शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धूळ, गरम राखेमुळे शेतपिकांची नासाडी

By admin | Updated: January 24, 2016 00:46 IST

खरबी नाका येथून १ कि.मी. अंतरावर असलेल्या साईनाथ अ‍ॅग्रो प्रकल्पामधील धुळ व गरम राख शेतामध्ये शिरत असल्याने शेतपिकांची नासाडी झालेली आहे.

खरबी नाका येथील प्रकार : शेतकरी संकटात, नुकसानभरपाईची मागणीखरबी नाका : खरबी नाका येथून १ कि.मी. अंतरावर असलेल्या साईनाथ अ‍ॅग्रो प्रकल्पामधील धुळ व गरम राख शेतामध्ये शिरत असल्याने शेतपिकांची नासाडी झालेली आहे. शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून न्याय मिळावा यासाठी शेतकऱ्याने कंपनी व्यवस्थापनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली. कंपनीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केली आहे.राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या खरबी लगत खराशी गावातील शेतकरी कोंडबा हिवसे यांच्या मालकीची ३.६१ हेक्टर जमीन आहे. या जमिनीमध्ये मागील बराच वर्षापासून धान, हिरवी मिरची, गहू, हरभरा, भाजीपाला इत्यादी पिके घेतली जातात. आतापर्यंत चांगल्या प्रकारे येत असलेली शेतपिके मागील दीड वर्षापासून अडचणीत आले आहेत. कंपनीच्या आवारभिंतीला लागून असलेल्या शेतपिकांवर साईनाथ अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज मध्ये धानावर प्रक्रिया करून तांदुळ तयार करण्यात येतो. या प्रकल्पामध्ये धान इकत्तीन तांदूळ निर्मिती करण्यासाठी विजेचा उपयोग केला जातो. जळालेल्या धानाच्या कोंड्याची राख व बाहेर पडणारी धुळ ही लगतच्या शेतामध्ये पिकांवर जाऊन पडत असल्याने पिकांची नासाडी होत आहे. गरम राखेमुळे शेतातील पिके करपत आहे. खरीप हंगामात सोयाबीन धान व इतर पिकाचे नुकसान झालेले आहे. सध्या शेतामध्ये हरभरा व गव्हाचे असून पीक पूर्णपणे काळे पडले आहे. हरभऱ्याला बार न आल्याने उत्पादन न होण्याची चिंता निर्माण झाली आहे. मागील दीड वर्षापासून हा त्रास शेतकऱ्याला सहन करीत आहे. आतापर्यंत २० लाख रुपयाचे नुकसान सहन करावे लागल्याची खंत शेतकऱ्यांचा मुलगा हरिचंद्र कोंडबा हिवसे यांनी बोलून दाखविली.आमदार रामचंद्र अवसरे यांनी शेतपिकाची पाहणी करून मदतीचे आश्वासन दिले. परंतु कोणत्याच प्रकारचे कारवाई होताना दिसत नसल्यामुळे शेतकऱ्याने अखेर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याची वेळ आली आहे. या प्रकाराची तक्रार प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही शेतकऱ्याने केली आहे. या विभागाने शेतपिकाची कोणतीही पाहणी न करता कंपनीला भेट दिल्याचे शेतकऱ्याने बोलून दाखविले. लाखो रुपयाचे उत्पादन देणारी शेती १५ जणांच्या कुटुंबाचे पालनपोषण करीत होती. मात्र उत्पादन येणे बंद झाल्याने कुटुंबावर आर्थिक नुकसान झाले आहे. (वार्ताहर)