शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

गुरुमुळे होतो सृजनशील विचारांचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2017 00:14 IST

मानवी जीवनात एखाद्या व्यक्तीत ९९ टक्के अवगुण तर एक टक्का चांगला गुण असेल तर त्या एक टक्का गुणाला विकसित करण्याचे खरे कार्य गुरु करित असतो.

विनिता साहू : महर्षी शाळेत गुरुपौर्णिमा उत्सवलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मानवी जीवनात एखाद्या व्यक्तीत ९९ टक्के अवगुण तर एक टक्का चांगला गुण असेल तर त्या एक टक्का गुणाला विकसित करण्याचे खरे कार्य गुरु करित असतो. गुरुंच्या मार्गदर्शनामुळे आत्म्याचे शुध्दीकरण होऊन सृजनशील विचारांचा विकास होतो, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले. महर्षी विद्या मंदिर शाळा उमरी (भंडारा) येथे गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर प्राचार्य श्रृती ओहळे उपस्थित होत्या. महर्षी वेदव्यास यांच्या जयंतीचे औचित्य गुरु पूजनाच्या दिवशी अत्यंत महत्वाचे आहे. कार्यक्रमाची सुरुवात अतिथींच्या हस्ते गुरुपूजनाने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतीक सदरात अप्रतिम नृत्य सादर करुन उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांसह पालकांची मने जिंकून घेतली. सकाळ सत्रात सहा सत्रीय महासत्यनारायणची पुजा करण्यात आली. यात ४३२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक साहू यांच्या हस्ते महर्षींच्या जीवनावर आधारित तथा शाळेसंबंधी माहितीच्या पुस्तकाचे विमोचण करण्यात आले. साहू म्हणाल्या की, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये प्रतिभा लपलेली असते. ती प्रतिभा बाहेर काढण्याचे काम शिक्षक करीत असतात. विश्वशांती अभियानांतर्गत हिंदू संस्कृतीचा अभिमान सर्वांनी बाळगायला हवे असेही त्या म्हणाल्या. दरम्यान शनिवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातून विश्व शांती अभियानाचा शुभारंभ आ. अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते करण्यात आला होता. त्याचा समारोप आज रविवारी गुरुपौर्णिमेला झाला. उत्सवासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.