शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

‘गोसेखुर्द’ असूनही दुष्काळी स्थितीत

By admin | Updated: December 8, 2015 00:40 IST

विदर्भातील सर्वात मोठे गोसेखुर्द धरण ज्या गोसेखुर्द गावाजवळ तयार झाले आहे.

उपयोग तरी काय? : सिंचनाच्या प्रश्नाकडे अजूनही कानाडोळापवनी : विदर्भातील सर्वात मोठे गोसेखुर्द धरण ज्या गोसेखुर्द गावाजवळ तयार झाले आहे. ते गाव व परिसरातील गावे धरणातील पाण्याच्या सिंचनापासून वंचित आहेत. या गावातील शेतकरी मागील तीन वर्षापासून दुष्काळाने हवालदिल झाला आहे. यावर्षीही समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे धानाची रोवणी झालेली नाही.गोसेखुर्द गाव परिसरातील गोसे बुज, मेंढा, वासेळा, कुर्झा आदी गावातील शेतीला धरणाचे पाणी मिळत नसल्यामुळे सिंचनापासून वंचीत झाली आहे. मागीलवर्षी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन गोसेखुर्द धरणाला भेट देण्यासाठी आले असता वंचित राहणाऱ्या गावातील शेतकऱ्यांनी ना.महाजन यांना मागण्यांचे निवेदन देऊन गोसेखुर्द धरणाचे पाणी शेतीला देण्याकरीता चर्चा केली. त्यावेळी ना.महाजन यांनी अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. परंतु कार्यवाही न झाल्यामुळे शेतकरी दुष्काळाशी सामना करीत आहेत.चार पाच वर्षापासून गोसेखुर्द धरणात जलसाठा करण्यात येत आहे. या धरणाचे पाणी उजव्या व डाव्या कालव्यातून शेतीला सिंचनासाठी सोडले जात आहे. पण या धरणाचे पाणी परिसरातील गावातील शेतीला दिले जात नाहीे. मागील तीन वर्षापासून या परिसरात दुष्काळ पडत आहे. यावर्षीही या परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांना धानाची रोवणी करता आली नाही. येथील शेती ही नैसर्गिक पाण्यावर अवलंबून आहे. पण येथे सिंचनाची काहीही सोय नाही. त्यामुळे प्रत्येक वर्षी या परिसरात दुष्काळाची स्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. येथील शेतकरी कर्जात बुडाले आहेत.गोसेखुर्द धरण तयार करण्याकरीता या गावातील शेतकऱ्यांनी त्यांची शेतजमीन कवडीमोल भावाने सरकारला दिली. त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे स्वप्न साकार होऊ शकले. या शेतकऱ्यांनी सरकारला मदत केली. पण या शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेजच्या कोणताही लाभ होऊ शकला नाही. गोसेखुर्द धरण पाण्याने तुडुंब भरले आहे. या पाण्याचा या परिसरातील शेतीला सिंचनासाठी फायदा न होणे हे शेतकऱ्यांसाठी दुर्देवी ठरत आहे.या परिसरातील शेतीला धरणाचे पाणी सिंचनासाठी देण्यात येण्याकरिता कोणतेही नियोजन तयार करण्यात आलेले नाही. या शेतकऱ्यांनी गोसेखुर्द धरणाचे पाणी त्यांच्या शेतीला सिंचनाकरिता द्यावे याकरिता अनेक निवेदन सरकारला दिले. पण काहीही उपयोग झाला नाही.