शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा ‘स्वच्छ-सुंदर’ करण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 23:48 IST

मी माझ्या अंत:करणातून हा दृढ संकल्प करतो की, आपले घर, शाळा, कॉलेज, आरोग्य केंद्र, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, तलाव आणि सार्वजनिक ठिकाणी मी स्वच्छता ठेवण्यासाठी प्रोत्साहन देईन.

ठळक मुद्दे‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात शपथ : स्वच्छता व श्रमदानातून लोकचळवळ उभी राहते

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मी माझ्या अंत:करणातून हा दृढ संकल्प करतो की, आपले घर, शाळा, कॉलेज, आरोग्य केंद्र, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, तलाव आणि सार्वजनिक ठिकाणी मी स्वच्छता ठेवण्यासाठी प्रोत्साहन देईन. या शब्दातील वर्णन असलेली स्वच्छता ही सेवेची शपथ, ग्रामपंचायत, प्राथमिक व माध्यमिक शाळा, शासकीय, निमशासकीय कार्यालयात घेण्यात आली. या अभियानाच्या माध्यमातून शपथ, स्वच्छता व श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छतेची चळवळ उभी करून लोकसहभागातून जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर करण्यासाठी हजारो हातांनी स्वच्छता करण्याचा संकल्प केला आहे.१५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे. प्रत्येक व्यक्ती प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे या अभियानात सहभागी होऊन वैयक्तिक, सार्वजनिक स्वच्छतेसाठी आपले योगदान देत आहे. जिल्हास्तरीय अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हा परिषद पदाधिकारी, विभागप्रमुख खंड विकास अधिकाºयांच्या उपस्थितीत करण्यात आला. तालुका व ग्रामस्तरावर खंडविकास अधिकारी यांचे नेतृत्वात जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाºयांच्या उपस्थितीत अभियानाच्या अंमलबजावणीचा मुहूर्त करण्यात आला.भंडारा, मोहाडी, लाखनी, साकोली, लाखांदूर, पवनी येथे पंचायत समिती, ग्रामपंचायत व शालेय स्तरावर, महाविद्यालय, शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी स्वच्छता ही सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्थानिक पदाधिकारी, नागरिकांनी या अभियानाला पसंती दर्शवित स्वच्छतेची शपथ घेतली.विद्यार्थ्यांनी हातात घोषवाक्याचे फलक घेऊन स्वच्छता रॅलीतून नागरिकांपर्यंत स्वच्छतेचे महत्व सांगितले. शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी हात पुढे करून घर, गाव, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ करण्याची शपथ घेतली. घर, गाव, शाळा, कॉलेज, आरोग्य केंद्र,, रेल्वे स्थानक, बसस्थानक तलाव आणि सार्वजनिक ठिकाण स्वच्छ करण्यासाठी हजारो हातांनी स्वच्छता ही सेवेची शपथ संकल्प केला. या माध्यमातून स्वच्छतेची लोकचळवळ रूजविल्या जात आहे.ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, विद्यालय, महाविद्यालय व शासकीय, निमशासकीय कार्यालय परिसरात अधिकारी, कर्मचारी, स्थानिक नागरिकांनी सहभाग घेऊन श्रमदान करून स्वच्छता केली. पंचायत समिती परिसर स्वच्छ करण्यासाठी खंडविकास अधिकारी यांचे नेतृत्वात अधिकारी, कर्मचारी एकजुटीने पुढे आलेत. परिसराची साफसफाई करून स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यात आला. स्वच्छता रॅली, पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जाणीव जागृती करण्यात आली. ग्रामस्तरावर या अभियानाचे माध्यमातून महिलांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय व निमशासकीय कार्यालय, ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, रस्ते, चौक, स्मारकांची जागा, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ केली. शालेय विद्यार्थ्यांपासून तर ज्येष्ठांपर्यंत नागरिकांनी स्वच्छता ही सेवा अभियानात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, योगदान देऊन स्वच्छतेची लोकचळवळ रूजविल्या जात आहे. अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्याला स्वच्छ व सुंदर करण्यासाठी विडा उचलला आहे.