शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

भाविकांनी फुलणार उत्तरवाहिनी

By admin | Updated: January 14, 2015 23:03 IST

पुरातन काळापासून लाखांदूर तालुक्यातील दांडेगाव, मांढळ येथील चुलबंद नदीतिरावर भरणाऱ्या यात्रेनिमित्त हजारो भाविक गंगास्रानाचा लाभ घेणार आहेत. यात्रेनिमित्त येथे भागवत सप्ताहात

मांढळ येथे आज यात्रा : गंगा स्रानाला विशेष महत्वविरली (बु.) : पुरातन काळापासून लाखांदूर तालुक्यातील दांडेगाव, मांढळ येथील चुलबंद नदीतिरावर भरणाऱ्या यात्रेनिमित्त हजारो भाविक गंगास्रानाचा लाभ घेणार आहेत. यात्रेनिमित्त येथे भागवत सप्ताहात गोपालकाला आणि विविध मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.पूर्व विदर्भाची काशी आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे उत्तरवाहिनी तिर्थक्षेत्र मकरसंक्रांतीला भाविकांच्या अलोट गर्दीने फुलून दिसणार आहे. यावेळी हजारो भाविक पवित्र गंगास्थानाचा लाभ घेवून आपल्या मित्रपरिवारासह फराळाचा आस्वाद घेतात.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मंगलभूमीत मागील ५० वर्षांपासून गुरूदेव सेवा मंडळाचे शेकडो अनुयायी ग्रामगीतेवर प्रवचन करून माझे गावच नाही का तिर्थ याची महती श्रोत्यांना पटवून देत आहेत.या तिर्थस्थळी चुलबंद नदी उत्तरेकडून वळसा घालून पुन्हा दक्षिणेकडे वाहत असल्याने या तिर्थस्थळाला उत्तरवाहिनी असे नाव पडले आहे. नावाप्रमाणेच येथे वाहिणीचा संथ वेग आणि आजू बाजूच्या वनराईचा सुगंधी गंध आहे. या ठिकाणी भगवान शंकराचे प्राचीन देवालय आहे.येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे मन नैसर्गिक तंद्रीत रमून जाते. त्यामुळेच या निर्जन स्थळी हजारो वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी योगसाधना केल्याची साक्ष येथील मोठमोठे कुंड देतात. शेकडो वर्षांपासून या ठिकाणी मकरसंक्रांतीला भव्य यात्रा भरत असते. भाविक गुळपोहे, मुरमुऱ्याचे लाडू, तिळगुळ व चिवड्याचे फराळ करून नदीपात्रातील मऊ रेताळ गालिच्यांचा मनसोक्त आस्वाद घेतात. दुरवरून येणारे भाविक येथे मोठ्या श्रद्धेने मुंडण करवून घेतात. या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी सभा मंडप बांधण्यात आले आहे.दांडेगाव आणि मांढळ या दोन्ही गावांच्या सहकार्यातून येथे दरवर्षी भागवत सप्ताहाचे आयोजन केले जाते. मकरसंक्रांतीच्या शुभपर्वावर एक दिवसीय यात्रेचे आयोजन केले जाते. येथील भागवत सप्ताहाचे हे ५१ वे वर्ष असून ९ जानेवारीपासून हभप रतनलालजी महाराज गुजरातवाले हे भागवतावर प्रवचने देवून भाविकांना मंत्रमुग्ध करीत आहेत. गेले सात दिवस दररोज सामुदायिक प्रार्थना आणि भजन, किर्तन आदी कार्यक्रमांमुळे येथे भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. मकरसंक्रांतील गोपालकाल्याने या भागवत सप्ताहाचा समारोप होईल. यात्रेनिमित्त येथे भाविकांची गर्दी उसळते. पोलीस विभागामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो. या यात्रेत सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमामून कार्यक्रम सुरळीत पार पाडल्या जातात. (वार्ताहर)