शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

नोकरीत असूनही शिक्षक झाले बेरोजगार

By admin | Updated: June 2, 2017 00:26 IST

जिल्हा परिषदेचा मुख्य प्रवेशद्वारावरील पायऱ्यांवर कधी हिरमुसल्या चेहऱ्याने बसून असतात तर कधी जिल्हा परिषद शिक्षण विभागात मोठ्या अपेक्षेने फेरफटका मारतात.

व्यथा आंतरजिल्हा बदलीतील शिक्षकांची : जि.प. मध्ये दररोजची पायपीटलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषदेचा मुख्य प्रवेशद्वारावरील पायऱ्यांवर कधी हिरमुसल्या चेहऱ्याने बसून असतात तर कधी जिल्हा परिषद शिक्षण विभागात मोठ्या अपेक्षेने फेरफटका मारतात. ही परिस्थिती आहे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील शिक्षकांची. नोकरी असतानाही सुमारे ११७ शिक्षकांपैकी काही शिक्षकांची आता बेरोजगार झाल्यागत दैनावस्था झाली आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या माध्यमातून आंतरजिल्हा प्रक्रियेतून ११७ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. मात्र या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान एका असंतुष्ट शिक्षकाच्या तक्रारीवरून विभागीय आयुक्तांनी आंतरजिल्हा बदली रद्द केल्या होत्या. दरम्यान सहा शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे या सहा शिक्षकांना वगळून उर्वरीत १११ बदल्या रद्द करण्यात आल्याचा आदेश जिल्हा परिषदेमध्ये धडकला. त्यानंतर १४ शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली. त्यांच्याही प्रक्रियेला स्थगिती मिळाली. असे करता करता आता उर्वरितांपैकी अनेकांनी धाव घेतली आहे. असे असतानाही अनेक शिक्षकांना जिल्हा परिषद प्रशासन शिक्षक या नोकरीवर सामावून घेऊन अशी अपेक्षा आहे. या अपेक्षेकरिता जिल्हा परिषदेमध्ये दररोज अनेक शिक्षक केविलवाण्या अवस्थेत येरझाऱ्या घालीत आहेत. मागील अनेक वर्षांपासून कुटुंबांपासून शेकडो कि.मी. अंतरावर नोकरी केल्यानंतर या बदल्यांमुळे ते कुटुंबाजवळ आले होते. मात्र प्रक्रिया रद्द झाल्याने त्यांचे अवसान गळाले आहे. अनेक शिक्षकांना रूजू झालेल्या शाळांमधील शिक्षकांकडूनच बोलणी ऐकावी लागल्याचे उदाहरणही समोर आले. बदली प्रक्रिया रद्द होईल व या शिक्षकांना सामावून घेण्यात येईल या अपेक्षेने दररोज शिक्षक जिल्हा परिषदमध्ये येत आहेत. येथील शिक्षण विभागाचा एखादा अधिकारी किंवा कारकूनही भेटल्यास त्यांच्याकडे आपली व्यथा मांडीत आहेत. मात्र त्यांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. दिवसभर जिल्हा परिषद मधील पायऱ्या चढून उतरून थकल्यानंतर अगदी नैराश्य यातील काही शिक्षक प्रवेशद्वारावरील पायऱ्यांवरच बस्तान मांडून दररोज दिसतात. सध्या हे शिक्षक नोकरी असतानाही बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे अनेकांचे कुटुंब आंतरजिल्हा बदली प्रक्रिया रद्द झाल्यामुळे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. अनेकांसमोर आर्थिक प्रश्न घोंघावत आहे. याकरिता अनेकांनी त्यांच्याकडे होते नव्हते ते सर्वस्वी पणाला लावून स्वगृही आले. मात्र प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांच्या किंवा अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे या शिक्षकांना जबर फटका बसला आहे.