शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

सरकारी पट्टेदार असूनही लाभ मिळता मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:26 IST

पालांदूर : लाखनी तालुक्यातील किटाडी येथील काबिल कास्तकारीचे प्रकरण १५ वर्षांपासून थंडबस्त्यात असून, आयुष्याच्या संध्याकाळी वृद्ध शेतक-याची हक्काच्या ...

पालांदूर : लाखनी तालुक्यातील किटाडी येथील काबिल कास्तकारीचे प्रकरण १५ वर्षांपासून थंडबस्त्यात असून, आयुष्याच्या संध्याकाळी वृद्ध शेतक-याची हक्काच्या शेतजमिनीसाठी फरफट सुरू आहे. ही घटना लाखनी तालुक्यातील किटाडी येथील आहे.

चंद्रभान मारोती हेडाऊ असे अन्यायग्रस्त शेतक-याचे नाव आहे. भूमिधारी हक्काने वहिवाटीकरिता शासनाने शेतजमिनीचा पट्टा दिला. त्यावर चरितार्थ सुरू होता. मात्र निसर्गाची वक्रदृष्टी होऊन दुष्काळ ओढवला. बिकट परिस्थिती निर्माण झाली. हलाकीचे जीवन जगण्याची वेळ आली. गावातीलच गर्भश्रीमंत पाटलाला क्षुल्लक रकमेत जमीन कसायला दिली असता, बनावट कागदपत्रांच्याआधारे माझ्या शेतजमिनीवर कायमस्वरूपी कब्जा केल्याचे कोर्ट विद्यमान डी. पी. तलमले, तत्कालीन उपविभागीय अधिकारी, साकोली यांचे कोर्ट व न्यायालयीन निर्णयाद्वारे स्पष्ट झाले आहे.

१९७५-७६ मध्ये सरकारी पट्ट्यातील भूमापन क्र. ३२४, १०. ११ हे. आर. क्षेत्रातील एक हेक्टर काबिल कास्तकारी शासकीय वाटपात मिळाली. जमिनीचा सात-बाराही नावावर झाला. १९९२ पर्यंत त्या शेतजमिनीची मशागत करून धानपिकाचे उत्पन्न घेऊन कुटुंबाचे पालनपोषण केले. मात्र दुष्काळ ओढावून बिकट परिस्थिती निर्माण झाली. शेती कशी कसावी? कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवावा? असे प्रश्न निर्माण झाल्यामुळे गावातीलच पाटलांकडून १९९३ ला पाच हजार रुपयांत कसायला दिली; मात्र पाटलाने माझ्या साधेपणाचा गैरफायदा घेऊन १० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर १०० वर्षांच्या करारनाम्याच्याआधारे माझ्या हक्काच्या शेतजमिनीवर कब्जा केला. कब्जा हटविण्याची विनंती केली, तर जिवंत मारण्याची धमकीच दिली. प्रकरण उपविभागीय अधिकारी, साकोली, यांच्याकडे न्यायप्रविष्ट झाले. गैरअर्जदाराचे सर्व दस्तावेज मूलतः बनावट व बेकायदेशीर असल्याने हीर शेतजमीन २०१६ रोजी शासनजमा झाली.

२ ऑगस्ट २०१९ रोजी संबंधित तलाठी व मंडल अधिकारी यांचे समक्ष मोका पंचनामा केला. त्यात गैरअर्जदाराने खरीप हंगाम २०१९ चे धानपीक निघाल्यावर जमिनीवरून कब्जा सोडणार असल्याचे लेखी बयानात कबूल केले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी २०१७ रोजी गैरअर्जदाराचे अतिक्रमण हटवून पूर्ववत शेतजमीन मूळ मालकाच्या नावे करण्यासंदर्भाचे पत्र तहसीलदार, लाखनी यांना दिले होते. यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी २४ जून २०२० रोजी उपविभागीय अधिकारी, साकोली, यांना दिलेल्या पत्रानुसार एक हेक्टर शेतजमीन मोकळी असल्याचा लिखित पुरावा तलाठी कार्यालयातून ५ ऑगस्ट २०२० रोजी मूळ मालकाला प्राप्त झालेला आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षित व वेळकाढू धोरणामुळे कारवाईस फारच विलंब होत आहे. वयाच्या ७५ व्या वर्षीही न्यायासाठी झुंज देत आहे. गत १५ वर्षांपासून स्वखर्चाने प्रशासनाचे उंबरठे झिजवून जीव मेटाकुटीस आला आहे. मात्र प्रशासनाच्या वेळकाढूपणामुळे मला माझी शेतजमीन परत मिळेल काय? असा प्रश्न वृद्ध शेतकरी चंद्रभान यांनी केला आहे.