शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

पर्यटनस्थळांचा विकास करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 22:20 IST

भंडारा जिल्हा झाडीपट्टीचे काश्मीर म्हणून ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्रातील, मुंबई, पुणे, महाबळेश्वर पर्यटन स्थळाप्रमाणे भंडारा जिल्ह्यातही भरपूर वनवैभव, वन्यजीव, जैवविविधता, नैसर्गीक खळखळणारे झरे इत्यादीने समृद्ध संपन्न अशी अनेक सुंदर व रमणीय पर्यटन स्थळे असून सुद्धा पाहिजे

ठळक मुद्देपर्यटन मंत्र्यांना निवेदन : पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप

आॅनलाईन लोकमतभंडारा : भंडारा जिल्हा झाडीपट्टीचे काश्मीर म्हणून ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्रातील, मुंबई, पुणे, महाबळेश्वर पर्यटन स्थळाप्रमाणे भंडारा जिल्ह्यातही भरपूर वनवैभव, वन्यजीव, जैवविविधता, नैसर्गीक खळखळणारे झरे इत्यादीने समृद्ध संपन्न अशी अनेक सुंदर व रमणीय पर्यटन स्थळे असून सुद्धा पाहिजे तसा पयृअन विकास आतापावतो झालेला नाही.महाराष्ट्र पर्यटन विकासातर्फे येथील पर्यटन स्थळांचा इको टयुरिझम आराखड्यात समावेश करून तातडीने त्यांच्या विकास करण्यासंदर्भात ग्रीन हेरिटेज संस्थेचे संस्थापक मो. सईद शेख यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशन दरम्यान रविभवन येथे राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना निवेदन देवून त्याबाबत चर्चा केली.मागील काही वर्षापासून गायमुख, आंबागड, पवनी, रावणवाडी इत्यादी ठिकाणी अधून मधून थातूर मातुरपणे कामे सुरू आहे. गायमुख येथे नैनितालची आठवण करून देणारे पर्वताच्या मधोमध रमणीय पांगडी जलाशय पर्यंत रोप वे व इतर विकास कामे, चांदपूर, कोका, पवनी येथील बौद्धकालीन स्तुप, गडकिल्ले, मंदिर घाट, गोसेखुर्द बांध, रावणवाडी जलाशय, तुमसर येथील माडगीजवळ वैनगंगेच्या मध्यभागी स्थित मिनी कन्याकुमारी अशी श्री नृसिंह टेकडी, पर्वतीय सौंदर्याने नटलेले कोरंभी, झिरी, हत्तीडोई, गडकुंभली साकोली, तसेच भंडारा येथील प्राचीन गिरी गोसावी यांची मंदिरे व समाध्या, अशी अनेक पर्यटन स्थळे व तिर्थक्षेत्रे जिल्ह्यात असून विकासाच्या प्रतिक्षेत आहेत.रावणवाडी, पवनी गोसेखुर्द, कोका, चांदपूर येथे पर्यटकांची सतत वर्दळ असते. आंबागड किल्ला, गायमुख, चांदपूर, कोरंभी, झिरी आदी ठिकाणीही पर्यटक भेट देत असतात. भंडारा जिल्हा पर्यटनाच्या बाबतीत महाराष्ट्राचे स्पेन आहे. पण आवश्यक सोईसुविधा इत्यादींची येथे गरज आहे. गायमुख, चांदपूर, कोका आदी बाबत ईको टयुरीझमचा प्रस्ताव वनविभागाच्या वतीने पुर्व उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांनी शासनाला पाठविला होता. पण तो प्रस्ताव आतापर्यंत रखडलेला आहे.ग्रीन हेरिटेज पर्यटन संस्था मागील अनेक वर्षापासून पर्यटन विकासाबाबत प्रयत्न व पाठपुरावा करीत आहेत. तसेच लोकप्रतिनिधींही यात प्रयत्नशील असतात. वर्तमानपत्रातून या संदर्भात बातम्या प्रकाशित होत असतात. पण याकडे नेहमी दुर्लक्ष होत असून निधीची कमतरता नेहमीच सांगितले जाते. याबाबतीत पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप दिले जाते. ही एक शोकांतीकाच.भंडारा जिल्ह्याला पर्यटनाचा बाबतीत शासनाद्वारे झुकते माप देण्यात येवून, भरपूर निधी मंजूर करून उपेक्षित, प्रलंबित असलेल्या पर्यन स्थळांच्या विकास करण्यात यावे, असे पत्रात नमुद करण्यात आले होते.