शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘गोसेखुर्द’ असूनही दुष्काळी स्थितीत

By admin | Updated: December 8, 2015 00:40 IST

विदर्भातील सर्वात मोठे गोसेखुर्द धरण ज्या गोसेखुर्द गावाजवळ तयार झाले आहे.

उपयोग तरी काय? : सिंचनाच्या प्रश्नाकडे अजूनही कानाडोळापवनी : विदर्भातील सर्वात मोठे गोसेखुर्द धरण ज्या गोसेखुर्द गावाजवळ तयार झाले आहे. ते गाव व परिसरातील गावे धरणातील पाण्याच्या सिंचनापासून वंचित आहेत. या गावातील शेतकरी मागील तीन वर्षापासून दुष्काळाने हवालदिल झाला आहे. यावर्षीही समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे धानाची रोवणी झालेली नाही.गोसेखुर्द गाव परिसरातील गोसे बुज, मेंढा, वासेळा, कुर्झा आदी गावातील शेतीला धरणाचे पाणी मिळत नसल्यामुळे सिंचनापासून वंचीत झाली आहे. मागीलवर्षी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन गोसेखुर्द धरणाला भेट देण्यासाठी आले असता वंचित राहणाऱ्या गावातील शेतकऱ्यांनी ना.महाजन यांना मागण्यांचे निवेदन देऊन गोसेखुर्द धरणाचे पाणी शेतीला देण्याकरीता चर्चा केली. त्यावेळी ना.महाजन यांनी अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. परंतु कार्यवाही न झाल्यामुळे शेतकरी दुष्काळाशी सामना करीत आहेत.चार पाच वर्षापासून गोसेखुर्द धरणात जलसाठा करण्यात येत आहे. या धरणाचे पाणी उजव्या व डाव्या कालव्यातून शेतीला सिंचनासाठी सोडले जात आहे. पण या धरणाचे पाणी परिसरातील गावातील शेतीला दिले जात नाहीे. मागील तीन वर्षापासून या परिसरात दुष्काळ पडत आहे. यावर्षीही या परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांना धानाची रोवणी करता आली नाही. येथील शेती ही नैसर्गिक पाण्यावर अवलंबून आहे. पण येथे सिंचनाची काहीही सोय नाही. त्यामुळे प्रत्येक वर्षी या परिसरात दुष्काळाची स्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. येथील शेतकरी कर्जात बुडाले आहेत.गोसेखुर्द धरण तयार करण्याकरीता या गावातील शेतकऱ्यांनी त्यांची शेतजमीन कवडीमोल भावाने सरकारला दिली. त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे स्वप्न साकार होऊ शकले. या शेतकऱ्यांनी सरकारला मदत केली. पण या शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेजच्या कोणताही लाभ होऊ शकला नाही. गोसेखुर्द धरण पाण्याने तुडुंब भरले आहे. या पाण्याचा या परिसरातील शेतीला सिंचनासाठी फायदा न होणे हे शेतकऱ्यांसाठी दुर्देवी ठरत आहे.या परिसरातील शेतीला धरणाचे पाणी सिंचनासाठी देण्यात येण्याकरिता कोणतेही नियोजन तयार करण्यात आलेले नाही. या शेतकऱ्यांनी गोसेखुर्द धरणाचे पाणी त्यांच्या शेतीला सिंचनाकरिता द्यावे याकरिता अनेक निवेदन सरकारला दिले. पण काहीही उपयोग झाला नाही.