शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाच्या निरोपासाठी भाविक सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 22:30 IST

दहा दिवस भक्तांच्या हृदयात विराजमान असलेल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. रविवारी जिल्हाभरात बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. त्यासाठी भाविकांसोबत प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे. भंडारा शहरातील वैनगंगा नदीसह ठिकठिकाणच्या तलावात आणि पर्यावरण रक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम टाक्यांमध्येही गणेशाचे विसर्जन होणार आहे.

ठळक मुद्देआज जिल्हाभर विसर्जन : पोलीस विभागाच्यावतीने चोख बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दहा दिवस भक्तांच्या हृदयात विराजमान असलेल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. रविवारी जिल्हाभरात बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. त्यासाठी भाविकांसोबत प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे. भंडारा शहरातील वैनगंगा नदीसह ठिकठिकाणच्या तलावात आणि पर्यावरण रक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम टाक्यांमध्येही गणेशाचे विसर्जन होणार आहे.भंडारा जिल्ह्यातील घराघरात आणि गावागावात गणेशाची स्थापना गणेश चतुर्थीला म्हणजेच १३ सप्टेंबर रोजी उत्साहात करण्यात आली होती. जिल्ह्यात ७५५ खाजगी, १९२ सार्वजनिक तर १९८ गावात एक गाव एक गणपती स्थापन करण्यात आला होता. यासोबतच अनेकांच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान झाले होते. दहा दिवस शहरासह जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण होते. भंडारा शहरातील भंडाराचा राजा, गणेशपुरचा राजा, बजरंग चौकातील त्रिमुखी दत्त रूपातील गणेशाचे दर्शन घेण्यासाठी दररोज रात्री भाविकांची प्रचंड गर्दी उसळत होती. विविध धार्मिक कार्यक्रमासोबत मंडळांनी सामाजिक कार्यक्रमांचेही आयोजन केले होते. आता रविवारी बाप्पांना निरोप देण्याची वेळ आली आहे. जड अंतकरणाने बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. मुर्तीचे विसर्जन शांततेत पार पाडावे यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने विजर्सन स्थळावर तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातही पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त आहे.भंडारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि ठाण्याच्याच ग्रामीण भागात नऊ असे ४६ सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली होती. १९ पासून गणेश विसर्जनाला प्रारंभ झाला. मात्र रविवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातील १४ आणि लगतच्या ग्रामीण भागातील तीन गणेशाचे विसर्जन केले जाणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या विसर्जन होणार आहे. सागर तलाव, पिंगलाई बोडी, मिस्किन टँक, वैनगंगा नदी, सुरनदी, गावतलाव आणि पर्यावरणपुरक विजर्सन टँकमध्ये गणेशाचे विसर्जन केले जाणार आहे.भंडारा शहरातील वैनगंगा नदी, मिस्किन टँक याठिकाणी गणपतीचे विसर्जन होणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळ विसर्जन मिरवणूक काढून बाप्पाना वाजत गाजत निरोप देणार आहेत. तसेच घरगुती गणपतीचेही विसर्जन रविवारी केले जाणार आहे. यासाठी वैनगंगा नदीच्या तिरावर पोलिसांनी सुरक्षेची उपाय केले आहे. त्याची पाहणी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, ठाणेदार सुधाकर चव्हाण यांनी केली.ईलेक्ट्रॉनिक बोट आणि प्रकाश व्यवस्थागणेश विसर्जनाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तासोबतच ईलेक्ट्रॉनिक बोट, प्रकाश व्यवस्था, पट्टीचे पोहणारे कर्मचारी, दोरखंड, हवा भरलेले रबरी ट्युब अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. रात्रीच्यावेळी कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलीस विभाग दक्ष राहणार आहे. जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक रश्मि नांदेडकर यांच्या नेतृत्वात तीन उपविभागीय पोलीस अधिकारी, दहा पोलीस निरीक्षक, २१ सहायक फौजदार, ४० पोलीस उपनिरीक्षक आणि एक हजार ७२ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गणेश मिरवणुकीत पोलीस तैणात राहणार असून विसर्जनस्थळीही खडा पहारा राहणार आहे. सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि गणेश मंडळांचे स्वयंसेवकही या कामात मदत करणार आहे.पर्यावरणाचे रक्षण करागणेश विसर्जनस्थळी प्रत्येक मंडळाने पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मोठ्या प्रमाणात नदीपात्रात आणि विसर्जन स्थळी निर्माल्यासह विविध वस्तु टाकल्या जातात. त्यामुळे विसर्जन स्थळाला विद्रुप काही दिवसानंतर येते. यासाठी घरगुती गणेशाचे शक्यतोवर पर्यावरणपुरक कृत्रिम टँकमध्येच नागरिकांनी विसर्जन करण्याची गरज आहे.