शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

साकोली तालुक्याचा विकास रखडला

By admin | Updated: June 14, 2014 23:23 IST

अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे, विकासाप्रती उदासीन असलेल्या नोकरशाहीमुळे साकोली तालुक्याचा विकास रखडला असून अनेक योजनांची योग्य अंमलबजावणी न झाल्यामुळे नागरिकांना त्याचा फायदा मिळत

साकोली : अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे, विकासाप्रती उदासीन असलेल्या नोकरशाहीमुळे साकोली तालुक्याचा विकास रखडला असून अनेक योजनांची योग्य अंमलबजावणी न झाल्यामुळे नागरिकांना त्याचा फायदा मिळत नसल्याचा आरोप किसान गर्जनाचे जिल्हा महामंत्री रामरतन चांदेवार यांनी दिलेल्या निवेदनातून केला आहे.कृषी विभागाच्या योजना, पंचायत समितीतील योजना, तहसीलमधील योजना, साकोली तालुक्यात खऱ्या गरजू, नागरिकांपर्यंत पोहचण्यात दिरंगाई होत आहे. विविध योजना सरकार नागरिकांकरिता राबविते. परंतु अडेलतट्टू अधिकाऱ्यांमुळे त्याची नीट अंमलबजावणी होत नाही. अपुऱ्या निधीअभावी बऱ्याच विकासाच्या योजना जिल्ह्यामध्ये राबविता येत नाही. बेरोजगारांच्या विकासासाठी असलेल्या योजना तालुक्यात फारच कमी प्रमाणात राबविल्या जात असल्यामुळे बेरोजगार युवक स्वत:च्या पायावर उभा होऊ शकला नाही. बेरोजगारांच्या विविध योजनांची अंमलबजावणी न झाल्याने तालुक्यातील युवक बेरोजगार परजिल्ह्यात, राज्यात कामधंद्याकरीता भटकत आहेत. त्यांना शासकीय योजनांचा लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे काहीच प्रयत्न दिसून येत नाही. शासकीय योजनेतून कर्ज मिळविण्याकरिता त्यांना वणवण फिरावे लागत आहे. यात बँकांची उदासीनता दिसून येते.साकोली तालुक्यात शेतकऱ्यांना त्यांच्या योजनेबद्दल माहिती नाही. पं.स. साकोली अंतर्गत इतर तालुक्याच्या तुलनेत विकासाच्या योजना फार कमी लोकांपर्यंत पोहचल्या आहेत. साकोली तहसीलमार्फत राशनकार्ड प्रकरणी गरीबांना हक्काचे राशनकार्ड मिळविण्याकरीता पायपीट करावे लागते. अनेक गरीब, गरजू कुटुंबाजवळ राशनकार्ड नाहीत. अन्नधान्य, केरोसीन यांचा काळाबाजार होत असल्याचा आरोप रामरतन चांदेवार यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)