शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

राज्याचा विकासदर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 23:28 IST

राज्यात तीन वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने अनेक भरीव कामे केली आहेत.

ठळक मुद्देमाधव भंडारी : त्रिवर्षपूर्तीनिमित्त पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यात तीन वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने अनेक भरीव कामे केली आहेत. भाजपच्या जाहीरनाम्यातील ४० टक्के कामे आतापर्यंत पूर्ण झाली असून दोन वर्षात शिल्लक कामे पूर्ण केली जातील. राज्य सरकारची कामगिरी अभूतपूर्व असून मागील तीन वर्षात राज्याचा विकासदर वाढला आहे, असा दावा भाजपचे प्रवक्ता माधव भंडारी यांनी केला.राज्य सरकारच्या तीन वर्षांच्या कामगिरीचा आढावा सांगण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. भाजप सरकारने तीन वर्षात भरीव कामे केल्याचे सांगत माधव भंडारी म्हणाले, राज्यात कृषी विकास दर वाढलेला आहे. ३१ नोव्हेंबर २०१४ रोजी कृषी विकास दर उणे ११.२ टक्के होता. यावर्षी त्यात २४ टक्क्यांनी वाढ झाली असून १२.५ टक्क्क्यांवर पोहोचला आहे.राज्य सरकारने तीन वर्षात कृषी क्षेत्रात ५६ हजार कोटींची गुंतवणूक केली. सिंचनातही भरीव कामगिरी केली असून कृषीपंपाचा अनुषेश दूर करण्यात आला आहे. १ लाख ३८ हजार नवीन कृषीपंप देण्यात आले आहे. त्यामुळे शेती उत्पादनात वाढ झाली आहे.कृषी उत्त्पन्न बाजार समितींमध्ये शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. राज्यात ५ हजार नवीन तलाठी साझा तयार करण्यात आले असून जमिनीची ई-मोजणी केली जाणार आहे. गटशेतीला प्रोत्साहन देण्यात आले असून शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले.जलयुक्त शिवार योजना महत्त्वाकांक्षीमुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना राज्यात राबविण्यात आली. या योजनेतून शेतकरी स्वयंपूर्ण करणे हाच सरकारचा उद्देश आहे. भंडारा जिल्ह्यात जलयुक्त शिवार या योजनेसाठी २०१ गावांची निवड करून १७१ गावांमध्ये काम करण्यात आले होते. त्यातून आतापर्यंत ७१ हजार ३९२ हेक्टर नवीन सिंचन क्षमता निर्माण करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष तारीक कुरैशी, आमदार चरण वाघमारे, आमदार बाळा काशिवार, आ.गिरीश व्यास, चंदन गोस्वामी, भंडाºयाचे नगराध्यक्ष सुनील मेंढे, मुकेश थानथराटे, राजेश बांते उपस्थित होते.