
16
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
17
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
18
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
19
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
20
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश

धानपिकाची मरणासन्न अवस्था

By admin | Updated: October 19, 2015 00:44 IST

धानाचे कोठार म्हणून प्रसिध्द असलेल्या भंडारा जिल्ह्यात पिकावर किडींचा प्रादुर्भाव व पावसाअभावी शेतकरी संकटात सापडला आहे.

अल्प जलसाठा, पावसाचा अभावदेवानंद नंदेश्वर भंडाराधानाचे कोठार म्हणून प्रसिध्द असलेल्या भंडारा जिल्ह्यात पिकावर किडींचा प्रादुर्भाव व पावसाअभावी शेतकरी संकटात सापडला आहे. संकट डोळ्यासमोर असतानाही अखेरक्षणी तरी मिळेल त्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. कर्जाचा डोंगर उभा करुन महागडी किटकनाशके खरेदी करीत आहे. भेगा पडलेल्या शेतजमीनीला ओलित करण्यासाठी शेतकरी जीवाचे रान करीत असल्याचे हेलावणारे चित्र जिल्हाभरात दिसून येत आहे. दुसरीकडे शासन-प्रशासन शेतकऱ्यांची जणू थट्टाच करीत असल्याने धान शेती वाचविण्यासाठी धावपळ सुरु आहे.जिल्ह्यात १ लाख ९७ हजार ६३ हेक्टर क्षेत्रात खरीप पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्याची टक्केवारी ९८.७५ टक्के एवढी आहे. धानपिकाची ९७.६९ टक्के म्हणजेच १ लक्ष ७७ हजार ८६६ हेक्टरमध्ये लागवड झालेली आहे. मृगाच्या प्रारंभी धो धो बरसलेल्या पावसाने आगामी पीक वाढीसाठी पाठ फिरविली. आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात पिकांसाठी अपेक्षित पाऊस बरसला नाही. त्यामुळे कधी मोटारपंपांच्या सहाय्याने तर कधी तलाव, बोड्यांमधून पाणी देऊन पीक वाचविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून झाला. सप्टेंबर महिन्यात पंधरवड्यानंतर परतीचा पाऊस बरसला. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. त्यानंतर पिकांवर किडींच्या प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे ऐन गर्भावस्थेत असलेल्या धान पिकावर याचा मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकरी धान पिकाचे रोप घेवून कृषी केंद्रात गर्दी करीत आहेत. किड नियंत्रणात यावी, अशी मदतीची हाक केंद्र संचालकांना करीत आहेत.राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत अनुदानावर देण्यात येणाऱ्या औषधींचा पुरवठा अत्यल्प आहे. यावर्षी तरी निसर्ग साथ देईल आणि पीक होईल, अशी आशा होती, परंतु यावर्षीही पावसाने दगा, किडींचा हल्ला यामुळे लागवड खर्चही निघण्याची स्थिती आहे.आतापर्यंत ८२ टक्के पाऊसआतापर्यंत जिल्ह्यात सरासरी १०७०.३ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. १८ आॅक्टोबरपर्यंत पडणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत हा पाऊस ८२ टक्के आहे. यावर्षीच्या खरीप पिकांसोबतच आगामी रबीच्या पिकांनाही फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात धानपिकाची ९७.६९ टक्के म्हणजेच १ लक्ष ७७ हजार ८६६ हेक्टरमध्ये लागवड झालेली आहे. त्यामुळे धानपिकाच्या रोपांना एका पाण्याची गरज आहे. वार्षिक सरासरीच्या अंदाजानुसार १८ आॅक्टोंबरपर्यत जिल्ह्यात १३०९.१ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र आजपर्यंत १०७०.३ मिमी पाऊस पडला आहे. सर्वसाधारणपणे पावसाच्या पाच महिन्यात, म्हणजे १ जून ते ३० आॅक्टोंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरी १,३३०.२ मिमी पाऊस पडण्याची अपेक्षा असते. मान्सुनचे केवळ १३ दिवस शिल्लक आहेत.६३ प्रकल्पांत केवळ ३३ टक्के जलसाठाशासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ ३०़०७ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ या विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत़ या प्रकल्पात केवळ १७.५८ टक्के जलसाठा आहे. यात चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी २४़८६, बघेडा ६़२३, बेटेकर बोथली १.७१ आणि सोरना जलाशयात उपयुक्त जलसाठा निरंक आहे़ जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे़ सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ३६़११ टक्के आहे़ माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा ५२.७९ टक्के आहे़ पावसाळा ऋतू सुरु असताना जलसाठा अत्यल्प असल्याने खरीप पिकांना फटका बसत आहे. याचा परिणाम रबी पिकांसह पिण्याचे पाणी, चाऱ्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.