शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

राज्याचा विकासदर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 23:28 IST

राज्यात तीन वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने अनेक भरीव कामे केली आहेत.

ठळक मुद्देमाधव भंडारी : त्रिवर्षपूर्तीनिमित्त पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यात तीन वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने अनेक भरीव कामे केली आहेत. भाजपच्या जाहीरनाम्यातील ४० टक्के कामे आतापर्यंत पूर्ण झाली असून दोन वर्षात शिल्लक कामे पूर्ण केली जातील. राज्य सरकारची कामगिरी अभूतपूर्व असून मागील तीन वर्षात राज्याचा विकासदर वाढला आहे, असा दावा भाजपचे प्रवक्ता माधव भंडारी यांनी केला.राज्य सरकारच्या तीन वर्षांच्या कामगिरीचा आढावा सांगण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. भाजप सरकारने तीन वर्षात भरीव कामे केल्याचे सांगत माधव भंडारी म्हणाले, राज्यात कृषी विकास दर वाढलेला आहे. ३१ नोव्हेंबर २०१४ रोजी कृषी विकास दर उणे ११.२ टक्के होता. यावर्षी त्यात २४ टक्क्यांनी वाढ झाली असून १२.५ टक्क्क्यांवर पोहोचला आहे.राज्य सरकारने तीन वर्षात कृषी क्षेत्रात ५६ हजार कोटींची गुंतवणूक केली. सिंचनातही भरीव कामगिरी केली असून कृषीपंपाचा अनुषेश दूर करण्यात आला आहे. १ लाख ३८ हजार नवीन कृषीपंप देण्यात आले आहे. त्यामुळे शेती उत्पादनात वाढ झाली आहे.कृषी उत्त्पन्न बाजार समितींमध्ये शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. राज्यात ५ हजार नवीन तलाठी साझा तयार करण्यात आले असून जमिनीची ई-मोजणी केली जाणार आहे. गटशेतीला प्रोत्साहन देण्यात आले असून शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले.जलयुक्त शिवार योजना महत्त्वाकांक्षीमुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना राज्यात राबविण्यात आली. या योजनेतून शेतकरी स्वयंपूर्ण करणे हाच सरकारचा उद्देश आहे. भंडारा जिल्ह्यात जलयुक्त शिवार या योजनेसाठी २०१ गावांची निवड करून १७१ गावांमध्ये काम करण्यात आले होते. त्यातून आतापर्यंत ७१ हजार ३९२ हेक्टर नवीन सिंचन क्षमता निर्माण करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष तारीक कुरैशी, आमदार चरण वाघमारे, आमदार बाळा काशिवार, आ.गिरीश व्यास, चंदन गोस्वामी, भंडाºयाचे नगराध्यक्ष सुनील मेंढे, मुकेश थानथराटे, राजेश बांते उपस्थित होते.