शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

राज्याचा विकासदर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 23:28 IST

राज्यात तीन वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने अनेक भरीव कामे केली आहेत.

ठळक मुद्देमाधव भंडारी : त्रिवर्षपूर्तीनिमित्त पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यात तीन वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने अनेक भरीव कामे केली आहेत. भाजपच्या जाहीरनाम्यातील ४० टक्के कामे आतापर्यंत पूर्ण झाली असून दोन वर्षात शिल्लक कामे पूर्ण केली जातील. राज्य सरकारची कामगिरी अभूतपूर्व असून मागील तीन वर्षात राज्याचा विकासदर वाढला आहे, असा दावा भाजपचे प्रवक्ता माधव भंडारी यांनी केला.राज्य सरकारच्या तीन वर्षांच्या कामगिरीचा आढावा सांगण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. भाजप सरकारने तीन वर्षात भरीव कामे केल्याचे सांगत माधव भंडारी म्हणाले, राज्यात कृषी विकास दर वाढलेला आहे. ३१ नोव्हेंबर २०१४ रोजी कृषी विकास दर उणे ११.२ टक्के होता. यावर्षी त्यात २४ टक्क्यांनी वाढ झाली असून १२.५ टक्क्क्यांवर पोहोचला आहे.राज्य सरकारने तीन वर्षात कृषी क्षेत्रात ५६ हजार कोटींची गुंतवणूक केली. सिंचनातही भरीव कामगिरी केली असून कृषीपंपाचा अनुषेश दूर करण्यात आला आहे. १ लाख ३८ हजार नवीन कृषीपंप देण्यात आले आहे. त्यामुळे शेती उत्पादनात वाढ झाली आहे.कृषी उत्त्पन्न बाजार समितींमध्ये शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. राज्यात ५ हजार नवीन तलाठी साझा तयार करण्यात आले असून जमिनीची ई-मोजणी केली जाणार आहे. गटशेतीला प्रोत्साहन देण्यात आले असून शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले.जलयुक्त शिवार योजना महत्त्वाकांक्षीमुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना राज्यात राबविण्यात आली. या योजनेतून शेतकरी स्वयंपूर्ण करणे हाच सरकारचा उद्देश आहे. भंडारा जिल्ह्यात जलयुक्त शिवार या योजनेसाठी २०१ गावांची निवड करून १७१ गावांमध्ये काम करण्यात आले होते. त्यातून आतापर्यंत ७१ हजार ३९२ हेक्टर नवीन सिंचन क्षमता निर्माण करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष तारीक कुरैशी, आमदार चरण वाघमारे, आमदार बाळा काशिवार, आ.गिरीश व्यास, चंदन गोस्वामी, भंडाºयाचे नगराध्यक्ष सुनील मेंढे, मुकेश थानथराटे, राजेश बांते उपस्थित होते.