शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

सरकारी पट्टेदार असूनही लाभ मिळता मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:26 IST

पालांदूर : लाखनी तालुक्यातील किटाडी येथील काबिल कास्तकारीचे प्रकरण १५ वर्षांपासून थंडबस्त्यात असून, आयुष्याच्या संध्याकाळी वृद्ध शेतक-याची हक्काच्या ...

पालांदूर : लाखनी तालुक्यातील किटाडी येथील काबिल कास्तकारीचे प्रकरण १५ वर्षांपासून थंडबस्त्यात असून, आयुष्याच्या संध्याकाळी वृद्ध शेतक-याची हक्काच्या शेतजमिनीसाठी फरफट सुरू आहे. ही घटना लाखनी तालुक्यातील किटाडी येथील आहे.

चंद्रभान मारोती हेडाऊ असे अन्यायग्रस्त शेतक-याचे नाव आहे. भूमिधारी हक्काने वहिवाटीकरिता शासनाने शेतजमिनीचा पट्टा दिला. त्यावर चरितार्थ सुरू होता. मात्र निसर्गाची वक्रदृष्टी होऊन दुष्काळ ओढवला. बिकट परिस्थिती निर्माण झाली. हलाकीचे जीवन जगण्याची वेळ आली. गावातीलच गर्भश्रीमंत पाटलाला क्षुल्लक रकमेत जमीन कसायला दिली असता, बनावट कागदपत्रांच्याआधारे माझ्या शेतजमिनीवर कायमस्वरूपी कब्जा केल्याचे कोर्ट विद्यमान डी. पी. तलमले, तत्कालीन उपविभागीय अधिकारी, साकोली यांचे कोर्ट व न्यायालयीन निर्णयाद्वारे स्पष्ट झाले आहे.

१९७५-७६ मध्ये सरकारी पट्ट्यातील भूमापन क्र. ३२४, १०. ११ हे. आर. क्षेत्रातील एक हेक्टर काबिल कास्तकारी शासकीय वाटपात मिळाली. जमिनीचा सात-बाराही नावावर झाला. १९९२ पर्यंत त्या शेतजमिनीची मशागत करून धानपिकाचे उत्पन्न घेऊन कुटुंबाचे पालनपोषण केले. मात्र दुष्काळ ओढावून बिकट परिस्थिती निर्माण झाली. शेती कशी कसावी? कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवावा? असे प्रश्न निर्माण झाल्यामुळे गावातीलच पाटलांकडून १९९३ ला पाच हजार रुपयांत कसायला दिली; मात्र पाटलाने माझ्या साधेपणाचा गैरफायदा घेऊन १० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर १०० वर्षांच्या करारनाम्याच्याआधारे माझ्या हक्काच्या शेतजमिनीवर कब्जा केला. कब्जा हटविण्याची विनंती केली, तर जिवंत मारण्याची धमकीच दिली. प्रकरण उपविभागीय अधिकारी, साकोली, यांच्याकडे न्यायप्रविष्ट झाले. गैरअर्जदाराचे सर्व दस्तावेज मूलतः बनावट व बेकायदेशीर असल्याने हीर शेतजमीन २०१६ रोजी शासनजमा झाली.

२ ऑगस्ट २०१९ रोजी संबंधित तलाठी व मंडल अधिकारी यांचे समक्ष मोका पंचनामा केला. त्यात गैरअर्जदाराने खरीप हंगाम २०१९ चे धानपीक निघाल्यावर जमिनीवरून कब्जा सोडणार असल्याचे लेखी बयानात कबूल केले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी २०१७ रोजी गैरअर्जदाराचे अतिक्रमण हटवून पूर्ववत शेतजमीन मूळ मालकाच्या नावे करण्यासंदर्भाचे पत्र तहसीलदार, लाखनी यांना दिले होते. यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी २४ जून २०२० रोजी उपविभागीय अधिकारी, साकोली, यांना दिलेल्या पत्रानुसार एक हेक्टर शेतजमीन मोकळी असल्याचा लिखित पुरावा तलाठी कार्यालयातून ५ ऑगस्ट २०२० रोजी मूळ मालकाला प्राप्त झालेला आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षित व वेळकाढू धोरणामुळे कारवाईस फारच विलंब होत आहे. वयाच्या ७५ व्या वर्षीही न्यायासाठी झुंज देत आहे. गत १५ वर्षांपासून स्वखर्चाने प्रशासनाचे उंबरठे झिजवून जीव मेटाकुटीस आला आहे. मात्र प्रशासनाच्या वेळकाढूपणामुळे मला माझी शेतजमीन परत मिळेल काय? असा प्रश्न वृद्ध शेतकरी चंद्रभान यांनी केला आहे.