शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

धम्म बोलण्यापेक्षा आचरणात आणावा

By admin | Updated: October 7, 2014 23:30 IST

धम्मचक्रपवर्तनानेच परिवर्तनाची क्रांती जन्मास आली. अन्यायावर मात करण्याची उर्जा प्राप्त झाली. माणसाच्या प्रत्यक्ष जगण्याला अर्थ प्राप्त झाला. स्वत: बुद्ध अनुयायी होणे म्हणजे समता, सहिष्णुता,

भंडारा : धम्मचक्रपवर्तनानेच परिवर्तनाची क्रांती जन्मास आली. अन्यायावर मात करण्याची उर्जा प्राप्त झाली. माणसाच्या प्रत्यक्ष जगण्याला अर्थ प्राप्त झाला. स्वत: बुद्ध अनुयायी होणे म्हणजे समता, सहिष्णुता, विवेकानिष्ठ वैज्ञानिक जाणीव आणि अनिश्वरवाद व अनात्मवाद याचा पुरस्कार करणे होय.तथागताच्या शिकवणीनेच माणसाचे मन प्रकाशित होते. उन्नत होते. प्रज्ञा, करूणा, मैत्री आणि शील या मानवी मूल्याच्या आविस्काराने मानवतेची स्थापना होते. धम्म हा बोलण्यात नसून आचारणात आहे. धम्माच्या नैतिक सदाचारातूनच सामाजिक जीवन निकोप व मैत्रीपूर्ण होईल, असे प्रतिपादन हर्षल मेश्राम यांनी केले. अशोक विजयादशमी निमित्त ५८ व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मधुकर रंगारी यांनी विचार व्यक्त करताना माणसाच्या बोलण्यात आणि वागण्यात दुटप्पीपणा नसावा. सकाळी बौद्ध आणि संध्याकाळी देविमायचा भक्त ही स्थिती दुभंगलेली मनोरूग्णता दर्शविते, म्हणून एकीने आणि नेकीने बुद्धाच्या शिकवणीचे आचरण करावे, असे विचार व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थित असलेले अमृत शहारे, निवृत्त कार्यकारी अभियंता, कुंदा भोवते, इंजि. प्रभाकर भोयर, वसंतराव हुमणे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाची सुरूवात सामूहिक बुद्ध वंदनेने झाली. कार्यक्रमाच्या शेवटी पंचशील महिला मंडळ पटेलपुरा वॉर्ड भंडारा यांच्यातर्फे अल्पोपहार देण्यात आला. आभार महेंद्र वाहाणे यांनी मानले. कार्यक्रमाकरीता प्रा. रमेश जांगळे, ताराचंद नंदागवळी, शामल भादुडी, वामन मेश्राम, अ‍ॅड. डी.के. वानखेडे, यशवंत नंदेश्वर, असित बागडे, निर्मला गोस्वामी, मदन बागडे, महेंद्र वाहाणे यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)