शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

राज्याचा विकासदर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 23:28 IST

राज्यात तीन वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने अनेक भरीव कामे केली आहेत.

ठळक मुद्देमाधव भंडारी : त्रिवर्षपूर्तीनिमित्त पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यात तीन वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने अनेक भरीव कामे केली आहेत. भाजपच्या जाहीरनाम्यातील ४० टक्के कामे आतापर्यंत पूर्ण झाली असून दोन वर्षात शिल्लक कामे पूर्ण केली जातील. राज्य सरकारची कामगिरी अभूतपूर्व असून मागील तीन वर्षात राज्याचा विकासदर वाढला आहे, असा दावा भाजपचे प्रवक्ता माधव भंडारी यांनी केला.राज्य सरकारच्या तीन वर्षांच्या कामगिरीचा आढावा सांगण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. भाजप सरकारने तीन वर्षात भरीव कामे केल्याचे सांगत माधव भंडारी म्हणाले, राज्यात कृषी विकास दर वाढलेला आहे. ३१ नोव्हेंबर २०१४ रोजी कृषी विकास दर उणे ११.२ टक्के होता. यावर्षी त्यात २४ टक्क्यांनी वाढ झाली असून १२.५ टक्क्क्यांवर पोहोचला आहे.राज्य सरकारने तीन वर्षात कृषी क्षेत्रात ५६ हजार कोटींची गुंतवणूक केली. सिंचनातही भरीव कामगिरी केली असून कृषीपंपाचा अनुषेश दूर करण्यात आला आहे. १ लाख ३८ हजार नवीन कृषीपंप देण्यात आले आहे. त्यामुळे शेती उत्पादनात वाढ झाली आहे.कृषी उत्त्पन्न बाजार समितींमध्ये शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. राज्यात ५ हजार नवीन तलाठी साझा तयार करण्यात आले असून जमिनीची ई-मोजणी केली जाणार आहे. गटशेतीला प्रोत्साहन देण्यात आले असून शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले.जलयुक्त शिवार योजना महत्त्वाकांक्षीमुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना राज्यात राबविण्यात आली. या योजनेतून शेतकरी स्वयंपूर्ण करणे हाच सरकारचा उद्देश आहे. भंडारा जिल्ह्यात जलयुक्त शिवार या योजनेसाठी २०१ गावांची निवड करून १७१ गावांमध्ये काम करण्यात आले होते. त्यातून आतापर्यंत ७१ हजार ३९२ हेक्टर नवीन सिंचन क्षमता निर्माण करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष तारीक कुरैशी, आमदार चरण वाघमारे, आमदार बाळा काशिवार, आ.गिरीश व्यास, चंदन गोस्वामी, भंडाºयाचे नगराध्यक्ष सुनील मेंढे, मुकेश थानथराटे, राजेश बांते उपस्थित होते.